शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

वेंगुर्लेतील कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत

By admin | Updated: September 23, 2014 00:16 IST

२००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीला काँगे्रस- राष्ट्रवादी, शिवसेना -भाजप व अपक्ष अशी लढत झाली होती. यावेळी नारायण राणे व समर्थकांनी आघाडीचा धर्म पाळून केसरकर यांना सहकार्य केले होते.

प्रथमेश गुरव - वेंगुर्ले -सावंतवाडी मतदारसंघातील वेंगुर्ले तालुक्यात काँगे्रस - राष्ट्रवादी, शिवसेना युती तसेच मनसेचेही कार्यकर्ते खेडोपाडी विखुरलेले आहेत. २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीला काँगे्रस- राष्ट्रवादी, शिवसेना -भाजप व अपक्ष अशी लढत झाली होती. यावेळी नारायण राणे व समर्थकांनी आघाडीचा धर्म पाळून केसरकर यांना सहकार्य केले होते. तसेच दीपक केसरकर यांचाही लोकसंपर्क मोठा असल्याने ते चांगल्या मतांनी विजयी झाले होते. मात्र, सद्यस्थितीत राजकीय गणिते बिघडलेल्या स्थितीत असून, केसरकर शिवसेनावासी झाले असल्याने कार्यकर्त्यांमध्येही संदिग्धता आहे. तसेच अजूनही कोणाला उमेदवारी मिळणार निश्चित नसल्याने जनताही व्दिधा मनस्थितीत आहे. केसरकरांचे या मतदारसंघातील प्राबल्य पाहता वेंगुर्लेमधूनही त्यांना पाठिंबा मिळण्यात आघाडीची आडकाठी होणार आहे. यापूर्वी वेंगुर्र्ले तालुक्याचा समावेश नसताना मागील दोन वेळा शिवसेनेचे शिवराम दळवी काँग्रेस - राष्ट्रवादीअंतर्गत बंडखोरीमुळे निवडून आले होते. २००९ साली राष्ट्रवादीचे प्रवीण भोसले यांनी बंडखोरी केल्यामुळे दळवी हॅट्ट्रिक साधणार, असे मानले जात होते. परंतु मागील दोन वेळा संपूर्ण शिवसेना दळवींच्या मागे होती. त्यातील निम्मे राणेंसह काँगे्रसवासी झाले आणि त्यामुळेच शिवराम दळवी आमदार होऊ शकले नाहीत. राष्ट्रवादीच्या दीपक केसरकर यांना ६३,४३०, शिवसेनेच्या शिवराम दळवी यांना ४५,०१२, तर अपक्ष उमेदवार प्रवीण भोसले यांना १९,३६४ एवढी मते सावंतवाडी मतदारसंघातून पडली होती. त्यावेळी एकंदर वेंगुर्ले तालुक्यात नारायण राणेंचा प्रभाव जास्त होता. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा केसरकर हे उमेदवार म्हणून असून, फक्त यापूर्वी आघाडीतर्फे लढले होते. यावेळी ते शिवसेनेतर्फे लढत असल्याचे संकेत आहेत. राणेंचे कट्टर समर्थक राजन तेली यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आघाडीतर्फे राजन तेली उमेदवार असल्याची चर्चा आहे. राडा प्रकरणानंतर वेंगुर्ले शहरातील जनतेने नगर परिषदेवर राष्ट्रवादीला एकहाती सत्ता दिली होती. परंतु राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादामुळे नगराध्यक्ष निवडणुकीच्या वेळी दोन गट पडले. त्याचा शेवट म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या त्या १२ नगरसेवकांना अपात्र ठरवले. राष्ट्रवादीकडे एकहाती सत्ता देऊनही त्यांनी विश्वासघात केल्यामुळे विधानसभा निवडणुकीला येथील जनता पुन्हा राष्ट्रवादीला मतदान करील काय, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेला खाते खोलता आले नव्हते. मात्र, नुकत्याच झालेल्या वेंगुर्ले तालुका पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीत शिवसेनेचा सभापती बसला असून, उपसभापती काँग्रेस-राष्ट्रवादीचा आहे. त्यामुळे पंचायत समिती मतदारसंघात दोघांचीही ताकद राहिल्याने मतदान विभागण्याची शक्यता आहे. पूर्वीचे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी दीपक केसरकर यांच्यासमवेत शिवसेनेच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना युतीबरोबच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आपला उमेदवार उभा करणार आहे. एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर विचार प्रणालीच्या हिंदू महासभेनेही आपल्या पक्षाचे पुनर्गठन केले असून, त्यांनीसुध्दा आपला उमेदवार जाहीर केला आहे. एकंदर सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, अजूनही येथील जनता कोणत्या पक्षाला आपले मत देईल, हे समजणे कठीणच आहे. वेंगुर्ले तालुक्याच्या समस्याही बरीच वर्षे सुटण्याचे नाव घेत नाहीत. मायनिंगमुळे खराब होणारे रस्ते, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, पर्यटनासाठी पयाभूत सुविधांचा अभाव, एस. टी.ची विस्कळीत सेवा, शहरातील भुयारी गटार योजना, पाणी या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने पक्षाच्या उमेदवारांनी वरील समस्यांचा नुसताच विचार करु नये, तर त्यावर काही ठोस उपाययोजना करावी, अशीच मतदारांची अपेक्षा आहे.