शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

प्रतीक्षा स्मशानशेडच्या दुरूस्तीची

By admin | Updated: August 5, 2014 00:20 IST

रहिवाशांमध्ये नाराजी : निर्णय कधी होणार याकडे लक्ष

चिपळूण : तीन महिन्यांपूर्वी वादळी वाऱ्याने उद्ध्वस्त झालेली उक्ताड येथील स्मशानशेड दुरुस्त करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाला अद्याप वेळ मिळालेला नाही. एखादी दुर्दैवी घटना घडल्यास पत्र्याचा आधार घेऊन अंत्यसंस्कार करण्याची वेळ येथील रहिवाशांवर आली आहे. या साऱ्या प्रकाराबद्दल रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर असून, नगर परिषद कार्यालयावर प्रेतयात्रा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये अंदाजे ६ हजारांपर्यंत लोकसंख्या आहे. खेंड चौक, खेंड बडदेवाडी, उक्ताड कानसेवाडी आदी भागात एखादी व्यक्ती मृत झाल्यास तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी उक्ताड येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानशेड बांधण्यात आली आहे. मात्र, ७ मे रोजी झालेल्या चक्रीवादळाने ही शेड उद्ध्वस्त झाली आहे. यामुळे अंत्यसंस्काराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तत्कालीन नगराध्यक्ष रिहाना बिजले व अन्य सहकाऱ्यांनी या शेडची पाहणी करुन अहवाल प्रशासनाकडे सादर केला आहे. मात्र, तीन महिन्यांचा कालावधी झाला तरी नादुरुस्त शेड दुरुस्त करण्यात आली नसल्याने या परिसरातील रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. वारंवार सभेमध्ये चर्चा करुनही शेडचे काम लवकरच होईल, असे आश्वासन सत्ताधारी गटाकडून दिले जात आहे, अशी खंत शिवसेनेच्या नगरसेवक सुरेखा खेराडे यांनी व्यक्त केली आहे. उक्ताड परिसरात शौचालयाचीही दुरवस्था आहे. याबाबत गेली दोन वर्षे महिलांनी आपली गाऱ्हाणे नगर प्रशासनाकडे मांडूनही अद्याप गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नाही. नागरिकांना योग्य त्या सेवा सुविधा मिळाल्या पाहिजेत. मग तो कोणत्या पक्षाचा आहे हे न पाहता सेवा देणे प्रशासनाचे काम असताना याकडे सत्ताधारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगर परिषद कार्यालयावर येत्या काही दिवसांत प्रेतयात्रा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नगरसेवक खेराडे यांनी दिला आहे. (वार्ताहर)