शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

प्रभाग क्रमांक १ मध्ये तिरंगी तर २ मध्ये दुरंगी लढत रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2016 00:08 IST

कुडाळ नगरपंचायत निवडणूक : उमेदवारांचे चित्र स्पष्ट ; जनतेच्या विश्वासावर सर्वांचेच भवितव्य अवलंबून-कुडाळ गावाकडून नगराकडे

रजनीकांत कदम =कुडाळ नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. १ कविलकाटे या प्रभागातील चुरशीची लढत ही काँग्रेस, शिवसेना व भाजप पुरस्कृत उमेदवार यांच्यात होणार तर प्रभाग क्र.२ भैरववाडी प्रभागात लढत काँग्रेस व शिवसेना उमेदवार यांच्यात दुरंगी होणार असून येथील मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार हे लवकरच समजणार आहे. कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक १७ एप्रिल रोजी होत असून ४ एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. यावेळी सर्व प्रभागातील एकूण ११ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता याठिकाणी प्रत्येक प्रभागातील उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या दरम्यान प्रभाग क्र. १ कविलकाटे मस्जिद मोहल्ला या प्रभागाचा विचार करता या प्रभागात कविलकाटे व मस्जिद मोहल्ल्याचा अंशत: भाग येत आहे. या ठिकाणी खुला प्रवर्ग असे आरक्षण पडले आहे. या प्रभागात एकूण ८०४ एवढे मतदार आहेत. यामध्ये पुरुष ४१९ व महिला मतदार ३८५ आहेत. या प्रभागातून सावळाराम जळवी (काँग्रेस), समील जळवी (काँग्रेस), महेंद्र्र वेंगुर्लेकर (शिवसेना), हेमंत मातोंडकर (अपक्ष), नसरुद्दिन काजरेकर (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. यामध्ये काँग्रेसच्यावतीने दोन उमेदवारी अर्ज होते. त्यापैकी समील जळवी याने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेस, शिवसेना या उमेदवारांसहित काशिराम मातोंडकर यांनी अपक्ष मधून अर्ज भरला होता. मात्र, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांची उमेदवारी ही भाजप पुरस्कृत होत असून याबरोबर एक अपक्ष उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.दरम्यान, या प्रभागातील विकास कामांचा विचार करता सर्व प्रभागांमध्ये असलेल्या मुलभूत सोयी सुविधांचा प्रश्न, समस्या याही प्रभागात जाणवत आहेत. विशेष करून हा प्रभाग भौगोलिकदृष्ट्या मोठा असून काही ठिकाणी योग्य प्रमाणात अजूनही रस्ते व्यवस्थितरित्या झालेले नाहीत, तसेच पाणी समस्या व इतर मुलभूत सोयी सुविधांचा अभाव असे प्रश्न याठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत.या प्रभागात खरी लढत ही काँग्रेस व शिवसेना व भाजप प्रणित उमेदवार यांच्यात होणार असून आतापर्यंतच्या येथील राजकीय इतिहासात या प्रभागावर शिवसेनेचे वर्चस्व हे शिवसेना उमेदवारासाठी जमेची बाजू आहे तर शिवसेनेची सत्ता असून या प्रभागातील जर काही विकासकामे रखडली असतील किंवा झाली नसतील तर ही काँग्रेस उमेदवारासाठी जमेची बाजू आहे तसेच काँग्रेसचा उमेदवार हा नवीन चेहरा असल्याने तीही एक जमेची बाजू काँग्रेसच्या बाबतीत आहे. तसेच काशिराम मातोंडकर यांनी अपक्षमधून अर्ज भरला होता. मात्र, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आपली उमेदवारी ही भाजप पुरस्कृत केल्याने आता या प्रभागातील लढतीत खऱ्या अर्थाने चुरस निर्माण होणार हे निश्चित आहे.