शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
5
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
6
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
7
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
8
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
9
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
10
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
11
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
12
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
13
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
14
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
15
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
16
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
17
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
18
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
19
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
20
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...

डोंगरपालमधून पाणी बांद्याला पोचले

By admin | Updated: May 1, 2016 00:26 IST

‘लोकमत’चा दणका : दोन दिवसात जास्त पाणी सोडणार

डोंगरपालमधून पाणी बांद्याला पोचले‘लोकमत’चा दणका : दोन दिवसात जास्त पाणी सोडणारबांदा : गेले कित्येक दिवस बांदा शाखा कालव्यातून पाणी सोडण्यास चालढकल करत असलेल्या कालवा विभागाने ‘लोकमत’च्या वृत्ताने जागे होत आज पाणी डोंगरपाल येथून सोडले. दुपारपर्यंत हे पाणी बांदा-बळवंतनगर येथे पोहोचले आहे. येत्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येणार असल्याचे कालवा विभागाने स्पष्ट केले. बांदा शाखा कालव्याची यावर्षी साफसफाई करण्यात न आल्याने कालव्यातील पाणी हे अस्वच्छ झाले आहे.यावर्षी पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता मार्च महिन्यातच कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, यासाठी बांदा सरपंच मंदार कल्याणकर यांनी पाठपुुरावा केला होता. यासाठी थेट राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना साकडे घालण्यात आले होते. त्यांनी तिलारीच्या मुख्य अभियंत्यांशी याबाबत चर्चा देखील केली होती. त्यानुसार मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच पाणी सोडण्याचे संकेत देण्यात आले होते.मात्र, कालवा विभागाने अचानक महाराष्ट्र-गोवा राज्यांच्या सीमेवर गाळेल येथे कालवा दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने पाणी सोडण्यास अडचणी निर्माण झाल्या. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या तोंडावर कालवा दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आले. याबाबत ‘लोकमत’ने २९ एप्रिलच्या अंकात ‘शाखा कालव्यातून अद्याप पाणी नाहीच’ या मथळ्याखाली कालव्याचे सचित्र वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्तामध्ये कालव्याची सध्याची स्थिती व पाणी न सोडण्यामागची कारणे सविस्तर मांडली होती. या वृत्ताची तातडीने दखल घेत कालवा विभागाने आज सकाळीच डोंगरपाल येथील गेटमधून कालव्यात पाणी सोडले.गाळेल येथून हा कालवा डिंगणे, सटमटवाडी, बांदा येथून ओटवणेपर्यंत जातो. मात्र, गेली कित्येक वर्षे कालव्याची साफसफाई करण्यात आली नाही. कालव्यातून पाणी सोडण्याचे हे दुसरे वर्ष असल्याने कालवा विभागाने कालव्याची साफसफाई करणे गरजेचे आहे. कालव्यात जंगली झाडांची वाढ झाल्याने कचऱ्याचे साम्राज्य आहे. यामुळे कालव्यातून सोडलेले पाणी कचऱ्यामुळे अस्वच्छ झाले आहे. कालव्यातून सोडलेले पाणी हे बांदा-बळवंतनगर येथेपर्यंत पोहोचले असून, येत्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येणार असल्याने पाणी ओटवणेपर्यंत जाणार आहे. (प्रतिनिधी)