शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

जलयुक्त शिवार कामांचा गांभीर्याने आढावा घेणार

By admin | Updated: December 21, 2015 00:57 IST

अनिल भंडारी : वैभव नाईक यांना आश्वासन

कणकवली : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात झालेल्या कामांचा आढावा घेण्याची गरज आहे याकडे आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे शुक्रवारी लक्ष वेधले. गतवर्षी झालेल्या अनेक कामांमध्ये सध्या पाणीच उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या कामांवर खर्च झालेला निधी वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यावर्षी कमी प्रमाणात झालेला पाऊस पाहता पाण्याबाबत आतापासून ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे, असे वैभव नाईक यांनी सांगितले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेचा गांभीर्याने आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. शुक्रवारी आमदार नाईक यांनी जिल्हाधिकारयांची भेट घेऊन विविध विकासकामांबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, कणकवली तालुकाप्रमुख सचिन सावंत, रूपेश आमडोसकर, राजेश ढाके, उपतालुकाप्रमुख सुनील बोंद्रे, भगवान परब, योगेश तावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत अनेक कामे निकृष्ट झाल्याने त्या कामांमध्ये यावर्षी पाणीच साचले नाही. ज्याठिकाणी कामांची आवश्यकता आहे, तेथे ही कामे प्राधान्याने न करता चुकीच्या जागी कामे केल्याने निधीचा अपव्यय झाल्याचे नाईक यांनी सांगितले. जलयुक्त शिवार योजनेचा गंभीरपणे आढावा घेण्यात येणार आहे. या अंतर्गत नव्याने कामे सुरू करण्याबाबतही कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी भंडारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)