शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जलसंवर्धन लोक चळवळ व्हावी

By admin | Updated: May 13, 2016 23:38 IST

अनिल भंडारी : कणकवलीतील जानवली नदीत गाळ उपसा कामास सुरूवात

कणकवली : भविष्यातील पाणीटंचाई रोखण्यासाठी उपलब्ध जलस्त्रोत वाढवून ते टिकविणे गरजेचे आहे. त्यासाठीच जानवली नदीपात्रातील गाळ काढण्यात येत आहे. जलसंवर्धनात जनतेचा सहभाग लाभल्यास ती एक लोकचळवळ बनेल. त्यासाठीच आमचे प्रयत्न सुरु आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी येथे केले.कणकवली तहसील कार्यालयाच्या पुढाकाराने जलयुक्त शिवार अभियान व लोकसहभागातून जानवली नदी पात्रातील गाळ काढण्यात येणार आहे. या गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गणपती साना येथे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रांताधिकारी संतोष भिसे, तहसीलदार समीर घारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर, कृषी विभागाचे राठोड, नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, मुख्याधिकारी अवधूत तावडे, नायब तहसीलदार आर. जे. पवार, बांधकाम सभापती रुपेश नार्वेकर, नगरसेवक सुशांत नाईक, बंडू हर्णे, राजश्री धुमाळे, मेघा गांगण, प्रा. दिवाकर मुरकर, जेष्ठ नागरिक भाई खोत, अशोक करंबेळकर, संजय मालंडकर, उमेश वाळके, राजू बागवान, रोटरी क्लबचे पदाधिकारी, केमिस्ट असोसिएशनचे सुहास हर्णे, मकरंद घळसासी, संजय घाडी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले, जानवली नदी पुनरुज्जीवनासाठी शासनाकडे ३७ कोटींचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. या माध्यमातून जानवली नदीकिनाऱ्यावरील १५ हून अधिक गावांमध्ये जलस्रोत वाढणार आहेत. कुडाळ, देवगड आदी परिसरात गाळ काढण्याच्या कामाला लोकांचा चांगला सहभाग मिळत आहे. याबाबत आणखी लोकजागृती होणे गरजेचे आहे. (वार्ताहर)समीर घारे : जलसंवर्धनाची चळवळ पुढे न्यावीजानवली नदीतील गणपती साना येथे गाळ काढण्याचा प्रारंभ करण्यात आला असून येत्या चार-पाच दिवसांत हा गाळ काढण्यात येणार आहे. २००० हून अधिक डंपर गाळ उपसा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नदीच्या पाण्यातील गाळ शेतकऱ्यांना सुपीक जमिनीसाठी कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न घेता देण्यात येणार आहे. बांधकाम व्यावसायिक व इतरांना भरावासाठी नदीपात्रातील गाळ देण्यात येणार आहे. गाळ उपसण्याच्या या कामात लोकहित लक्षात घेऊन नागरिकांनी सहभागी व्हावे, आणि जलसंवर्धनाची चळवळ पुढे न्यावी, असे आवाहन तहसीलदार समीर घारे यांनी केले.जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावेप्रांताधिकारी संतोष भिसे यांनीही या लोकचळवळीत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. लोकजागृती झाली तर बऱ्याच अंशी हे उद्दिष्ट साध्य होईल. कणकवली नगरपंचायतीच्यावतीने गणपती सान्याचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.