शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

आकेरीत व्हरांड्यात भरली शाळा

By admin | Updated: November 7, 2014 23:43 IST

शाळेचे अपूर्ण बांधकाम : आश्वासनानंतर आंदोलन मागे

कुडाळ : आकेरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. १ च्या अपूर्णावस्थेत असलेल्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी कुडाळ बीडिओंना निवेदन दिले होेते. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पालकांनी शुक्रवारी विद्यार्थ्यांना शाळेच्या व्हरांड्यातच बसवित तिथेच शाळा भरविली. या आंदोलनानंतर आमदार वैभव नाईक व जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी शाळेला भेट देत शाळा व्यवस्थापन समितीशी चर्चा करत शाळेचे बांधकाम पूर्ण करण्यास सांगितले. यावेळी समितीने हे बांधकाम २0 दिवसात पूर्ण करण्याचे मान्य केल्यानंतर पालकांनी आंदोलन मागे घेतले.आकेरी येथील प्राथमिक शाळेचे बांधकाम सर्व शिक्षा अभियानांतर्गत २0११ पासून सुरु करण्यात आले आहे. मात्र, इमारतीचे बांधकाम अद्याप अपूर्णावस्थेत आहे. अशा अपूर्ण असलेल्या धोकादायक इमारतीत मुलांना बसविण्यात येत असल्याचा आरोप करीत ग्रामस्थ व पालकांनी याबाबत योग्य ती कारवाई करावी, असे निवेदन कुडाळ गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक यांना दिले होते. आकेरी शाळा नं. १ च्या बांधण्यात आलेल्या इमारत अपूर्ण असून स्लॅबमधून पाण्याची गळती होत आहे. अशा धोकादायक इमारतीत पावसाळ्यातील महिन्यात मुलांना त्याच स्थितीत बसविण्यात आले होते. परंतु धोकादायक इमारतीत आम्ही मुलांना बसविणार कसे? काही धोकादायक घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. या धोकादायक इमारतीबाबत वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रारी केल्या. मात्र, शिक्षण विभागाने याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न मिळताच मुलांना शाळेत बसविण्यात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची अन्यत्र सोय करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. शाळेचे बांधकाम अपूर्ण असून खर्चाची रक्कम मात्र पूर्ण खर्च झाल्याचे निदर्शनास येत असल्याने या संदर्भात ठेकेदारास नोटीस बजावून रक्कम वसूल करून घ्यावी व त्याच्याकडून अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यास देऊ नये, अशी मागणीही केली आहे. या इमारतीच्या झालेल्या खर्चाबाबतच्या माहितीत तफावत असून कार्यकारी अभियंता सर्व शिक्षा अभियान, जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे वि. ब. खोटरे यांनी दिलेल्या अहवालात खर्च २२ लाख ९७ हजार १४३, तर विस्तार अधिकारी उदय सप्रे (शिक्षण विभाग) यांनी दिलेल्या अहवालात २२ लाख ३३ हजार ३३ एवढा खर्च झाल्याचे नमूद केले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या आकडेवारीत तफावत असून फौजदारी गुन्ह्यास पात्र असल्याचाही आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केला होता. मात्र, प्रशासनानेही दुर्लक्ष केल्याने शुक्रवारी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेबाहेर व्हरांड्यात बसवत आंदोलन सुरु केले. या आंदोलनाची दखल आमदार वैभव नाईक यांनी घेत शाळेला भेट देत पालकांशी व शाळा व्यवस्थापन समितीशी चर्चा करत समस्या जाणून घेतली. त्यानंतर शिक्षण विभागाला या इमारतीच्या बांधकामावर लक्ष देत काम पूर्ण करुन घेण्याचे आदेश दिले. तर जिल्हा उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनीही इमारतीची पाहणी करत शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्याशी चर्चा केली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीतर्फे हे काम २0 दिवसात पूर्ण करुन घेण्याचे ठरविण्यात आले. अन्यथा शाळा बांधकाम ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. इमारत बांधकाम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, कृषी विस्तार अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नागेश सबनीस, मुख्याध्यापिका प्रज्ञा दाभोलकर, सूर्यकांत घाडी, महेश जामदार, शंकर जामदार, किशोर भिसे, सुहास सावंत, अभय राणे, राजाराम शिंदे, संतोष बागवे, आत्माराम जाधव, सुभाष गोसावी, प्रकाश आईर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)