शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

पर्यटनातूनच गावचा विकास

By admin | Updated: June 5, 2016 00:09 IST

शेखर सिंह : विजयदुर्गमध्ये सर्कीट आराखडा सादरीकरण

देवगड : जनतेची संकल्पना त्यांचे विचार घेतल्याने एखादी योजना दिर्घकाळ टिकू शकते, यामुळेच पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विजयदुर्ग सर्कीटचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पर्यटन एके पर्यटनाच्या माध्यमातून गावचा विकास होऊ शकतो, यामुळे लोकांना रोजगार मिळू शकतो यासाठी पर्यटनाला चालना देण्यासाठी लोकांचा उत्साह आणि सहभाग महत्वाचा आहे, असे मत जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी विजयदुर्ग येथे व्यक्त केले. विजयदुर्ग येथे कोकण ग्रामीण पर्यटनांतर्गत ग्रामीण पर्यटन विजयदुर्ग सर्कीट आराखड्याचे सादरीकरण शनिवारी करण्यात आले. हा आराखडा रचना संसदच्या विद्यार्थ्यांनी सादर केला. यावेळी उपसचिव लिना बनसोड, उपमुख्यकार्यकारी अधिकारी रणदिवे, देवगड तहसीलदार जीवन देसाई, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे देशमुख, माजी आमदार प्रमोद जठार, विजयदूर्ग सरपंच महेश बिडये आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना शेखर सिंंह म्हणाले की, रचना संसदच्या विद्यार्थ्यांनी विजयदुर्ग, गिर्ये, तिर्लोट, वाघोटण, पोंभुर्ले, मालपे या गावांमध्ये पर्यटन सर्कीट तयार केले असून या सर्कीटला विजयदुर्ग सर्कीट असे नाव देण्यात आले आहे. अतिशय विवेकबुध्दीने येथील जनतेची संकल्पना घेऊन, येथील गावची परंपरा अबाधित राखून पर्यटन वाढीसाठी आपण काय केले पाहिजे. हे यात नमूद करण्यात आले आहे. पर्यटक वाढले पाहिजेत या दृष्टीकोनातून काम केले पाहिजे. पर्यटनाच्या माध्यमातून गोवा राज्याने मोठी प्रगती केली आहे. यामुळे आपणही गोवा राज्याच्या पूढे जाऊन पर्यटनाची प्रगती केली पाहिजे. कारण गोवा राज्यापेक्षाही कोकणामध्ये विशेषत: सिंंधुदुर्गमध्ये आणि त्यातून देवगडमध्ये अतिशय सुंंदर पर्यटन स्थळे आहेत. विजयदुर्ग, गिर्ये, तिर्लोट, वाघोटण, पोंभुर्ले, मालपे या २७ किलोमीटर अंतर असलेल्या गावांमध्ये रचना संसदच्या विद्यार्थ्यांनी गेली सहा महिने पर्यटनाच्या दृष्टीकोनातून अभ्यास करून येथील जनतेच्या समस्या, पारंपरीक पध्दती, येथील संस्कृती, येथील पारंपरिक नृत्य याची माहिती घेऊन आराखडा तयार करण्यात आला आहे. या पाचही गावांमध्ये खाडी असून या खाडींमध्ये पर्यटन बोटींची सोय कशा पध्दतीने केली पाहिजे. अशा विचारांची सांगड घालून विजयदुर्ग सर्कीट ग्रामीण पर्यटन आराखड्याचे सादरीकरण केले आहे. (प्रतिनिधी)