शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

पाणीटंचाईचे ढग यंदा ‘निरभ्र’च

By admin | Updated: March 15, 2017 23:10 IST

जिल्हा परिषद : २ कोटी ६५ लाखांचा आराखडा

रत्नागिरी : सरासरीपेक्षा जास्त पाऊस आणि बांधण्यात आलेले बंधारे यामुळे यंदा जिल्ह्यात अद्याप पाणीटंचाई सुरु झालेली नाही. जिल्ह्यात उद्भवणाऱ्या टंचाईला सामोरे जाण्यासाठी २ कोटी ६५ लाख रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, यावेळच्या कृती आराखड्यामध्ये विंधन विहिरी आणि नळपाणी योजना दुरुस्तीचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण भागामध्ये डोंगरकपारीत वसलेल्या धनगरवाड्यांमध्ये दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ त्यामुळे धनगरवस्त्यांतील जनतेला कळशीभर पाण्यासाठी कित्येक मैल डोंगरदऱ्यातून पायपीट करावी लागते़ गतवर्षी लांजा तालुक्यातील पालू - चिंचुर्टी गावातील धावडेवाडीमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवू लागल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागली होती. ही धावडेवाडी लांजापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर उंच डोंगरावर वसलेली आहे. ही माचाळ या अतिउंच डोंगराळ गावाच्या नजीक आहे. त्यामुळे पालू - चिंचुर्टीतील धावडेवाडीमध्ये पहिला टँकर प्रशासनाकडून धावला होता. यावर्षीचा संभाव्य आराखडा २ कोटी ६५ लाख रुपयांचा आहे. गतवर्षीच्या आराखड्यामध्ये विंधन विहिरींची कामे आणि नळपाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीच्या कामांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. यंदा दोघांचाही समावेश करण्यात आला आहे.या टंचाईग्रस्तांना सुमारे २५ टँकर्सनी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या आराखड्यानुसार नळपाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीवर सुमारे दीड कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तसेच विंधन विहिरींसाठी ५७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ४१ लाख २० हजार रुपये तरतूद करण्यात आली आहे. हा आराखडा तयार करुन जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तो मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. त्याला मंजूरीही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.जिल्हा परिषद कृषी विभागाने पाणी आडवा, पाणी जिरवा या तत्त्वावर श्रमदानातून बंधारे उभारण्यास सुरुवात केली होती. यामध्ये वनराई, कच्च बंधारे समावेश आहे. जिल्ह्यात सुमारे ५ हजारांपेक्षा जास्त बंधारे उभारण्यात आल्याने त्याचा फायदा पाणीटंचाई दूर जाण्यासाठी झाला. गतवर्षी १८ मार्चपासून जिल्ह्यात पाणीटंचाई सुरु झाली होती. मात्र, यंदा अजून टंचाई सुरु झालेली नसली तरी काही भागातून टँकरची मागणी करण्यात आली आहे. (शहर वार्ताहर)