शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईची दाहकता वाढली

By admin | Updated: April 7, 2017 22:55 IST

दापोली तालुका : देवाच्या डोंगरपाठोपाठ अनेक गावांमध्ये येणार पाणीटंचाईचे संकट

शिवाजी गोरे ल्ल दापोलीदापोली तालुक्यातील देवाचाडोंगर येथील पाणीटंचाईची भीषणता लक्षात घेऊन या गावाला टँकरने पाणीपुरवठा सुरु झाला आहे. या गावापाठोपाठ आता तालुक्यातील अन्य गावांमध्येही पाणीटंचाई भीषण रुप धारण करु लागली आहे. तालुक्यातील ९ गावे व ३१ वाड्यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. लवकरच या गावांमध्येही पाण्याचा टँकर धावणार आहे. मात्र, पुढील आठवड्यापर्यंत पाणीटंचाईचे संकट अजून भीषण होण्याची शक्यता आहे. मात्र, या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा दावा केला जात आहे.देवाचाडोंगर येथील धनगर वस्तीला दरवर्षी पाणीटंचाईची झळ बसते. दापोलीच्या तहसीलदार कविता जाधव, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, पाणीपुरवठा विभागाचे शेंडे यांनी प्रत्यक्ष पाणीटंचाईची पाहणी करुन देवाचाडोंगर येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याला हिरवा कंदील दाखवला. देवाचाडोंंगर येथे टँकरने पाणीपुरवठा सुरु झाल्यामुळे येथील धनगरवस्तीला थोडाफार दिलासा मिळाला आहे. मात्र, दरवर्षी एप्रिल महिन्याची चाहूल लागताच पाणीटंचाईचे संकट भीषण रुप धारण करते. एप्रिल व मे महिन्यातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेत प्रशासनाने पाणीटंचाईवर मात करण्याची पूर्ण तयारी केली आहे. परंतु, याचवेळी प्रशासनाकडे टँकरचा तुटवडा आहे. तसेच नादुरुस्त टँकर ही त्यापैकीच एक समस्या आहे. अपुऱ्या टँकरमुळे टंचाईग्रस्तांना पाणीपुरवठा करताना प्रशासनाची दमछाक होत आहे. तहसीलदार टँकर अधिगृहीत करुन ते पाणीपुरवठाकरिता उपलब्ध करुन देतात. देवाचाडोंंगर येथील धनगरवस्तीने टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केल्यानंतर तब्बल २० दिवसांनी तेथे टँकर पोहोचला.देवाचाडोंगर, जामगे याठिकाणी एक दिवसआड टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील खाडी किनारपट्टीवरील अनेक वाड्याही यावर्षी तहानलेल्या आहेत. या वाड्यांनीसुद्धा टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. परंतु, शासकीय टँकर नादुरुस्त असल्याने टँकर अधिग्रहणाला विलंब होत आहे. त्यामुळे पाणीटंचाईवर मात करताना पंचायत समिती प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे.जामगे, चिखलगाव, अडखळ, मुरुड, ओणनवसे, उसगाव, उंबरशेत, पंचनदी, करजगाव या गावांमधील देवाचाडोंंगर, किन्हळ, वाघवे, बोवणेवाडी, भैरीचाकोंड, तांबडीचा कोंड, शिपवाडी, भंडारवाडा, नवानगर, पश्चिमवाडी, पूर्ववाडी, भोईवाडा, सुतारवाडी, बौद्धवाडी, रामाणेवाडी, मधलीवाडी, धोपटवाडी, गणेशवाडी, बौद्धवाडी, नबीमोहल्ला, नवानगर, संभाजीनगर, चिंचवळवाडी, डायरा, बौद्धवाडी, कोळीवाडा, भाटवाडी, गावठाणवाडी, तिवरे - राहटेवाडी, निंगावळेवाडी, झगडेवाडी, मुकादमवाडी, कोळीवाडा या ३१ वाड्यांमध्ये पाणीटंचाईचे संकट तीव्र झाले आहे.दापोली तालुक्यातील ९ गावांमध्ये भीषण पाणीटंचाईला सुरुवात झाली असून, यापुढील काळात पाणीटंचाई अजून भीषण होणार आहे. टंचाईग्रस्त गावांमधून टँकरची मागणी करण्यात आली असून या गावांची तहान भागवण्यासाठी अजून दोन ते तीन टँकरची गरज आहे. टंचाईग्रस्त गावे ही एकमेकांपासून दूरवर तसेच विरुद्ध दिशेला असल्याने टँकरच्या संख्येत वाढ करणे आवश्यक आहे. परंतु, टँकर किती उपलब्ध होतात यावर बरंच काही अवलंबून आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी दापोली तालुक्यात पाणीटंचाई थोडी उशिराने सुरु झाली आहे. पुढील काळात ही पाणीटंचाई अधिक तीव्र होणार असल्याने यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.