शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांनी काँग्रेसला जागा दाखविली

By admin | Updated: April 24, 2015 01:31 IST

वैभव नाईक यांची टीका : ५२ पैकी ३५ ग्रामपंचायतीत शिवसेनेला यश

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५२ पैकी सुमारे ३५ ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेला यश मिळाले आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेने शिवसेनेप्रती प्रेम व्यक्त केले असून हा विश्वास निश्चितच सार्थ ठरविण्यात येईल असे सांगतच येथील मतदारांनी काँग्रेसला त्यांची जागा दाखविली असल्याची टीका शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केली. येथील संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख सचिन सावंत उपस्थित होते. आमदार नाईक म्हणाले, जिल्ह्यातील ५२ पैकी एक दोन ग्रामपंचायती वगळता सर्वच ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व होते. परंतु निवडणूक निकालानंतर शिवसेनेच्या बाजूने मतदारांनी कौल दिला आहे. शिवसेनेचा जनाधार वाढत असल्याचेच हे लक्षण आहे. कुडाळ तालुक्यातील आकेरी, गोठोस, कुपवडे, पोखरण, माड्याचीवाडी, गिरगाव-कुसगाव, सावंतवाडी तालुक्यातील आंबोली, इन्सुली, कोलगाव, मळगाव, मळेवाड, आरोस, दांडेली, मालवण तालुक्यातील चिंदर, मसदे, विरण, वेंगुर्ले तालुक्यातील आरवली, कणकवली तालुक्यातील तोंडवली-बावशी, वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे, खांबाळे, वेंगसर, कुंभवडे, दोडामार्ग तालुक्यातील कुडासे, नेरे, नेवाळे, देवगड तालुक्यातील धालवली आणि अन्य ग्रामपंचायतींवर शिवसेना-भाजप युतीने विजय मिळविला आहे. त्यामुळे काँग्रेस पिछाडीवर गेला असून जनतेचा विश्वास सार्थ होईल. (वार्ताहर)