शहरं
Join us  
Trending Stories
1
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
2
भविष्यवाणी खरी ठरणार? जगन्नाथ मंदिराच्या कळसावर पक्ष्यांचे थवे, 'भविष्य मालिका' ग्रंथात उल्लेख...
3
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
4
"१०० वेळा विचार करेल, आत्मा थरथरेल..."; पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची मागणी
5
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
6
ट्रम्प टॅरिफची हवा निघाली, भारताकडून अमेरिकेची जोरदार खरेदी; चीनही टॉप ३ मध्ये, पाहा अधिक माहिती
7
२०२६ मध्ये भारतीय बाजारात 'धमाका' करण्याच्या तयारीत किआ! घेऊन येतेय ३ ढासू मॉडेल, EV चाही समावेश
8
'धुरंधर'मधला 'तो' सीन अन् सौम्या टंडनने अक्षय खन्नाच्या तब्बल ७ वेळा कानाखाली मारली, म्हणाली- "खूप वाईट..."
9
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
10
१० वर्षांची प्रतीक्षा संपली, नेपाळला जाणाऱ्यांसाठी खूशखबर; आता बिनधास्त घेऊन जा २००, ५०० ची नोट
11
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
12
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
13
Leopard Pune: 'बिबट्या दिसला तर पळू नका', पुण्यातील आयटी पार्कही दहशतीत! cognizant कंपनीने कर्मचाऱ्यांना काय सांगितलं?
14
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
15
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
16
Latur Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
17
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
18
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
19
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
20
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीच्या उमेदवारांना मतदार निश्चित निवडून देतील

By admin | Updated: March 29, 2016 22:41 IST

अमित सामंत यांचा विश्वास : कुडाळ नगरपंचायतीत चांगल्या प्रशासनासाठी राष्ट्रवादीची कमी जागा लढविण्याची भूमिका

कुडाळ तसे पाहिल्यास जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण. वैभववाडी आणि दोडामार्ग पाठोपाठ आता कुडाळचे नगरपंचायतीत रूपांतर झाले. येत्या १७ एप्रिलला नगरपंचायतची पहिली निवडणूक होत आहे. वैभववाडी आणि दोडामार्ग या तालुक्याच्या ठिकाणापेक्षा कुडाळ शहर फारच मोठे आहे. महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या कुडाळ शहरात नगरपंचायत निवडणूक होत आहे. सर्वच पक्षांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर ‘कुडाळ गावाकडून नगराकडे’ ही मालिका ‘लोकमत’ ने सुरू केली आहे. आता या मालिकेअंतर्गत निवडणुकीत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या प्रमुख पाच पक्षांची भूमिका आणि ते मतदारांपर्यंत कोणते मुद्दे घेऊन जाणार आहेत. याचा आढावा...आजपासून सलग पाच दिवस....रजनीकांत कदम ल्ल कुडाळ२०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या युती सरकारवरील लोकांचा आता विश्वास उडालेला असून कुडाळ नगरपंचायतीला एक चांगले प्रशासन मिळावे यासाठीच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कमी जागा लढविण्याची भूमिका घेवून, काँग्रेस पक्षाला संपूर्णत: मदत करण्याची भूमिका घेतली आहे. या आमच्या आघाडीच्या उमेदवारांना येथील मतदार निश्चितच निवडून देतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य अमित सामंत यांनी व्यक्त केला. पक्षाच्यावतीने कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीबाबत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडताना सामंत म्हणाले की, कुडाळ शहर नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक होत आहे. १७ एप्रिल रोजी होणाऱ्या कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी झालेली आहे. २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांनी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांवर विश्वास दाखवून त्यांचे उमेदवार विजयी केले होते. परंतु दोन वर्षातच मतदारांचा भ्रमनिरास झाल्यामुळे आता शिवसेना व भाजपावर मतदारांचा विश्वास उरलेला नाही. व गेल्या वेळच्या अनेक निवडणुकांच्या निकालानुसार हे स्पष्ट झालेले आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे समविचारी पक्ष निवडणुकीत एकमेकांच्या समोर उभे राहतात व त्याचा फायदा या दोन्ही जातीवादी पक्षांना होतो. आणि म्हणूनच मतांचे विभाजन होवू नये. तसेच कुडाळ नगरपंचायतीला एक चांगले प्रशासन मिळावे. यासाठीच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कमी जागा लढविण्याची भूमिका घेवून, काँग्रेस पक्षाला संपूर्णत: मदत करण्याची भूमिका घेतली आहे. कुडाळ शहराला सध्या वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रश्न भेडसावत आहेत. यापुढे या शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने विचार करणे गरजेचे झाले आहे. शहरातील सांडपाण्याचा निचरा होण्याची कुठल्याही प्रकारची व्यवस्था आजपर्यंत झालेली नाही. त्यामुळे मोठे गृहप्रकल्प उभे राहूनही त्यांचे सांडपाणी हे आजही रस्त्यावरच सोडले जाते व त्यामुळे लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची समस्या भविष्यात आहे. कुडाळ शहराच्या जवळ मोठी भंगसाळ नदी असूनही नदीच्या पाण्याचे योग्य नियोजन न झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कधीही दोन्ही काँग्रेस पक्षांनी एकत्रित येत निवडणूक लढविली नव्हती. परंतु या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मतदारांच्या समोर संपूर्णत: नवीन, तरुण आणि निष्कलंक चेहरे ठेवून एकत्रित निवडणूक लढवून १७ च्या १७ जागांवरही उमेदवार विजयी करण्याचे ध्येय ठेवलेले आहे. काँग्रेस पक्षाचे नेते नारायण राणे व आमदार नीतेश राणे व माजी खासदार नीलेश राणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरदचंद्र पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना निवडून देऊन मतदार आमच्यावर विश्वास दाखवतील याची आम्हाला खात्री आहे असे मत अमित सामंत यांनी व्यक्त केले.मूलभूत समस्या सोडविणारलोकसंख्या वाढत असल्यामुळे कचऱ्याचा प्रश्न शहरापुढे उभा राहिला असून नजीकच्या काळात तो गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. आजही कुडाळमध्ये क्रीडांगण, चांगली उद्याने नसल्यामुळे मुलांना खेळण्यासाठी कुठलीही सुविधा उपलब्ध नाही. हे सर्व मुलभूत प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आतापर्यंत काहीही प्रयत्न न झाल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँंग्रेसने एकत्र येत आघाडीने निवडणूक लढविण्याची भूमिका घेतलेली आहे. - अमित सामंत, राष्ट्रवादी काँग्रेस प्रांतिक सदस्य