तर प्रभाग क्र. २ भैरववाडी, पानबाजार या प्रभागाचा विचार करता या प्रभागात भैरववाडी, पानबाजार अंशत: या वाड्या येत असून येथे खुला प्रवर्ग आरक्षण पडले आहे. या प्रभागात एकूण मतदार संख्या ७९३ एवढी असून यापैकी पुरुष ३९० व महिला ४०३ मतदार आहेत. येथील प्रभागात अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण किंवा डांबरीकरण करणे, नळपाणी योजना घराघरात पोहचविणे, ड्रेनेज व्यवस्था निर्माण करणे, पथदीप लावणे, अंतर्गत गटार व सांडपाणी सोडण्याची व्यवस्था करणे, मच्छीमार्केटमधील सांडपाणी तसेच कचऱ्याचा प्रश्न सोडविणे, शौचालये, उघडी गटारे, शेतकऱ्यांसाठी विशेष पाणी योजना राबविणे, रस्त्यावरील तीव्र वळणावर गतिरोधक बसविण्याबाबत पाठपुरावा करणे, भंगसाळ नदीच्या पुराचे पाणी अनेकदा या प्रभागातील रस्त्यांवर येते, पावसाळ्यात गटार तुंबतात असे अनेक प्रश्न, समस्या येथील प्रभागात असून याबाबत येथील लोकांनी वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधले. मात्र, समस्या जैसे थे राहिल्या आहेत. अनेक प्रश्न, समस्या या प्रभागात आहेत. त्यामुळे या समस्या सोडवून जनतेला सोयी सुविधा देण्याचा जो कोण विश्वास देईल त्याच्याच मागे येथील जनता राहणार आहे. या प्रभागात काँग्रेसकडून ओंकार तेली व शिवसेनेकडून राजन नाईक हे उमेदवारी लढवित आहेत. याठिकाणी इतर पक्षाच्या व अपक्ष म्हणून कोणीही अर्ज भरलेला नाही.कुडाळ शहराच्या मध्यवर्ती असलेल्या या प्रभागामध्ये काही प्रमाणात मुलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे येथील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी विकासाचा अजेंडा कोण प्रखरपणे मांडतो व जनता त्याच्यावर किती विश्वास ठेवते यावर येथील उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. काँग्रेसला कडवी झुंज दरम्यान, प्रभाग क्र. १ मधून तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य हे महेंद्र वेंगुर्लेकर होते व त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षातून उमेदवारी अर्ज भरला आहे. व त्यांच्यासमोर काँग्रेसने तेथीलच सावळाराम जळवी यांना उमेदवारी दिली असून काँग्रेसला या ठिकाणी विजयासाठी झुंज द्यावी लागणार हे मात्र निश्चित.काँग्रेसकडून नवीन युवा चेहरा काँग्रेसच्यावतीने उमेदवार असलेले ओंकार तेली हे नवीन व युवा चेहरा काँग्रेसने दिला असून त्याच्या बाजूने प्रभागातील युवा वर्ग मोठ्या प्रमाणात असू शकतो ही संभावना आहे. त्यामुळे ही काँग्रेसची जमेची बाजू असू शकते. भाजपचा उमेदवार नाहीप्रभाग २ मध्ये विशेष म्हणजे भाजपने उमेदवार दिलेला नाही. काही प्रभागात उमेदवार मिळाले नसल्याचे कारण भाजपच्यावतीने सांगण्यात आले होते. दरम्यान, भाजपचा उमेदवार नसल्यामुळे येथील भाजपची मते कुठे जातील, कोणाला मिळतील याबाबत प्रश्नचिन्हच आहे. दहा वर्षे नळपाणी योजनेच्या पाण्याची प्रतीक्षाचप्रभाग १ मध्ये ग्रामपंचायत असतानाच सुरु असलेल्या नळपाणी योजनेच्या टाकीचे काम पूर्ण न झाल्याने येथील बावकरवाडी, मळीवाडी या ग्रामस्थांना गेली १० वर्षे एप्रिल, मे महिन्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. या प्रभागाचा राजकीय इतिहास पाहता आतापर्यंत या ठिकाणाहून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी जास्तीत जास्त शिवसेना पक्षाकडून गेले आहेत. येथील तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य व सध्याचे उमेदवार महेंद्र वेंगुर्लेकर हे शिवसेना पक्षाचेच आहेत. अपक्षांवर निकाल अवलंबून या प्रभाग क्र. १ ला मस्जिद मोहल्याचा अंशत: भाग जोडलेला आहे. तसेच या ठिकाणी नसरुद्दिन काजरेकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. त्यामुळे या समाजाची मते कोणाकडे जाणार हे ही महत्त्वाचे आहे. येथील अपक्ष यांना किती मते पडतील यावरही येथील निकाल अवलंबून राहणार आहे.