शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

कसई-गावठाणवाडीत पाणीटंचाई

By admin | Updated: April 30, 2016 00:56 IST

दोन योजना तरीही वानवा : केवळ पाच मिनिटेच पाणी, प्रशासनावर नाराजी; ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

कसई दोडामार्ग : कसई-गावठाणवाडीत तीव्र पाणीटंचाई आहे. जुन्या नळयोजनेतील पाणीसाठा संपत आला आहे. काही नळधारकांना दिवसाला केवळ पाच मिनिटे पाणी मिळत आहे. गावासाठी राबविलेल्या जलस्वराज्य योजनेची नळयोजना कार्यान्वित करून पाणीपुरवठा ५ मे पर्यंत सुरळीत करावा; अन्यथा ६ मे रोजी पाण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. या पत्रकात ग्रामस्थांनी म्हटले आहे की, कसई येथे दोन नळयोजना आहेत. सध्या कार्यरत असलेल्या जुन्या नळयोजनेतील पाणीसाठा संपत आला आहे. दिवसातून फ क्त एकदाच साधारणपणे १० ते १५ मिनिटेच पाणी येते. त्यापैकी काही नळधारकांना फक्त पाचच मिनिटे पाणी येते. कसई गावठाणवाडी येथील बहुतांश लोक शेती आणि दुधाचा व्यवसाय करतात. अपुऱ्या पाण्यामुळे लोकांची आणि जनावरांची फारच गैरसोय होत आहे. याकडे कसई दोडामार्ग नगरपंचायतचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष संतोष नानचे यांचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सध्या कडक उन्हाळा सुरू झाला आहे. उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन ५ मे पर्यंत जलस्वराज्य योजनेची नळयोजना कार्यान्वित करून या वाडीतील ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरळीत करावा; अन्यथा ६ मे रोजी कसई दोडामार्ग नगरपंचायतीवर घागर मोर्चा काढला जाईल, असा इशारा गावठाणवाडी येथील ग्रामस्थ महादेव राजाराम गवस, विनायक फोंडू गवस, मोहन वासुदेव गवस, श्रीपाद वासुदेव गवस, मनोज नारायण गवस, अनिल बाबी पालकर, अनंत गणपत लब्दे, संदीप ह. गवस, तुळशीदास यशवंत पालकर, वासुदेव श्रीपाद गवस, नारायण वासुदेव गवस, राजाराम महादेव गवस, हरिश्चंद्र ल. गवस, आदी ग्रामस्थांनी दिला आहे. (वार्ताहर)उदासीनतेबाबत प्रश्नचिन्हकसई-गावठाणवाडीत जलस्वराज्य योजनेतील दुसरी विहीर आहे. मात्र, सध्या ती बंद आहे. याबाबत वेळोवेळी ग्रामस्थांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना तोंडी सूचना दिल्या. मात्र, याचा संबंधितांनी गांभीर्याने विचार केला नाही. केवळ ग्रामस्थांची चेष्टा करण्याचे काम नगरपंचायतीने केले. जलस्वराज्य योजनेच्या विहिरीचे पाणी सुरू केले, तर गावठाणवासीयांची पाण्याची गरज खात्रीने पूर्ण होऊ शकते. परंतु, याबाबत कल्पना देऊनही संबंधितांकडून उदासीनता दाखविली जात असून, याचे नेमके कारण समजत नाही.