शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

मतदारांनी काँग्रेसला जागा दाखविली

By admin | Updated: April 24, 2015 01:31 IST

वैभव नाईक यांची टीका : ५२ पैकी ३५ ग्रामपंचायतीत शिवसेनेला यश

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५२ पैकी सुमारे ३५ ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेला यश मिळाले आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेने शिवसेनेप्रती प्रेम व्यक्त केले असून हा विश्वास निश्चितच सार्थ ठरविण्यात येईल असे सांगतच येथील मतदारांनी काँग्रेसला त्यांची जागा दाखविली असल्याची टीका शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केली. येथील संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख सचिन सावंत उपस्थित होते. आमदार नाईक म्हणाले, जिल्ह्यातील ५२ पैकी एक दोन ग्रामपंचायती वगळता सर्वच ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व होते. परंतु निवडणूक निकालानंतर शिवसेनेच्या बाजूने मतदारांनी कौल दिला आहे. शिवसेनेचा जनाधार वाढत असल्याचेच हे लक्षण आहे. कुडाळ तालुक्यातील आकेरी, गोठोस, कुपवडे, पोखरण, माड्याचीवाडी, गिरगाव-कुसगाव, सावंतवाडी तालुक्यातील आंबोली, इन्सुली, कोलगाव, मळगाव, मळेवाड, आरोस, दांडेली, मालवण तालुक्यातील चिंदर, मसदे, विरण, वेंगुर्ले तालुक्यातील आरवली, कणकवली तालुक्यातील तोंडवली-बावशी, वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे, खांबाळे, वेंगसर, कुंभवडे, दोडामार्ग तालुक्यातील कुडासे, नेरे, नेवाळे, देवगड तालुक्यातील धालवली आणि अन्य ग्रामपंचायतींवर शिवसेना-भाजप युतीने विजय मिळविला आहे. त्यामुळे काँग्रेस पिछाडीवर गेला असून जनतेचा विश्वास सार्थ होईल. (वार्ताहर)