शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

पाणीटंचाईचे ढग यंदा ‘निरभ्र’च

By admin | Updated: March 15, 2017 23:10 IST

जिल्हा परिषद : २ कोटी ६५ लाखांचा आराखडा

रत्नागिरी : सरासरीपेक्षा जास्त पाऊस आणि बांधण्यात आलेले बंधारे यामुळे यंदा जिल्ह्यात अद्याप पाणीटंचाई सुरु झालेली नाही. जिल्ह्यात उद्भवणाऱ्या टंचाईला सामोरे जाण्यासाठी २ कोटी ६५ लाख रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, यावेळच्या कृती आराखड्यामध्ये विंधन विहिरी आणि नळपाणी योजना दुरुस्तीचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण भागामध्ये डोंगरकपारीत वसलेल्या धनगरवाड्यांमध्ये दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ त्यामुळे धनगरवस्त्यांतील जनतेला कळशीभर पाण्यासाठी कित्येक मैल डोंगरदऱ्यातून पायपीट करावी लागते़ गतवर्षी लांजा तालुक्यातील पालू - चिंचुर्टी गावातील धावडेवाडीमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवू लागल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागली होती. ही धावडेवाडी लांजापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर उंच डोंगरावर वसलेली आहे. ही माचाळ या अतिउंच डोंगराळ गावाच्या नजीक आहे. त्यामुळे पालू - चिंचुर्टीतील धावडेवाडीमध्ये पहिला टँकर प्रशासनाकडून धावला होता. यावर्षीचा संभाव्य आराखडा २ कोटी ६५ लाख रुपयांचा आहे. गतवर्षीच्या आराखड्यामध्ये विंधन विहिरींची कामे आणि नळपाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीच्या कामांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. यंदा दोघांचाही समावेश करण्यात आला आहे.या टंचाईग्रस्तांना सुमारे २५ टँकर्सनी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या आराखड्यानुसार नळपाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीवर सुमारे दीड कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तसेच विंधन विहिरींसाठी ५७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ४१ लाख २० हजार रुपये तरतूद करण्यात आली आहे. हा आराखडा तयार करुन जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तो मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. त्याला मंजूरीही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.जिल्हा परिषद कृषी विभागाने पाणी आडवा, पाणी जिरवा या तत्त्वावर श्रमदानातून बंधारे उभारण्यास सुरुवात केली होती. यामध्ये वनराई, कच्च बंधारे समावेश आहे. जिल्ह्यात सुमारे ५ हजारांपेक्षा जास्त बंधारे उभारण्यात आल्याने त्याचा फायदा पाणीटंचाई दूर जाण्यासाठी झाला. गतवर्षी १८ मार्चपासून जिल्ह्यात पाणीटंचाई सुरु झाली होती. मात्र, यंदा अजून टंचाई सुरु झालेली नसली तरी काही भागातून टँकरची मागणी करण्यात आली आहे. (शहर वार्ताहर)