शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

चाळीस वर्षांपासून पाण्याची आस!

By admin | Updated: November 20, 2015 00:10 IST

वाई तालुक्याचा पश्चिम भाग : कृष्णेचे पाणी शिवारात येणार का?

संजीव वरे -- वाई तालुक्यात धोम धरणाच्या निर्मितीला चाळीसहून अधिक वर्षे लोटली आहे. धरणात येथील शेतकऱ्याच्या जमिनी गेल्या, अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले. धरणामुळे राज्यातील हजारो एकर जमिनी ओलिताखाली आहे. मात्र, धरणाच्या काठावरील व शेतीपाण्यापासून वंचित असलेल्या गावातील शेतकऱ्यांची जमीन तहानलेली आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने जललक्ष्मी योजनेतून पाणी देण्याची मागणी होऊ लागली आहे.वाई तालुक्याच्या पश्चिम भागात कृष्णा नदीवर धोम व बलकवडी ही दोन धरणे बांधण्यात आली. या भागात दरवर्षी पावसाचे प्रमाण जास्त असते; परंतु यावर्षी पाऊस कमी पडल्याने बलकवडी धरण भरले. परंतु धोम धरणात सरासरी चाळीस टक्केच पाणीसाठा झाला आहे. परिणामी सर्वत्र दुष्काळी व पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होत आहे. धोम धरणनिर्मितीच्या वेळी धरणाच्या काठावरील व शेतीपाण्यापासून वंचित असलेल्या गावांना सहा टक्के पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला होता. व शासनाच्या वतीने जललक्ष्मी योजना करून दिली जाणार होती. या योजनेसाठी येथील जनतेने मोठा लढा दिला. यावर्षी सर्वत्र पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट सामोरे येत आहे. जललक्ष्मी योजनेतून पाणी सोडावे ,अशी मागणी या परिसरातील शेतकरी व जनतेतून होऊ लागली आहे. त्यामुळे कृष्णेचे पाणी शिवारात पाहण्याची चाळीस वर्षांपासूनचे स्वप्त आता तरी पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या योजनेतून पाणी सोडण्याची मागणी माजी सभापती विजयसिंह नायकवडी, बाजार समितीचे संचालक दत्ता भणगे, महादेव वाडकर, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष महेंद्र पुजारी, मालतपूरचे माजी सरपंच किसन वाडकर, दसवडीचे सुनील फणसे, कुसगावचे उपसरपंच विनायक वाडकर, आनंदराव हगवणे, सदाशिव वरे, हरिभाऊ वरे, एकसरचे माजी सरपंच रघुनाथ मालुसरे, बाळकृष्ण तरडे, पसरणीच्या उपसरपंच शुभांगी महांगडे, विलास येवले, बाजीराव महांगडे, माजी सरपंच बाबू शिर्के आदींनी आमदार मकरंद पाटील यांच्याकडे केली आहे. दुष्काळी भागाला पाणी सोडणारयावर्षी महाबळेश्वर आणि धोम, बलकवडी धरण परिसरातही पाण्याचे प्रमाण खूपच कमी झाले. त्यामुळे धोम धरणात फक्त चाळीस टक्केच पाणीसाठा झाला. गेल्या काही दिवसांत बलकवडी धरणातून धोम धरणात मोठ्या प्रमाणात सोडले आहे. त्यामुळे दुष्काळी भागाला व दोन्ही कालव्यांतून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन पाणी नियोजनाच्या तयारीला लागले आहे.४५ कोटींचा निधी आलाया योजनेसाठी चाळीस वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. अखेर बलकवडी धरणाच्या या पाण्यात या योजनेची जलवाहिनी टाकली गेली. धोमधरणातील राखीव पाणीसाठा व बलकवडी धरणात ठेवून बंदिस्त जलवाहिनेने बलकवडी ते वाई ग्रामीण अशी सुमारे २५ किलोमीटर अंतराहून जास्त लांबून पाणी आणले गेले आहे. मकरंद पाटील या मतदारसंघाचे आमदार झाल्यानंतर ४५ कोटींचा निधी उपलब्ध झाला. संपूर्ण सिमेंट जलवाहिनी व जागोजागी पाणी वितरणाची दारी व एअरव्हॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून वाई तालुक्याच्या पश्चिम भागाची मागणी असलेली जललक्ष्मी योजनेचे काम पूर्ण झाले आहे. येत्या चार दिवसांत या जलवाहिनीतून पाणी सोडून यशस्वी चाचणी घेण्यात येणार आहे. या योजनेमुळे या भागातील पिण्याचा व शेतीपाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.- मकरंद पाटील, आमदार