शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बळीराजा वन्यप्राण्यांमुळे त्रस्त

By admin | Updated: May 16, 2016 00:23 IST

दोडामार्गमधील स्थिती : प्राण्यांकडून लाखोंची नुकसानी, भरपाई मात्र हजारात

वैभव साळकर / दोडामार्ग तालुक्यात पडणाऱ्या पावसाचा लहरीपणा, भातशेती करताना मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा होणारा जादा खर्च आदीमुळे त्रस्त झालेला दोडामार्गातील शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात काजू, नारळ, आंबा, केळी या फळझाडांबरोबरच बांबू लागवड करू लागला आहे. मात्र, या फळझाडांचे जंगली प्राण्यांकडून नुकसान केले जात आहे. गवारेडे, रान डुक्कर, सांबर व माकड आदी वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या बागायती उद्ध्वस्त करीत आहेत. वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानाची भरपाई मात्र शासन तुटपुंजी देण्यात येत आहे. त्यामुळे हत्तीसंकटानंतर आता बळीराजा शासनाच्या उदासीन धोरणामुळे पुन्हा एकदा कोलमडतो आहे. तालुक्यातील कित्येक हेक्टर भातशेती योग्य जमीन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या न परवडणारी ठरत असल्याने वापराविना पडून आहे. पावसाचा लहरीपणा, नांगरणी, रासायनिक खते यांच्यावर खर्च करावा लागणारा पैसा तसेच या शेतीची देखभाल आदींचा ताळमेळ घालता मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा खर्च अधिक होत असल्याने तालुक्यातील कित्येक शेतकऱ्यांनी भातशेती करण्याचे केव्हाच सोडून दिले आहे. शेतकऱ्यांनी फळ बागायतीकडे वळावे, यासाठी शासनाकडून वेळोवेळी प्रयत्न केले जात असून, याकरिता शंभर टक्के अनुदान फलोत्पादन योजनाही राबविली गेली. या योजनेचा लाभ घेत अनेक शेतकरी आपल्या डोंगर कपारीतील जमिनीत काजू, आंबा आदींची लागवड मोठ्या प्रमाणात करताना आढळून येतात. या जमिनीत फळ झाडांची लागवड करण्यात आली. आंबा, काजू, नारळ आदीसह अनेक फळझाडांच्या संकरीत जाती तयार करून कमीतकमी वेळेत ही फळझाडे उत्पादन देण्यास सुरूवात करतील, असा प्रयत्नही कृषी विद्यापीठामार्फत करण्यात येत आहे. त्यामुळेच काजू कलमे लागवडीच्या तिसऱ्या वर्षीपासून उत्पादन देण्यास सुरूवात होते. तालुक्यात केरळमधील शेतकरी मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून, या शेतकऱ्यांनी येथील जमिनी खरेदी करून अनेक फळझाडांची लागवड केली आहे. याच धर्तीवर तालुक्यातील शेतकरी योग्य पध्दतीने फळझाडे लावताना आढळून येतात व त्याची जोपासनाही तितक्याच मेहनतीने घेत आहेत. तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात फळाबागायती करतानाच आपल्या बागायतीमधील जमिनीचा प्रत्येक भाग लागवडीखाली कसा येईल, याच प्रयत्नात असतो. त्यामुळे फळबागायतींच्या चारही बाजूच्या कंपाऊंडच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करताना आढळून येते. बाजारपेठेत दिवसेंदिवस बांबूची वाढती मागणी व व्यावसायिकांना जाणवत असणारी बांबूची कमतरता आदीमुळे बांबूला आज बाजारपेठेत बऱ्यापैकी भाव निर्माण झाला आहे. बांबूचे उत्पादन शेतकरी बारमाही घेत असल्याने या लागवडीकडे शेतकऱ्यांचा अधिक कल जाणवतो. मात्र, तालुक्यात वाढलेल्या माकडांच्या उच्छादामुळे येथील बांबूचे उत्पादन धोक्यात आले असून, शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे उत्पादन मिळत नाही. त्यामुळे येथील शेतकरी वर्ग भातशेतीकडून फळझाडांच्या लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळला असला, तरी या शेतीतही त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. फळबागायतीची नुकसान जंगली प्राण्यांकडून झाल्यास त्याची भरपाई शासन देते. मात्र, ती अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांना ती मिळूनही न मिळाल्यासारखीच आहे. त्यामुळे या नुकसान भरपाईत वाढ करण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांतून होत आहे.