शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

ग्रामस्थांनी रस्ता काम रोखले

By admin | Updated: February 27, 2015 23:21 IST

चौकशीचे आदेश : सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर काढला तोडगा

तळेरे : मुंबई-गोवा महामार्ग ते कासार्डे फोंडा रस्त्याला जोडणाऱ्या मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे हे समजताच कासार्डे ग्रामस्थांनी या रस्त्यांचे काम थांबवत या निकृष्ट दर्जाच्या कामाविषयी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांना गुरुवारी जाब विचारत कामाविषयी चौकशी करण्याचे आदेश दिले. यासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करीत काम चांगले करण्याची ग्वाही देत तोडगा काढला.मुंबई-गोवा महामार्गापासून ते कासार्डे पियाळी- फोंडा रस्त्याला जोडणाऱ्या मार्गाचे काम पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून काही वर्षांपूर्वी झाले. याच रस्त्याने मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक झाल्याने हा रस्ता पूर्णपणे खराब झाला होता. यावेळी या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी १३व्या वित्त आयोगानुसार या रस्त्याचे काम सुरू होते. अंदाजे २३ लाख ९४ हजार ८७९ रकमेचे अंदाजपत्रक असलेले या रस्त्याचे काम सुशील लोके यांच्या ओमटेक असोसिएट कंपनीला काम करण्यास दिले. यावेळी हे काम सुरू होण्यापूर्वी स्थानिक प्रशासन असणाऱ्या ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता काम सुरू केले. यावेळी या कामाचे सुरूवातीला काम चांगले करण्यात आले. मात्र, त्यानंतर काही थोडेसे डांबर व मोठ्या दगडांचा वापर करीत पुढील काम सुरू करण्यात आले. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे, असे समजताच बुधवारी कासार्डे ग्रामस्थांनी धाव घेत या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता तुषार बुरूड, सहाय्यक कार्यकारी अभियंता पी. एस. माळगावकर यांनी गुरूवारी घटनास्थळी भेट देत कामाची पाहणी केली. हे काम निकृष्ट आहे असे ग्रामस्थांनी सांगितल्यानंतर या कामाची पाहणी केली व काम निकृष्ट झाल्याची कबुली दिली. यानंतर जे काम झाले आहे ते पूर्णपणे काढून नवीन दर्जेदार काम करा, असे त्यांनी येथे कामावर असलेले कनिष्ठ स्थापत्य अभियंता पी. पी. पारकर, सहाय्यक स्थापत्य अभियंता एस. पी. कांबळी व ठेकेदार सुशील लोके यांना काम पूर्ण करून देण्याचे व कामाचा दर्जा उत्कृष्ट राखण्याचे आदेश दिले. यावेळी कासार्डे सरपंच संतोष पारकर, सुधाकर रावले, सहदेव खाडये, राकेश मुणगेकर, राकेश वालावलकर, रूपेश कानसे, निखिल पिसे, विद्याधर नकाशे, अनंत सटवकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. हे काम दर्जेदार न झाल्याने काम बंद पाडले जाईल, असे सांगत हे काम दर्जेदार करावे, अशी ग्रामस्थांनी मागणी केलीआहे. (वार्ताहर)