शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
2
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
3
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
4
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
5
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
6
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
7
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
8
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
9
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
10
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
11
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
12
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
13
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
14
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
15
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
16
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
17
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
18
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
19
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
20
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!

खोतजुवा भागात पाण्याचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: May 23, 2015 00:35 IST

ग्रामस्थ आक्रमक : संग्राम प्रभूगावकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती

बागायत : मालवण तालुक्यातील मसुरे खोतजुवा भागातील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामस्थांनी याबाबत मसुरे-डांगमोडे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद सदस्य संग्राम प्रभूगावकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. खोतजुवा येथील पाण्याच्या प्रश्नाबाबत बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीला ग्रामसेवक एस. डी. चव्हाण, मसुरे उपसरपंच अशोक बागवे, ग्रामपंचायत सदस्य अनिल खोत, शिवसेना उपविभागप्रमुख सुहास पेडणेकर, पंढरी मसुरकर, अ‍ॅड. पूर्वा ठाकूर, गजानन ठाकूर आदी उपस्थित होते.मसुरे खोतजुवा हा भाग म्हणजे एक बेट असून चारही बाजूने खाडीचे पाणी आहे. हे पाणी खारे असल्याने पिण्यासाठी येथील ग्रामस्थांना पाणी नाही. ग्रामपंचायतीने खाजणवाडी ते खोतजुवा अशी नळपाणी योजना सुरू केली. मात्र, या नळपाणी योजनेचे पाणी पुरेसे नाही, असा ग्रामस्थांचा दावा आहे. यासाठी ग्रामस्थांनी नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य पूर्वा ठाकूर यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी गजानन ठाकूर यांच्यासमवेत ग्रामपंचायतमध्ये जावून आपले म्हणणे मांडले. त्यानुसार या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बुधवारी बैठक घेण्याचे ठरले. या बैठकीत ग्रामस्थांच्यावतीने गजानन ठाकूर यांनी बाजू मांडली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संग्राम प्रभूगावकर यांनी खोतजुवा विभागासाठी लोकसंख्या कमी असतानाही आपण राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाअंतर्गत ३१ लाख ६४ हजार ४00 रूपये किंमतीची विहीर व नळपाणी योजनेचे काम सुरू केले आहे, असा खुलासा केला. ग्रामस्थांनी यावेळी या बैठकीला मसुरे ग्रामपंचायतीच्या सरपंच गायत्री ठाकूर कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित केला. यावर सरपंच पदाचा पदभार उपसरपंच अशोक बागवे यांच्याकडे असल्याचे ग्रामसेवक व प्रभूगावकर यांनी स्पष्ट केले. त्यावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. तसेच जर सरपंचांना कामकाज हाताळता येत नसेल किंवा त्यांना प्रश्न सोडवायचे नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असा आग्रह ग्रामस्थांनी धरला. मात्र, यात संग्राम प्रभूगावकर यांनी मध्यस्ती करून हा वाद मिटविला.राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत मसुरे खाजणवाडी येथे खोदण्यात आलेल्या विहिरीचे पाणी दूषित असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. यावर प्रभूगावकर यांनी ते मान्य केले. याठिकाणी नवीन विहीर बांधण्यासाठी जागा देण्याचे साकडे किसन चांदेरकर यांनी प्रभूगावकर यांना घातले. त्याला प्रभूगावकर यांनी दुजोरा दिला. तसेच जमीन देण्याचे मान्य केले. मात्र, त्याठिकाणी पाणी दूषित पाणी मिळाल्यास चांदेकर जबाबदार राहतील असे सांगितले.सध्या नवीन विहिरीला वेळ लागणार असल्याने ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सध्या चालू असलेली नळपाणी योजनेची दुरूस्ती करून,विहिरीचा थोडा उपसा करावा व तसे केल्यास पाणीपुरवठा होईल, असे सांगितले. याची जबाबदारी जिल्हा परिषद सदस्यांनीघ्यावी, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. यावेळी खोतजुवा भागातील सुमारे ५0 ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)