शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

कॅम्पस अ‍ॅम्बिसिडरनी मतदार - जागृती करावी : जिल्हाधिकारी

By admin | Updated: September 25, 2014 23:31 IST

जिल्ह्याचे नाव देशात मोठे करा -ई. रविंद्रन : मतदारांना केले आवाहन

सिंधुदुर्गनगरी : विधानसभा २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील २७ महाविद्यालयांमध्ये तालुकानिहाय कॅम्पस अ‍ॅम्बिसिडर जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेले आहेत. या कॅम्पस अ‍ॅम्बिसिडरनी मतदार जागृतीसाठी आपले महाविद्यालय, आपले गाव, आपला परिसर या ठिकाणी मतदार जागृती उत्स्फूर्तपणे करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१४च्या अनुषंगाने महाविद्यालयीन विद्यार्थी, कॅम्पस अ‍ॅम्बिसिडरना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी ई. रविंद्रन बोलत होते. यावेळी निवडणूक खर्च निरीक्षक चाँद बादशहा, निवडणूक उपजिल्हाधिकारी अभय करगुटकर व तालुकानिहाय २३ महाविद्यालयाचे कॅम्पस ब्रॅण्ड अ‍ॅम्बिसिडर उपस्थित होते.जिल्हाधिकारी ई. रविंद्रन म्हणाले, कॅम्पस अ‍ॅम्बिसिडरनी विधानसभा २०१४ निवडणूक कालावधीत मतदान करण्यासाठी जनतेला आवाहन करावे. कॅम्पस अ‍ॅम्बिसिडरनी जिल्ह्यात शंभर टक्के मतदानासाठी प्रत्येक मतदार संघनिहाय प्रयत्न करण्यासाठी संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून कार्यक्रमांचे आयोजन करावे. प्रशासनातर्फे प्रत्येक कुटुंबनिहाय व्होटर स्लीप वाटण्यात येत आहे. त्यावेळी कॅम्पस अ‍ॅम्बिसिडरनीही वाडीवार जनजागृती करावी. आपल्या मतदार यादीत नाव आहे का हे सर्वांनी तपासून घ्यावे. आपल्या कुटुंबाला, आपल्या शेजारी, गाव, वाडी व महाविद्यालयात ज्यांच्या वयाची अठरा वर्षे पूर्ण झाली आहेत त्या सर्वांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्याचे काम कॅम्पस अ‍ॅम्बिसिडरनी करावे. प्रशासनाकडून कॅम्पस अ‍ॅम्बिसिडरना लागणारी मदत करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.निवडणूक खर्च निरीक्षक चाँद बादशहा म्हणाले, कॅम्पस अ‍ॅम्बिसिडर हे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. या कॅम्पस अ‍ॅम्बिसिडरमध्ये आत्मविश्वास दिसून येत आहे. तो आत्मविश्वास मतदार जागृती कार्यक्रमातही असाच ठेवावा. विद्यार्थ्यांनी उत्साह व नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून प्रशासनाच्या सहकार्याने मतदार जागृतीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन बादशहा यांनी केले.उपजिल्हाधिकारी करगुटकर म्हणाले, अ‍ॅम्बिसिडरना प्रशासनाकडून मतदार जागृती प्रचार कार्यासाठी लागणारी मदत करण्यात येईल. प्रत्येक महाविद्यालयात मतदार यंत्राद्वारे कसे मतदान केले जाते याचे प्रात्यक्षिक स्थानिक प्रशासनाच्या मदतीने दाखविण्यात येईल. कॅम्पस अ‍ॅम्बिसिडरनी या कार्यक्रमासाठी महाविद्यालयात जनजागृती करावी, असे आवाहन करगुटकर यांनी केले.प्रत्येक महाविद्यालयातील कॅम्पस अ‍ॅम्बिसिडरनी यापूर्वी राबविलेले उपक्रम व सध्या राबविण्यात येणारे उपक्रम यांची माहिती यावेळी बैठकीत सादर केली. गाव भेटी, तोंडी प्रचार, गावफेऱ्या, पथनाट्य या उपक्रमांद्वारे मतदार जागृतीसाठी प्रशासनाच्या सहकार्याने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)जिल्ह्याचे नाव देशात मोठे कराई. रविंद्रन : मतदारांना केले आवाहनकुडाळ : आपल्या जिल्ह्याचे नाव देशात मोेठे होऊन सिंधुदुर्गची शान वाढण्याकरिता जिल्ह्यातील मतदारांनी १०० टक्के मतदान या निवडणुकीत करावे, असे आवाहन मतदान जनजागृतीचे निरीक्षक रतन प्रकाश व जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी कुडाळ येथील मतदान जनजागृती कार्यक्रमात केले. विधानसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान व्हावे, याकरिता मतदार राजा जागृत होण्यासाठी शासनाच्यावतीने मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जिल्ह्यात केले असून कुडाळ ग्रामपंचायत समोर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी निरीक्षक रतन प्रकाश, जिल्हाधिकारी ई. रविंद्रन, कुडाळचे प्रांताधिकारी रवींद्र बोंबले, तहसीलदार जयराज देशमुख, मालवण तहसीलदार वनिता पाटील, पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार उपस्थित होते. जिल्हाधिकारी रविंद्रन म्हणाले, देशाच्या व लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी १०० टक्के मतदान होणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या परिसरातील सर्वांना १५ आॅक्टोबर रोजी मतदान करण्याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन ई. रविंद्रन यांनी यावेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना केले. यावेळी सर्वांनी शपथ ग्रहण केली. तसेच कर्मचाऱ्यांनी मतदान यंत्राच्या वापराविषयी सर्वांना माहिती दिली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. जिल्ह्यात बहुतांशी भागात आता जनजागृती कार्यक्रम प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)