शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

कसई-गावठाणवाडीत पाणीटंचाई

By admin | Updated: April 30, 2016 00:56 IST

दोन योजना तरीही वानवा : केवळ पाच मिनिटेच पाणी, प्रशासनावर नाराजी; ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

कसई दोडामार्ग : कसई-गावठाणवाडीत तीव्र पाणीटंचाई आहे. जुन्या नळयोजनेतील पाणीसाठा संपत आला आहे. काही नळधारकांना दिवसाला केवळ पाच मिनिटे पाणी मिळत आहे. गावासाठी राबविलेल्या जलस्वराज्य योजनेची नळयोजना कार्यान्वित करून पाणीपुरवठा ५ मे पर्यंत सुरळीत करावा; अन्यथा ६ मे रोजी पाण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. या पत्रकात ग्रामस्थांनी म्हटले आहे की, कसई येथे दोन नळयोजना आहेत. सध्या कार्यरत असलेल्या जुन्या नळयोजनेतील पाणीसाठा संपत आला आहे. दिवसातून फ क्त एकदाच साधारणपणे १० ते १५ मिनिटेच पाणी येते. त्यापैकी काही नळधारकांना फक्त पाचच मिनिटे पाणी येते. कसई गावठाणवाडी येथील बहुतांश लोक शेती आणि दुधाचा व्यवसाय करतात. अपुऱ्या पाण्यामुळे लोकांची आणि जनावरांची फारच गैरसोय होत आहे. याकडे कसई दोडामार्ग नगरपंचायतचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष संतोष नानचे यांचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सध्या कडक उन्हाळा सुरू झाला आहे. उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन ५ मे पर्यंत जलस्वराज्य योजनेची नळयोजना कार्यान्वित करून या वाडीतील ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरळीत करावा; अन्यथा ६ मे रोजी कसई दोडामार्ग नगरपंचायतीवर घागर मोर्चा काढला जाईल, असा इशारा गावठाणवाडी येथील ग्रामस्थ महादेव राजाराम गवस, विनायक फोंडू गवस, मोहन वासुदेव गवस, श्रीपाद वासुदेव गवस, मनोज नारायण गवस, अनिल बाबी पालकर, अनंत गणपत लब्दे, संदीप ह. गवस, तुळशीदास यशवंत पालकर, वासुदेव श्रीपाद गवस, नारायण वासुदेव गवस, राजाराम महादेव गवस, हरिश्चंद्र ल. गवस, आदी ग्रामस्थांनी दिला आहे. (वार्ताहर)उदासीनतेबाबत प्रश्नचिन्हकसई-गावठाणवाडीत जलस्वराज्य योजनेतील दुसरी विहीर आहे. मात्र, सध्या ती बंद आहे. याबाबत वेळोवेळी ग्रामस्थांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना तोंडी सूचना दिल्या. मात्र, याचा संबंधितांनी गांभीर्याने विचार केला नाही. केवळ ग्रामस्थांची चेष्टा करण्याचे काम नगरपंचायतीने केले. जलस्वराज्य योजनेच्या विहिरीचे पाणी सुरू केले, तर गावठाणवासीयांची पाण्याची गरज खात्रीने पूर्ण होऊ शकते. परंतु, याबाबत कल्पना देऊनही संबंधितांकडून उदासीनता दाखविली जात असून, याचे नेमके कारण समजत नाही.