शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

पाण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा

By admin | Updated: July 25, 2014 22:53 IST

नळपाणीपुरवठा योजना तब्बल १२ वर्षानंतरही अपूर्णावस्थेत

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत विशेष घटक योजनेतून सन २00२ मध्ये घेण्यात आलेली सुकळवाड पाताडेवाडी येथील नळपाणीपुरवठा योजना तब्बल १२ वर्षानंतरही अपूर्णावस्थेत आहे. याकडे ग्रामपंचायतीकडून डोळेझाक होत असल्याने पाताडेवाडी मागासवर्गीय ग्रामस्थ पाण्यापासून वंचित राहिले आहेत. तरी नळयोजना पूर्ण करुन पाणी प्रश्न सोडवावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पाताडेवाडी ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.सुकळवाड पाताडेवाडी या मागासवस्तीमध्ये समाजकल्याण विभागामार्फत विशेष घटक योजनेंतर्गत सन २00२ मध्ये नळपाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेच्या कामाचा ठेका ग्रामपंचायत सुकळवाडने घेतला होता. यामध्ये विहीर खोदाई, बांधकाम पाईपलाईन, वीजमिटर, पंप, फिटिंग आदी कामे झाली. मात्र, पाण्याची साठवण टाकी अद्याप बसविण्यात आली नाही. या कामावर शासनाचे लाखो रुपये खर्च होऊनही तेथील रहिवाशी गेली १२ वर्षे पाण्यापासून वंचित राहिले आहेत. नळयोजनेचे अपूर्ण राहिलेले काम सुकळवाड ग्रामपंचायतीने पूर्ण करावयाचे असताना काम पूर्ण नसल्याने ही योजना ग्रामपंचायत ताब्यात घेत नाही. गेली १२ वर्षे लक्ष वेधूनही याकडे ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष केला जात आहे. ही पाताडेवाडीतील मागासवर्गीयांची क्रूर चेष्टा आहे. १२ वर्षात चार सरपंचानी सुकळवाड ग्रामपंचायतीवर कारभार केला. तरीही पाण्याचा प्रश्न कायम आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण नको म्हणून ग्रामस्थांनीच पाण्याची साठवण टाकी नसताना पंपाने थेट पाणीपुरवठा करण्यास २00५ सालापासून सुरुवात केली. वीज बिल, देखभाल दुरुस्तीवर गेली ९ वर्षे ग्रामस्थ खर्च करीत आहेत. सन २00२ ते २0१४ अशी १२ वर्षे अपूर्णस्थितीत असलेली योजना मोठ्या दुरुस्तीस आली आहे. यासाठी येणारा खर्च कोण करणार? हा प्रश्न आहे. याकडे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी पाताडेवाडी ग्रामस्थांनी सुकळवाड सरपंच, मुख्य कार्यकारी अधिकारी, समाजकल्याण सभापती, गटविकास अधिकारी मालवण यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. पाताडेवाडी नळयोजनेचे काम तत्काळ पूर्ण करावे, पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)