शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
2
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
3
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
4
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
5
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
6
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
7
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
8
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
9
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
10
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
11
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
12
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
13
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
14
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
15
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
16
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
17
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
18
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
19
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
20
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?

जलसंवर्धन लोक चळवळ व्हावी

By admin | Updated: May 13, 2016 23:38 IST

अनिल भंडारी : कणकवलीतील जानवली नदीत गाळ उपसा कामास सुरूवात

कणकवली : भविष्यातील पाणीटंचाई रोखण्यासाठी उपलब्ध जलस्त्रोत वाढवून ते टिकविणे गरजेचे आहे. त्यासाठीच जानवली नदीपात्रातील गाळ काढण्यात येत आहे. जलसंवर्धनात जनतेचा सहभाग लाभल्यास ती एक लोकचळवळ बनेल. त्यासाठीच आमचे प्रयत्न सुरु आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी येथे केले.कणकवली तहसील कार्यालयाच्या पुढाकाराने जलयुक्त शिवार अभियान व लोकसहभागातून जानवली नदी पात्रातील गाळ काढण्यात येणार आहे. या गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गणपती साना येथे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रांताधिकारी संतोष भिसे, तहसीलदार समीर घारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर, कृषी विभागाचे राठोड, नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, मुख्याधिकारी अवधूत तावडे, नायब तहसीलदार आर. जे. पवार, बांधकाम सभापती रुपेश नार्वेकर, नगरसेवक सुशांत नाईक, बंडू हर्णे, राजश्री धुमाळे, मेघा गांगण, प्रा. दिवाकर मुरकर, जेष्ठ नागरिक भाई खोत, अशोक करंबेळकर, संजय मालंडकर, उमेश वाळके, राजू बागवान, रोटरी क्लबचे पदाधिकारी, केमिस्ट असोसिएशनचे सुहास हर्णे, मकरंद घळसासी, संजय घाडी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले, जानवली नदी पुनरुज्जीवनासाठी शासनाकडे ३७ कोटींचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. या माध्यमातून जानवली नदीकिनाऱ्यावरील १५ हून अधिक गावांमध्ये जलस्रोत वाढणार आहेत. कुडाळ, देवगड आदी परिसरात गाळ काढण्याच्या कामाला लोकांचा चांगला सहभाग मिळत आहे. याबाबत आणखी लोकजागृती होणे गरजेचे आहे. (वार्ताहर)समीर घारे : जलसंवर्धनाची चळवळ पुढे न्यावीजानवली नदीतील गणपती साना येथे गाळ काढण्याचा प्रारंभ करण्यात आला असून येत्या चार-पाच दिवसांत हा गाळ काढण्यात येणार आहे. २००० हून अधिक डंपर गाळ उपसा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नदीच्या पाण्यातील गाळ शेतकऱ्यांना सुपीक जमिनीसाठी कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न घेता देण्यात येणार आहे. बांधकाम व्यावसायिक व इतरांना भरावासाठी नदीपात्रातील गाळ देण्यात येणार आहे. गाळ उपसण्याच्या या कामात लोकहित लक्षात घेऊन नागरिकांनी सहभागी व्हावे, आणि जलसंवर्धनाची चळवळ पुढे न्यावी, असे आवाहन तहसीलदार समीर घारे यांनी केले.जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावेप्रांताधिकारी संतोष भिसे यांनीही या लोकचळवळीत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. लोकजागृती झाली तर बऱ्याच अंशी हे उद्दिष्ट साध्य होईल. कणकवली नगरपंचायतीच्यावतीने गणपती सान्याचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.