शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

जलयुक्त शिवार कामांचा गांभीर्याने आढावा घेणार

By admin | Updated: December 21, 2015 00:57 IST

अनिल भंडारी : वैभव नाईक यांना आश्वासन

कणकवली : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात झालेल्या कामांचा आढावा घेण्याची गरज आहे याकडे आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे शुक्रवारी लक्ष वेधले. गतवर्षी झालेल्या अनेक कामांमध्ये सध्या पाणीच उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या कामांवर खर्च झालेला निधी वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यावर्षी कमी प्रमाणात झालेला पाऊस पाहता पाण्याबाबत आतापासून ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे, असे वैभव नाईक यांनी सांगितले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेचा गांभीर्याने आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. शुक्रवारी आमदार नाईक यांनी जिल्हाधिकारयांची भेट घेऊन विविध विकासकामांबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, कणकवली तालुकाप्रमुख सचिन सावंत, रूपेश आमडोसकर, राजेश ढाके, उपतालुकाप्रमुख सुनील बोंद्रे, भगवान परब, योगेश तावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत अनेक कामे निकृष्ट झाल्याने त्या कामांमध्ये यावर्षी पाणीच साचले नाही. ज्याठिकाणी कामांची आवश्यकता आहे, तेथे ही कामे प्राधान्याने न करता चुकीच्या जागी कामे केल्याने निधीचा अपव्यय झाल्याचे नाईक यांनी सांगितले. जलयुक्त शिवार योजनेचा गंभीरपणे आढावा घेण्यात येणार आहे. या अंतर्गत नव्याने कामे सुरू करण्याबाबतही कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी भंडारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)