शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

बळीराजा वन्यप्राण्यांमुळे त्रस्त

By admin | Updated: May 16, 2016 00:23 IST

दोडामार्गमधील स्थिती : प्राण्यांकडून लाखोंची नुकसानी, भरपाई मात्र हजारात

वैभव साळकर / दोडामार्ग तालुक्यात पडणाऱ्या पावसाचा लहरीपणा, भातशेती करताना मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा होणारा जादा खर्च आदीमुळे त्रस्त झालेला दोडामार्गातील शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात काजू, नारळ, आंबा, केळी या फळझाडांबरोबरच बांबू लागवड करू लागला आहे. मात्र, या फळझाडांचे जंगली प्राण्यांकडून नुकसान केले जात आहे. गवारेडे, रान डुक्कर, सांबर व माकड आदी वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या बागायती उद्ध्वस्त करीत आहेत. वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानाची भरपाई मात्र शासन तुटपुंजी देण्यात येत आहे. त्यामुळे हत्तीसंकटानंतर आता बळीराजा शासनाच्या उदासीन धोरणामुळे पुन्हा एकदा कोलमडतो आहे. तालुक्यातील कित्येक हेक्टर भातशेती योग्य जमीन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या न परवडणारी ठरत असल्याने वापराविना पडून आहे. पावसाचा लहरीपणा, नांगरणी, रासायनिक खते यांच्यावर खर्च करावा लागणारा पैसा तसेच या शेतीची देखभाल आदींचा ताळमेळ घालता मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा खर्च अधिक होत असल्याने तालुक्यातील कित्येक शेतकऱ्यांनी भातशेती करण्याचे केव्हाच सोडून दिले आहे. शेतकऱ्यांनी फळ बागायतीकडे वळावे, यासाठी शासनाकडून वेळोवेळी प्रयत्न केले जात असून, याकरिता शंभर टक्के अनुदान फलोत्पादन योजनाही राबविली गेली. या योजनेचा लाभ घेत अनेक शेतकरी आपल्या डोंगर कपारीतील जमिनीत काजू, आंबा आदींची लागवड मोठ्या प्रमाणात करताना आढळून येतात. या जमिनीत फळ झाडांची लागवड करण्यात आली. आंबा, काजू, नारळ आदीसह अनेक फळझाडांच्या संकरीत जाती तयार करून कमीतकमी वेळेत ही फळझाडे उत्पादन देण्यास सुरूवात करतील, असा प्रयत्नही कृषी विद्यापीठामार्फत करण्यात येत आहे. त्यामुळेच काजू कलमे लागवडीच्या तिसऱ्या वर्षीपासून उत्पादन देण्यास सुरूवात होते. तालुक्यात केरळमधील शेतकरी मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून, या शेतकऱ्यांनी येथील जमिनी खरेदी करून अनेक फळझाडांची लागवड केली आहे. याच धर्तीवर तालुक्यातील शेतकरी योग्य पध्दतीने फळझाडे लावताना आढळून येतात व त्याची जोपासनाही तितक्याच मेहनतीने घेत आहेत. तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात फळाबागायती करतानाच आपल्या बागायतीमधील जमिनीचा प्रत्येक भाग लागवडीखाली कसा येईल, याच प्रयत्नात असतो. त्यामुळे फळबागायतींच्या चारही बाजूच्या कंपाऊंडच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करताना आढळून येते. बाजारपेठेत दिवसेंदिवस बांबूची वाढती मागणी व व्यावसायिकांना जाणवत असणारी बांबूची कमतरता आदीमुळे बांबूला आज बाजारपेठेत बऱ्यापैकी भाव निर्माण झाला आहे. बांबूचे उत्पादन शेतकरी बारमाही घेत असल्याने या लागवडीकडे शेतकऱ्यांचा अधिक कल जाणवतो. मात्र, तालुक्यात वाढलेल्या माकडांच्या उच्छादामुळे येथील बांबूचे उत्पादन धोक्यात आले असून, शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे उत्पादन मिळत नाही. त्यामुळे येथील शेतकरी वर्ग भातशेतीकडून फळझाडांच्या लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळला असला, तरी या शेतीतही त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. फळबागायतीची नुकसान जंगली प्राण्यांकडून झाल्यास त्याची भरपाई शासन देते. मात्र, ती अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांना ती मिळूनही न मिळाल्यासारखीच आहे. त्यामुळे या नुकसान भरपाईत वाढ करण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांतून होत आहे.