शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
2
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
3
दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
4
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
5
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
6
CBSE board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
7
निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
8
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
9
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?
10
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
11
ना सिक्स पॅक अ‍ॅब्स ना फिल्मी बॅकग्राऊंड, बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर देणारा हा अभिनेता कोण?
12
शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय? त्याने काय फरक पडतो?
13
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
14
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी
15
सूरजचे असंख्य चाहते असूनही 'झापुक झुपूक' अपयशी का झाला? अंकिता वालावलकर म्हणाली- "त्याचे फॅन.."
16
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
18
टाटाने आणले Altroz चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल; मिळतील एकापेक्षा एक दमदार फिचर्स, पाहा...
19
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
20
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...

ग्रामस्थांचा विरोध न जुमानता काम सुरू

By admin | Updated: May 29, 2015 23:46 IST

कुर्ली बौद्धवाडीतील विहीर : ग्रामस्थांनी मारली प्रशासनाविरोधात बोंब

वैभववाडी : कुर्ली बौद्धवाडीच्या संपूर्ण पुनर्वसनाच्या मागणीसाठी तेथील ग्रामस्थांनी बुडीत क्षेत्रातील विहिरीच्या दुरूस्तीचे काम रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासनाने ग्रामस्थांचा विरोध न जुमानता पोलीस बंदोबस्तात विहीर दुरूस्तीला सुरूवात केली. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी निषेध म्हणून गाऱ्हाणे घालून नारळ फोडत प्रशासनाच्या नावाने बोंब ठोकली. यावेळी महिला व ग्रामस्थ एकवटल्यामुळे तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती. यावेळी पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस फौजफाटा ठेवण्यात आला होता.देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात कुर्ली बौद्धवाडीची विहीर आहे. सध्या धरणात ९१.९९८ दशलक्ष घनमीटर एवढा म्हणजेच १८६ तलांक पाणीसाठा असून यावर्षी तो १८७ तलांक म्हणजे १००.४२८ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा केला जाणार आहे. हीच धरणाची पूर्ण साठवण क्षमता आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढल्यानंतर कुर्ली बौद्धवाडीच्या विहिरीत धरणाचे पाणी जाणार असल्याने धरणाचे पाणी विहिरीत जाऊ नये यासाठी पाटबंधारे विभागाने विहीर दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. विहीर दुरूस्तीऐवजी संपूर्ण वाडीचेच पुनर्वसन करण्याची मागणी ग्रामस्थांनी आधीपासूनच लावून धरली आहे. परंतु प्रशासनाने मागणी धुडकावून लावत विहीर दुरूस्तीचे काम गुरूवारीच सुरू केले जाणार होते. परंतु ग्रामस्थांच्या विरोधामुळे गुरूवारी सुरू होऊ शकले नव्हते. प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याचे पाटबंधारे खात्याला आदेश दिले. त्यानुसार शुक्रवारी कार्यवाही सुरू करण्यात आली. बुडीत क्षेत्रातील विहिरीच्या दुरूस्तीसाठी यंत्रणा नियोजित स्थळी दाखल होताच योगेश सकपाळ व रमेश सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली कुर्ली बौद्धवाडीतील ग्रामस्थ एकवटले होते. त्यांनी विहिरीचे काम सुरू करण्यास मज्जाव करीत नजिकच्या घरात बैठक घेत ठाम विरोध दर्शविला. या विरोधाला न जुमानता प्रशासनाने विहिरीच्या दुरूस्तीचे काम जेसीबीच्या सहाय्याने कडक बंदोबस्तात दुपारनंतर सुरू केले. त्यामुळे ग्रामस्थांनी नारळ फोडून प्रशासनाचा निषेध म्हणून बोंब ठोकली. (प्रतिनिधी)कुर्ली बौद्धवाडीत ३४ घरे असून धरणात पूर्ण क्षमतेनुसार पाणी साठविल्यानंतर ७ घरांना बाधा पोहोचण्याची शक्यता आहे. संपूर्ण वाडीचेच पुनर्वसन करावे, ही तेथील ग्रामस्थांची मागणी असल्याने पाटबंधारे विभागाकडून खास बाब म्हणून प्रशासनास प्रस्ताव सादर केला गेला होता. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी तो प्रस्ताव धुडकावला- वसंत कदम,सत्यशोधक संघटना कार्यकर्तेधरणाची साठवण क्षमता १८७ तलांक असून आतापर्यंत १८६ तलांक एवढेच पाणी साठवले जात होते. त्यामुळे शासनाकडून विचारणा होत होती. यंदा पूर्ण क्षमतेने साठा करण्याचे आदेश आहे. त्यानुसार कार्यवाही केली जाणार असून १८८ तलांक ही महत्तम पूर रेषा असून या साठ्यामुळे कोणालाही बाधा पोहोचत नाही. त्यामुळे पुनर्वसनाची तरतूदच नाही.- एस. के. शेंडगे, उपअभियंता