शहरं
Join us  
Trending Stories
1
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
2
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
3
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
4
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
5
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
6
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
7
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
8
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
9
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
10
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
11
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
12
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
13
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
14
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
15
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
16
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
17
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
18
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
19
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
20
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?

किल्ल्याला ‘अच्छे दिनां’ची प्रतीक्षा

By admin | Updated: November 23, 2014 00:38 IST

शिवछत्रपतींचे खरे स्मारक : उद्धव ठाकरेंच्या भेटीकडे लक्ष

संदीप बोडवे ल्ल मालवणमुंबईजवळील अरबी समुद्रात हजारो कोटी रूपये खर्च करून कथित शिवस्मारक उभारले जाणार आहे. दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील बीबीका मकबरा आणि दौलताबाद किल्ल्याला जागतिक वारसा घोषित करण्यासाठी पावले उचलली जात असतील तर छत्रपतींचे खरेखुरे स्मारक असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याला आता तरी अच्छे दिन येतील काय? असा प्रश्न शिवप्रेमींमधून उपस्थित होत आहे. रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणार आहेत. ठाकरे यांच्या जिल्हा भेटीकडे जिल्ह्यातील शिवप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर जिल्हावासीयांचे आभार मानण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आले आहे. रविवारी ठाकरे सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देवून शिवछत्रपतींचे दर्शन घेणार आहेत. ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे किल्ल्यासंदर्भातील अनेक प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा केली जात आहे. मुंबई जवळील अरबी समुद्रात शिवछत्रपतींचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. मात्र, शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या वाट्याला नेहमीच उपेक्षा आली आहे. कृत्रिम शिवस्मारकासाठी शासनाने हजारो कोटी रूपये खर्च करण्याचा घाट घातला असतानाच दुसरीकडे शिवस्मारकाकडे राज्य शासनाने आतापर्यंत जाणूबुजून दुर्लक्ष केले आहे. साहजिकच अरबी समुद्रात शिवस्मारक बांधण्याचा निर्णय घेणाऱ्या राज्य शासनाचे कौतुक होत असताना ऐतिहासिक वारशाबद्दल उदासिन असल्याचा आरोपही जिल्हावासीयांकडून नेहमीच होत आहे.शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाची साक्ष देणारा अभेद्य सिंधुदुर्ग किल्ला हा ऐतिहासिकदृष्ट्या कितीतरी महत्वाचा आहे. या किल्ल्याला आता साडेतिनशे वर्षे पूर्ण होणार आहेत. जिल्ह्यातील पर्यटनाचा मानबिंंदू म्हणून सिंधुदुर्ग किल्ल्याकडे संपूर्ण जग पाहत आहे. बिबीका मकबरा आणि दौलताबाद किल्ल्याला जागतिक वारसा घोषित करण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाकडून प्रयत्न करण्यात आले असतानाच ‘चौऱ्यांशी बंदरा ऐसा जागा, दुसरा नाही’ असे वर्णन केलेल्या शिवलंकेला चांगले दिवस यावेत. अशी अपेक्षा शिवप्रेमी करत आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराजांनी १६९५ साली स्थापन केलेले एकमेवाव्दितीय असे शिवछत्रपतींचे मंदिर आहे. हेच खरेखुरे छत्रपतींचे स्मारक आहे. या स्मारकाची जपणूक व्हावी, अशी मागणी शिवप्रेमींची आहे.सिंधुदुर्ग किल्ला राष्ट्रीय स्मारक म्हणून गौरविला जावा. किल्ल्याची पडझड थांबवावी. मंदिर आणि ऐतिहासिक ठेव्यांचा जीर्णोद्धार व्हावा आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर प्रशस्त उद्यान बांधण्यात यावे. तसेच वृक्षलागवड करण्यात यावी. अशी शिवप्रेमींची इच्छा आहे.४ एकीकडे संस्कृती व पर्यटनाचे प्रतिक असलेला सिंधुदुर्ग किल्ला आता शासनाकडून दुर्लक्षित होणे हे दुर्दैवी आहे. ढासळत चाललेले बुरूज, पडझड झालेली तटबंदी, वैराण माळरान, जीर्ण झालेले ऐतिहासिक ठेवे, मंदिराची दुरवस्था, सोयी सुविधांचा अभाव, प्लास्टिक प्रदूषणाचा विळखा यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्याचे बकाल चित्र पर्यटकांमार्फत जगासमोर जात आहे.