शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

डोंगरपालमधून पाणी बांद्याला पोचले

By admin | Updated: May 1, 2016 00:26 IST

‘लोकमत’चा दणका : दोन दिवसात जास्त पाणी सोडणार

डोंगरपालमधून पाणी बांद्याला पोचले‘लोकमत’चा दणका : दोन दिवसात जास्त पाणी सोडणारबांदा : गेले कित्येक दिवस बांदा शाखा कालव्यातून पाणी सोडण्यास चालढकल करत असलेल्या कालवा विभागाने ‘लोकमत’च्या वृत्ताने जागे होत आज पाणी डोंगरपाल येथून सोडले. दुपारपर्यंत हे पाणी बांदा-बळवंतनगर येथे पोहोचले आहे. येत्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येणार असल्याचे कालवा विभागाने स्पष्ट केले. बांदा शाखा कालव्याची यावर्षी साफसफाई करण्यात न आल्याने कालव्यातील पाणी हे अस्वच्छ झाले आहे.यावर्षी पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता मार्च महिन्यातच कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, यासाठी बांदा सरपंच मंदार कल्याणकर यांनी पाठपुुरावा केला होता. यासाठी थेट राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना साकडे घालण्यात आले होते. त्यांनी तिलारीच्या मुख्य अभियंत्यांशी याबाबत चर्चा देखील केली होती. त्यानुसार मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच पाणी सोडण्याचे संकेत देण्यात आले होते.मात्र, कालवा विभागाने अचानक महाराष्ट्र-गोवा राज्यांच्या सीमेवर गाळेल येथे कालवा दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने पाणी सोडण्यास अडचणी निर्माण झाल्या. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या तोंडावर कालवा दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आले. याबाबत ‘लोकमत’ने २९ एप्रिलच्या अंकात ‘शाखा कालव्यातून अद्याप पाणी नाहीच’ या मथळ्याखाली कालव्याचे सचित्र वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्तामध्ये कालव्याची सध्याची स्थिती व पाणी न सोडण्यामागची कारणे सविस्तर मांडली होती. या वृत्ताची तातडीने दखल घेत कालवा विभागाने आज सकाळीच डोंगरपाल येथील गेटमधून कालव्यात पाणी सोडले.गाळेल येथून हा कालवा डिंगणे, सटमटवाडी, बांदा येथून ओटवणेपर्यंत जातो. मात्र, गेली कित्येक वर्षे कालव्याची साफसफाई करण्यात आली नाही. कालव्यातून पाणी सोडण्याचे हे दुसरे वर्ष असल्याने कालवा विभागाने कालव्याची साफसफाई करणे गरजेचे आहे. कालव्यात जंगली झाडांची वाढ झाल्याने कचऱ्याचे साम्राज्य आहे. यामुळे कालव्यातून सोडलेले पाणी कचऱ्यामुळे अस्वच्छ झाले आहे. कालव्यातून सोडलेले पाणी हे बांदा-बळवंतनगर येथेपर्यंत पोहोचले असून, येत्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येणार असल्याने पाणी ओटवणेपर्यंत जाणार आहे. (प्रतिनिधी)