शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बांदा परिसरात पाण्यासाठी होणार भटकंती

By admin | Updated: April 20, 2017 22:47 IST

टंचाईची समस्या गंभीर : प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना नाही, नागरिकांचे होणार हाल

नीलेश मोरजकर ल्ल बांदाबांदा शहर व परिसरात एप्रिल महिन्याच्या अखेरीसच पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. विहिरींनी तळ गाठल्याने व तेरेखोल नदीपात्र कोरडे पडू लागल्याने ऐन मे महिन्यात या परिसरातील जनतेला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. या भागातील पाणीटंचाई निवारण्यासाठी प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केली नसल्याने स्थानिकांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येणार आहे.बांदा परिसरातून जाणाऱ्या तिलारी शाखा कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, कालव्याची झालेली दुरवस्था, ठिकठिकाणी सुरु असलेले दुरुस्तीचे काम यामुळे कालव्यातील पाणी हे कमी क्षमतेने सोडण्यात आले आहे. पालापाचोळा व कचऱ्याने कालवा अस्वच्छ झाल्याने सोडण्यात आलेले पाणीदेखील गढूळ झाले आहे.यावर्षी उष्णतेच्या झळा वाढल्याने याचा गंभीर परिणाम पाणीसाठ्यांवर झाला आहे. बांदा शहरातील जनतेलाही पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे. शहरातील ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेला चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तेरेखोल नदीपात्र कोरडे पडल्याने याचा परिणाम या नदीपात्रावर अवलंबून असलेल्या ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजनांवर झाला आहे. तेरेखोल नदीपात्रावर बांदा शहर, वाफोली, विलवडे, ओटवणे, इन्सुली, शेर्ले गावांच्या नळपाणी योजना आहेत. ग्रामीण भागात बारमाही वाहणारे ओहोळ व जलस्त्रोत हे देखील आटल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे.बांदा परिसरातील मुख्य जीवनवाहिनी असलेली तेरेखोल नदी ही एप्रिल महिन्यातच ठिकठिकाणी कोरडी पडलेली आहे. भरतीच्या वेळी येणारे समुद्राचे खारे पाणी हे बांद्यापर्यंत येत असल्याने नदीपात्रातील पाणी खारे झाले आहे. हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने व शेतीसाठीदेखील वापरता येत नसल्याने परिसरातील पिण्याच्या पाण्याची समस्या ही गंभीर बनली आहे. खारे पाणी शेती बागायतींना वापरता येत नसल्याने परिसरातील शेती व शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकविलेल्या बागायती करपल्या आहेत. तीव्र पाणीटंचाईमुळे तेरेखोल नदीपात्रावर अवलंबून असलेल्या नळपाणी योजना देखील धोक्यात आल्या आहेत. बांदा शहराची वाढती लोकसंख्या हे याठिकाणी असलेली बाजारपेठ यामुळे बांदा शहरात पाण्याची मागणी ही वाढतीच असते. अशा परिस्थितीत पाणीटंचाई निर्माण झाल्याने स्थानिकांना पाण्यासाठी दाहीदिशा कराव्या लागत आहेत.३८ वर्षांपूर्वी वाफोली परिसरात हरितक्रांती होण्यासाठी इंडो-जर्मन प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेले लघु पाटबंधारे विभागाचे धरण देखील यावर्षी एप्रिल महिन्यातच पूर्णपणे कोरडे पडले आहे. त्यामुळे या परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. उन्हाळ्याच्या झळा या तीव्र असल्याने पाण्याअभावी स्थानिकांना भीषण पाणीटंचाईशी सामना करावा लागणार आहे. धरणात सुरुवातीच्या काळात मुबलक पाणीसाठा होत असल्याने हा परिसर सुजलाम् सुफलाम् झाला होता. मात्र, कालांतराने धरणाच्या देखभाल दुरुस्तीकडे लघु पाटबंधारे खात्याने दुर्लक्ष केल्याने धरणातून पाणी गळती होऊ लागली. याचा विपरीत परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर झाला. उन्हाळ्यात हे धरण पूर्णपणे कोरडे पडत असल्याने या धरणातील पाण्यावर अवलंबून असलेल्या वाफोली नळपाणी योजनेवर याचा विपरीत परिणाम होतो. यावर्षी एप्रिल महिन्यातच धरणातील पाणीसाठा हा पूर्णपणे आटला आहे. या परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्याने वाफोली गावातील शेती बागायती पूर्णपणे करपून गेल्या आहेत. दरवर्षी उन्हाळयात या धरणातील पाणीसाठा कमी होतो.दरवर्षी धरण कोरडे पडत असल्याने उन्हाळ्यात होणारी पाणीटंचाई रोखण्यासाठी या धरणाच्या दुरुस्तीकडे लघु पाटबंधारे विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, दरवर्षी दुरुस्तीचे केवळ कागदी घोडे नाचविण्यात येत असल्याने या धरणाची परिस्थिती गंभीर बनली आहे. धरणाची दुरुस्ती करण्यात येत नसल्याने धरणाला ठिकठिकाणी गळती लागली आहे. यामुळे पावसाळ्यात ओव्हरफ्लो होत असलेले हे धरण एप्रिल महिन्यातच कोरडे पडत आहे. प्रत्यक्षात पावसाचे आगमन होण्यासाठी अजून दीड महिन्याचा कालावधी असल्याने पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.