शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

खोतजुवा भागात पाण्याचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: May 23, 2015 00:35 IST

ग्रामस्थ आक्रमक : संग्राम प्रभूगावकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती

बागायत : मालवण तालुक्यातील मसुरे खोतजुवा भागातील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामस्थांनी याबाबत मसुरे-डांगमोडे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद सदस्य संग्राम प्रभूगावकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. खोतजुवा येथील पाण्याच्या प्रश्नाबाबत बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीला ग्रामसेवक एस. डी. चव्हाण, मसुरे उपसरपंच अशोक बागवे, ग्रामपंचायत सदस्य अनिल खोत, शिवसेना उपविभागप्रमुख सुहास पेडणेकर, पंढरी मसुरकर, अ‍ॅड. पूर्वा ठाकूर, गजानन ठाकूर आदी उपस्थित होते.मसुरे खोतजुवा हा भाग म्हणजे एक बेट असून चारही बाजूने खाडीचे पाणी आहे. हे पाणी खारे असल्याने पिण्यासाठी येथील ग्रामस्थांना पाणी नाही. ग्रामपंचायतीने खाजणवाडी ते खोतजुवा अशी नळपाणी योजना सुरू केली. मात्र, या नळपाणी योजनेचे पाणी पुरेसे नाही, असा ग्रामस्थांचा दावा आहे. यासाठी ग्रामस्थांनी नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य पूर्वा ठाकूर यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी गजानन ठाकूर यांच्यासमवेत ग्रामपंचायतमध्ये जावून आपले म्हणणे मांडले. त्यानुसार या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बुधवारी बैठक घेण्याचे ठरले. या बैठकीत ग्रामस्थांच्यावतीने गजानन ठाकूर यांनी बाजू मांडली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संग्राम प्रभूगावकर यांनी खोतजुवा विभागासाठी लोकसंख्या कमी असतानाही आपण राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाअंतर्गत ३१ लाख ६४ हजार ४00 रूपये किंमतीची विहीर व नळपाणी योजनेचे काम सुरू केले आहे, असा खुलासा केला. ग्रामस्थांनी यावेळी या बैठकीला मसुरे ग्रामपंचायतीच्या सरपंच गायत्री ठाकूर कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित केला. यावर सरपंच पदाचा पदभार उपसरपंच अशोक बागवे यांच्याकडे असल्याचे ग्रामसेवक व प्रभूगावकर यांनी स्पष्ट केले. त्यावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. तसेच जर सरपंचांना कामकाज हाताळता येत नसेल किंवा त्यांना प्रश्न सोडवायचे नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असा आग्रह ग्रामस्थांनी धरला. मात्र, यात संग्राम प्रभूगावकर यांनी मध्यस्ती करून हा वाद मिटविला.राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत मसुरे खाजणवाडी येथे खोदण्यात आलेल्या विहिरीचे पाणी दूषित असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. यावर प्रभूगावकर यांनी ते मान्य केले. याठिकाणी नवीन विहीर बांधण्यासाठी जागा देण्याचे साकडे किसन चांदेरकर यांनी प्रभूगावकर यांना घातले. त्याला प्रभूगावकर यांनी दुजोरा दिला. तसेच जमीन देण्याचे मान्य केले. मात्र, त्याठिकाणी पाणी दूषित पाणी मिळाल्यास चांदेकर जबाबदार राहतील असे सांगितले.सध्या नवीन विहिरीला वेळ लागणार असल्याने ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सध्या चालू असलेली नळपाणी योजनेची दुरूस्ती करून,विहिरीचा थोडा उपसा करावा व तसे केल्यास पाणीपुरवठा होईल, असे सांगितले. याची जबाबदारी जिल्हा परिषद सदस्यांनीघ्यावी, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. यावेळी खोतजुवा भागातील सुमारे ५0 ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)