शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार कामांचा गांभीर्याने आढावा घेणार

By admin | Updated: December 21, 2015 00:57 IST

अनिल भंडारी : वैभव नाईक यांना आश्वासन

कणकवली : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात झालेल्या कामांचा आढावा घेण्याची गरज आहे याकडे आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे शुक्रवारी लक्ष वेधले. गतवर्षी झालेल्या अनेक कामांमध्ये सध्या पाणीच उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या कामांवर खर्च झालेला निधी वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यावर्षी कमी प्रमाणात झालेला पाऊस पाहता पाण्याबाबत आतापासून ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे, असे वैभव नाईक यांनी सांगितले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेचा गांभीर्याने आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. शुक्रवारी आमदार नाईक यांनी जिल्हाधिकारयांची भेट घेऊन विविध विकासकामांबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, कणकवली तालुकाप्रमुख सचिन सावंत, रूपेश आमडोसकर, राजेश ढाके, उपतालुकाप्रमुख सुनील बोंद्रे, भगवान परब, योगेश तावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत अनेक कामे निकृष्ट झाल्याने त्या कामांमध्ये यावर्षी पाणीच साचले नाही. ज्याठिकाणी कामांची आवश्यकता आहे, तेथे ही कामे प्राधान्याने न करता चुकीच्या जागी कामे केल्याने निधीचा अपव्यय झाल्याचे नाईक यांनी सांगितले. जलयुक्त शिवार योजनेचा गंभीरपणे आढावा घेण्यात येणार आहे. या अंतर्गत नव्याने कामे सुरू करण्याबाबतही कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी भंडारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)