शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
3
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
4
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
5
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
6
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
7
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
8
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
10
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
11
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
12
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
13
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
14
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
15
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
16
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
17
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
19
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
20
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार

जलसंवर्धन लोक चळवळ व्हावी

By admin | Updated: May 13, 2016 23:38 IST

अनिल भंडारी : कणकवलीतील जानवली नदीत गाळ उपसा कामास सुरूवात

कणकवली : भविष्यातील पाणीटंचाई रोखण्यासाठी उपलब्ध जलस्त्रोत वाढवून ते टिकविणे गरजेचे आहे. त्यासाठीच जानवली नदीपात्रातील गाळ काढण्यात येत आहे. जलसंवर्धनात जनतेचा सहभाग लाभल्यास ती एक लोकचळवळ बनेल. त्यासाठीच आमचे प्रयत्न सुरु आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी येथे केले.कणकवली तहसील कार्यालयाच्या पुढाकाराने जलयुक्त शिवार अभियान व लोकसहभागातून जानवली नदी पात्रातील गाळ काढण्यात येणार आहे. या गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गणपती साना येथे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रांताधिकारी संतोष भिसे, तहसीलदार समीर घारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर, कृषी विभागाचे राठोड, नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, मुख्याधिकारी अवधूत तावडे, नायब तहसीलदार आर. जे. पवार, बांधकाम सभापती रुपेश नार्वेकर, नगरसेवक सुशांत नाईक, बंडू हर्णे, राजश्री धुमाळे, मेघा गांगण, प्रा. दिवाकर मुरकर, जेष्ठ नागरिक भाई खोत, अशोक करंबेळकर, संजय मालंडकर, उमेश वाळके, राजू बागवान, रोटरी क्लबचे पदाधिकारी, केमिस्ट असोसिएशनचे सुहास हर्णे, मकरंद घळसासी, संजय घाडी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले, जानवली नदी पुनरुज्जीवनासाठी शासनाकडे ३७ कोटींचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. या माध्यमातून जानवली नदीकिनाऱ्यावरील १५ हून अधिक गावांमध्ये जलस्रोत वाढणार आहेत. कुडाळ, देवगड आदी परिसरात गाळ काढण्याच्या कामाला लोकांचा चांगला सहभाग मिळत आहे. याबाबत आणखी लोकजागृती होणे गरजेचे आहे. (वार्ताहर)समीर घारे : जलसंवर्धनाची चळवळ पुढे न्यावीजानवली नदीतील गणपती साना येथे गाळ काढण्याचा प्रारंभ करण्यात आला असून येत्या चार-पाच दिवसांत हा गाळ काढण्यात येणार आहे. २००० हून अधिक डंपर गाळ उपसा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नदीच्या पाण्यातील गाळ शेतकऱ्यांना सुपीक जमिनीसाठी कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न घेता देण्यात येणार आहे. बांधकाम व्यावसायिक व इतरांना भरावासाठी नदीपात्रातील गाळ देण्यात येणार आहे. गाळ उपसण्याच्या या कामात लोकहित लक्षात घेऊन नागरिकांनी सहभागी व्हावे, आणि जलसंवर्धनाची चळवळ पुढे न्यावी, असे आवाहन तहसीलदार समीर घारे यांनी केले.जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावेप्रांताधिकारी संतोष भिसे यांनीही या लोकचळवळीत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. लोकजागृती झाली तर बऱ्याच अंशी हे उद्दिष्ट साध्य होईल. कणकवली नगरपंचायतीच्यावतीने गणपती सान्याचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.