शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मागण्या लक्षात घेऊन कार्यवाही

By admin | Updated: June 13, 2015 00:20 IST

अनंत गीते : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाबाबत बैठक

सिंधुदुर्गनगरी : जास्तीत जास्त धोरण लवचिक ठेवून कमीत कमी नुकसान, जास्तीत जास्त भरपाई, कमीत कमी विस्थापन आणि लवकरात लवकर पुनर्वसनाला प्राधान्य देऊ. लोकांच्या मागण्या लक्षात घेऊन चौपदीकरण करण्यासाठीची कार्यवाही करण्यात येत आहे. रस्त्यासाठी ६० मीटरऐवजी ४५ मीटर भूसंपादन केले जावे, ही मागणी केंद्राकडे सादर करू. त्याबाबतीत सर्वांना मान्य होईल व कायद्यात बसेल असाच निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्गासंदर्भात बैठकीत गीते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, जिल्हाधिकारी ई. रविंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर, पोलीस उपअधीक्षक अनंत आरोसकर आदी उपस्थित होते.गीते म्हणाले, रस्ता चौपदीकरणासाठी ४ हजार कोटी मंजूर आहेत. जनतेच्या मागण्या वाढल्यास केंद्र सरकार यासाठी अजून निधी वाढविण्यासाठी तयार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक गावनिहाय व शहरनिहाय झालेली मोजणीचा मोबदल्याचा आराखडा तयार करून तो जाहीर करावा. पुनर्वसन होणार आहे. त्या लोकांना विश्वासात घेऊन सर्व कार्यवाही करावी. रस्त्यांना जास्त वळणे असणार नाहीत याची खबरदारी घेण्यात आली आहे. चौपदरीकरणात जास्त वळणे येणार नाहीत याची काळजी घेण्यात येईल. जास्तीत जास्त नागरिकांच्या रास्त मागण्या विचारात घेऊन योग्य ते निर्णय घेण्यात येतील, असेही गीते म्हणाले. (प्रतिनिधी)मोबदल्याबाबत माहितीराष्ट्रीय महामार्गासंदर्भात स्थानिक लोकांची काही ठिकाणी मंदिर, समाजमंदिर, कुणाची नवीन घरे जात आहेत, अशा लोकांचे प्रश्न व त्यांना मिळणाऱ्या मोबदल्यासंदर्भात यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिली.मांडल्या लोकांच्या मागण्याआमदार वैभव नाईक यांनी या बैठकीमध्ये महामार्गाचे चौपदरीकरण करताना कुडाळ शहरामधील लोकांना असणाऱ्या समस्या मांडल्या. लोकांच्या समस्या निराकरण करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.भूमिका स्पष्ट करामहामार्गासाठी करण्यात येणारे भूसंपादन सर्वांना समान न्यायाने व्हावे, ज्यांच्या जमिनी अथवा घर जाणार आहेत त्यांंना मोबदला किती मिळणार? याची प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी. अशी आग्रही मागणी यावेळी आमदार नीतेश राणे यांनी केली.