शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
6
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
7
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
8
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
9
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
10
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
11
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
12
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
13
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
14
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
15
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
16
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
17
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
18
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
19
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

जलव्यवस्थापन सभा वादळी

By admin | Updated: April 13, 2016 23:33 IST

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग दोषी : वैभववाडीतील विविध कामांवरून खडाजंगी

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आलेल्या कामाचा थेट पंचनामा जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर व सभापती दिलीप रावराणे यांनी केला. धनगरवाड्यांमध्ये पाण्याची व्यवस्था न करणे, वैभववाडी तालुक्यातील लोरे नं. २ येथील नळपाणी पुरवठा योजनेत आर्थिक अपहार झाला असताना संबंधितांवर कारवाई करताना चालढकलपणा करणे, वैभववाडीतील नळपाणी योजनेची कामे एकाच ठेकेदाराला देणे यासह आदी विषयांवर आजची जलव्यवस्थापन समिती सभा चांगलीच वादळी ठरली. याप्रकरणी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दोषी ठरवत आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले.जिल्हा परिषद जलव्यवस्थाप व स्वच्छता समितीची सभा अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली. यावेळी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, विषय समिती सभापती दिलीप रावराणे, आत्माराम पालेकर, रत्नप्रभा वळंजू, अंकुश जाधव, समिती सदस्य जर्नादन तेली, पंढरीनाथ राऊळ, वासुदेव परब, सुगंधा दळवी, भारती चव्हाण, संजिवनी लुडबे, समिती सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी तसेच अधिकारी खातेप्रमुख उपस्थित होते.बुधवारी झालेली सभा विविध विषयांवर गाजली. वैभववाडी तालुक्यातील लोरे नं. २ येथील नळपाणी पुरवठा योजनेत आर्थिक अपहार झाल्याचे चौकशी अंती स्पष्ट होऊन सुमारे दीड महिने लोटले तरी, संबंधित ठेकेदार व पाणी पुरवठा अध्यक्षांवर कोणती कारवाई केली, अशी विचारणा सभागृहात करण्यात आली. या मुद्द्यांवर स्पष्टीकरण देताना संबंधितांना मंगळवारी कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आले आहे, असे मराठे यांनी सांगितले. संबंधितांवर कारवाई करण्याचे गेल्या महिन्यात ठरले असतानाही कारवाई करण्यास विलंब का लागला? असा जाब जिल्हा परिषद अध्यक्षांनी मराठेंना विचारले. सात दिवसात याबाबतचा खुलासा मागवा व तो अमान्य असल्यास संबंधितांवर फौजदारी दाखल करा, असे आदेश यावेळी देण्यात आले. यामुळे काहीकाळ वातावरण संतप्त बनले होते. (प्रतिनिधी)‘ते’ ७0 लोक : केसरी गावचे नसल्याचा ग्रामपंचायतीचा अहवालकेसरी गावात तब्बल ७0 लोकसंख्या वस्तीची धनगरवाडी असून याठिकाणी सध्या भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. असे असताना केसरी ग्रामपंचायत मात्र, हे ७0 लोक आमच्या गावचे रहिवासी नसल्याचे सांगत आहेत. अशी माहिती पंढरीनाथ राऊळ यांनी दिली. याची जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांनी गंभीर दखल घेत त्याठिकाणी तत्काळ बोअरवेल मंजूर केली. गेली कित्येक वर्षे ही लोक त्या गावात राहत असतील आणि संबंधित ग्रामपंचायत त्यांना रहिवासी नसल्याचा अहवाल देत असतील तर ते गंभीर आहे. या प्रकरणी चौकशी करून जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा, असे आदेश संग्राम प्रभूगावकर यांनी दिले.जाधव यांच्या सूचनांची दखलच नाहीमी चार वर्षे पदाधिकारी म्हणून सातत्याने धनगरवाडीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, अद्याप त्यावर काहीच उपाय काढता आलेला नाही. माझ्या चार वर्षाच्या कारकिर्दीत अजूनपर्यंत योजना होऊ शकत नाही. माझ्या पाठपुराव्याचा काय उपयोग ? असा प्रश्न अंकुश जाधव यांनी सभागृहात उपस्थित केला. मात्र, यावर कोणीच जास्त खोलात न जाता हा विषय येथेच थांबविण्यात आला.