शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

आंबोलीतील पर्यटन व्यवसायावर 'पाणी'

By admin | Updated: July 6, 2014 00:31 IST

पर्यटकांची पाठ : पावसाअभावी व्यावसायिक आर्थिक अडचणीत

महादेव भिसे ल्ल आंबोलीपाऊस म्हटल्यावर सगळ्यांचाच आवडता. त्यातच पावसाळ्यात आंबोलीस फिरण्यासासाठी येणे म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच. चातक पक्षी ज्याप्रमाणे पावसाची वाट पाहतो, त्याचप्रमाणे महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक तसेच जिल्ह्यातील पर्यटक व आंबोलीतील तमाम पर्यटन व्यावसायिक पावसाची वाट पाहत असतात. कारण आंबोलीतील पर्यटन. मात्र, पावसाने यावर्षी पूर्णपणे पाठ फिरविली आहे. त्यामुळे आंबोलीतील पर्यटन व्यवसायावर त्याचा परिणाम होऊन व्यावसायिकांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. दरवर्षी जुलै महिन्यापर्यंत होणाऱ्या लाखोच्या मिळकतीवर त्यांना पाणी सोडावे लागले आहे. श्रावण मास सुरू झाल्यावर आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावते. यावर्षी २२ जुलै रोजीच श्रावणाची सुरुवात होत आहे. श्रावण महिना म्हटल्यावर, सणासुदीचा कालावधी सुरू होतो. या मासात धार्मिक नागरिक मांसाहार हेतूपुरस्सर टाळतात आणि तळीराम पर्यटकही श्रावण मासात सभ्य गृहस्थ बनतात. त्यामुळे या कालावधीत आंबोलीत पर्यटकांचा शुकशुकाट असतो. पर्यटन व्यवसायावरही याचा परिणाम होतो. आंबोलीतील पावसाळी पर्यटनाच्या दृष्टीने हताश करणारी गोष्ट म्हणजे, यावर्षी अद्यापपर्यंत मिरगानंतर केवळ पाच दिवस पाऊस पडला आणि तोही तुरळकच. जुलै महिन्याच्या सुरुवातीपर्यंत आंबोली येथे १२५ इंचापर्यंत पावसाची नोंद होते. यामुळे आंबोलीतील मुख्य धबधब्यासह सर्व धबधबे पूर्णपणे प्रवाहीत होत असतात. पावसाळ्यातील चार महिन्यात सूर्याचे दर्शनही दुर्लभ असते. रिमझिम पडणारा पाऊस, धुक्यात हरवलेल्या वाटा आणि त्यांच्या बाजूने फेसाळणारे धबधबे असे पावसाळ्यातील मनमोहक दृश्य पर्यटकांना भावते. त्यामुळेच दरवर्षी आंबोलीतील पर्यटकांच्या संख्येत हजारोंच्या संख्येने वाढ होत आहे. आंबोलीतील हॉटेल्समधील पावसाळी पर्यटनासाठीचे आरक्षण दोन ते तीन महिने आगाऊ गेले जाते. यावर्षीही आंबोली येथील सर्व हॉटेल्स पर्यटकांनी आरक्षित केली होती. परंतु पाऊस नसल्याने आंबोलीतील धबधबे प्रवाहीत झाले नाहीत. आंबोलीतही अन्य ठिकाणांप्रमाणे उन्हाचा मारा सहन करावा लागत होता. यामुळेच पर्यटकांनी दोन ते तीन महिन्यांपूर्वी केलेली आरक्षणे रद्द केली. सद्यस्थितीत काही प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे आंबोलीत काही प्रमाणात पर्यटक येतात. परंतु पावसाला जोर नसल्याने आणि धबधबे प्रवाहित झाले नसल्याने पर्यटकांना माघारी फिरावे लागत आहे.