शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांनी रस्ता काम रोखले

By admin | Updated: February 27, 2015 23:21 IST

चौकशीचे आदेश : सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर काढला तोडगा

तळेरे : मुंबई-गोवा महामार्ग ते कासार्डे फोंडा रस्त्याला जोडणाऱ्या मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे हे समजताच कासार्डे ग्रामस्थांनी या रस्त्यांचे काम थांबवत या निकृष्ट दर्जाच्या कामाविषयी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांना गुरुवारी जाब विचारत कामाविषयी चौकशी करण्याचे आदेश दिले. यासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करीत काम चांगले करण्याची ग्वाही देत तोडगा काढला.मुंबई-गोवा महामार्गापासून ते कासार्डे पियाळी- फोंडा रस्त्याला जोडणाऱ्या मार्गाचे काम पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून काही वर्षांपूर्वी झाले. याच रस्त्याने मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक झाल्याने हा रस्ता पूर्णपणे खराब झाला होता. यावेळी या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी १३व्या वित्त आयोगानुसार या रस्त्याचे काम सुरू होते. अंदाजे २३ लाख ९४ हजार ८७९ रकमेचे अंदाजपत्रक असलेले या रस्त्याचे काम सुशील लोके यांच्या ओमटेक असोसिएट कंपनीला काम करण्यास दिले. यावेळी हे काम सुरू होण्यापूर्वी स्थानिक प्रशासन असणाऱ्या ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता काम सुरू केले. यावेळी या कामाचे सुरूवातीला काम चांगले करण्यात आले. मात्र, त्यानंतर काही थोडेसे डांबर व मोठ्या दगडांचा वापर करीत पुढील काम सुरू करण्यात आले. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे, असे समजताच बुधवारी कासार्डे ग्रामस्थांनी धाव घेत या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता तुषार बुरूड, सहाय्यक कार्यकारी अभियंता पी. एस. माळगावकर यांनी गुरूवारी घटनास्थळी भेट देत कामाची पाहणी केली. हे काम निकृष्ट आहे असे ग्रामस्थांनी सांगितल्यानंतर या कामाची पाहणी केली व काम निकृष्ट झाल्याची कबुली दिली. यानंतर जे काम झाले आहे ते पूर्णपणे काढून नवीन दर्जेदार काम करा, असे त्यांनी येथे कामावर असलेले कनिष्ठ स्थापत्य अभियंता पी. पी. पारकर, सहाय्यक स्थापत्य अभियंता एस. पी. कांबळी व ठेकेदार सुशील लोके यांना काम पूर्ण करून देण्याचे व कामाचा दर्जा उत्कृष्ट राखण्याचे आदेश दिले. यावेळी कासार्डे सरपंच संतोष पारकर, सुधाकर रावले, सहदेव खाडये, राकेश मुणगेकर, राकेश वालावलकर, रूपेश कानसे, निखिल पिसे, विद्याधर नकाशे, अनंत सटवकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. हे काम दर्जेदार न झाल्याने काम बंद पाडले जाईल, असे सांगत हे काम दर्जेदार करावे, अशी ग्रामस्थांनी मागणी केलीआहे. (वार्ताहर)