शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कसई-गावठाणवाडीत पाणीटंचाई

By admin | Updated: April 30, 2016 00:56 IST

दोन योजना तरीही वानवा : केवळ पाच मिनिटेच पाणी, प्रशासनावर नाराजी; ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

कसई दोडामार्ग : कसई-गावठाणवाडीत तीव्र पाणीटंचाई आहे. जुन्या नळयोजनेतील पाणीसाठा संपत आला आहे. काही नळधारकांना दिवसाला केवळ पाच मिनिटे पाणी मिळत आहे. गावासाठी राबविलेल्या जलस्वराज्य योजनेची नळयोजना कार्यान्वित करून पाणीपुरवठा ५ मे पर्यंत सुरळीत करावा; अन्यथा ६ मे रोजी पाण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. या पत्रकात ग्रामस्थांनी म्हटले आहे की, कसई येथे दोन नळयोजना आहेत. सध्या कार्यरत असलेल्या जुन्या नळयोजनेतील पाणीसाठा संपत आला आहे. दिवसातून फ क्त एकदाच साधारणपणे १० ते १५ मिनिटेच पाणी येते. त्यापैकी काही नळधारकांना फक्त पाचच मिनिटे पाणी येते. कसई गावठाणवाडी येथील बहुतांश लोक शेती आणि दुधाचा व्यवसाय करतात. अपुऱ्या पाण्यामुळे लोकांची आणि जनावरांची फारच गैरसोय होत आहे. याकडे कसई दोडामार्ग नगरपंचायतचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष संतोष नानचे यांचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सध्या कडक उन्हाळा सुरू झाला आहे. उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन ५ मे पर्यंत जलस्वराज्य योजनेची नळयोजना कार्यान्वित करून या वाडीतील ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरळीत करावा; अन्यथा ६ मे रोजी कसई दोडामार्ग नगरपंचायतीवर घागर मोर्चा काढला जाईल, असा इशारा गावठाणवाडी येथील ग्रामस्थ महादेव राजाराम गवस, विनायक फोंडू गवस, मोहन वासुदेव गवस, श्रीपाद वासुदेव गवस, मनोज नारायण गवस, अनिल बाबी पालकर, अनंत गणपत लब्दे, संदीप ह. गवस, तुळशीदास यशवंत पालकर, वासुदेव श्रीपाद गवस, नारायण वासुदेव गवस, राजाराम महादेव गवस, हरिश्चंद्र ल. गवस, आदी ग्रामस्थांनी दिला आहे. (वार्ताहर)उदासीनतेबाबत प्रश्नचिन्हकसई-गावठाणवाडीत जलस्वराज्य योजनेतील दुसरी विहीर आहे. मात्र, सध्या ती बंद आहे. याबाबत वेळोवेळी ग्रामस्थांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना तोंडी सूचना दिल्या. मात्र, याचा संबंधितांनी गांभीर्याने विचार केला नाही. केवळ ग्रामस्थांची चेष्टा करण्याचे काम नगरपंचायतीने केले. जलस्वराज्य योजनेच्या विहिरीचे पाणी सुरू केले, तर गावठाणवासीयांची पाण्याची गरज खात्रीने पूर्ण होऊ शकते. परंतु, याबाबत कल्पना देऊनही संबंधितांकडून उदासीनता दाखविली जात असून, याचे नेमके कारण समजत नाही.