शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

वेंगुर्लेतील कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत

By admin | Updated: September 23, 2014 00:16 IST

२००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीला काँगे्रस- राष्ट्रवादी, शिवसेना -भाजप व अपक्ष अशी लढत झाली होती. यावेळी नारायण राणे व समर्थकांनी आघाडीचा धर्म पाळून केसरकर यांना सहकार्य केले होते.

प्रथमेश गुरव - वेंगुर्ले -सावंतवाडी मतदारसंघातील वेंगुर्ले तालुक्यात काँगे्रस - राष्ट्रवादी, शिवसेना युती तसेच मनसेचेही कार्यकर्ते खेडोपाडी विखुरलेले आहेत. २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीला काँगे्रस- राष्ट्रवादी, शिवसेना -भाजप व अपक्ष अशी लढत झाली होती. यावेळी नारायण राणे व समर्थकांनी आघाडीचा धर्म पाळून केसरकर यांना सहकार्य केले होते. तसेच दीपक केसरकर यांचाही लोकसंपर्क मोठा असल्याने ते चांगल्या मतांनी विजयी झाले होते. मात्र, सद्यस्थितीत राजकीय गणिते बिघडलेल्या स्थितीत असून, केसरकर शिवसेनावासी झाले असल्याने कार्यकर्त्यांमध्येही संदिग्धता आहे. तसेच अजूनही कोणाला उमेदवारी मिळणार निश्चित नसल्याने जनताही व्दिधा मनस्थितीत आहे. केसरकरांचे या मतदारसंघातील प्राबल्य पाहता वेंगुर्लेमधूनही त्यांना पाठिंबा मिळण्यात आघाडीची आडकाठी होणार आहे. यापूर्वी वेंगुर्र्ले तालुक्याचा समावेश नसताना मागील दोन वेळा शिवसेनेचे शिवराम दळवी काँग्रेस - राष्ट्रवादीअंतर्गत बंडखोरीमुळे निवडून आले होते. २००९ साली राष्ट्रवादीचे प्रवीण भोसले यांनी बंडखोरी केल्यामुळे दळवी हॅट्ट्रिक साधणार, असे मानले जात होते. परंतु मागील दोन वेळा संपूर्ण शिवसेना दळवींच्या मागे होती. त्यातील निम्मे राणेंसह काँगे्रसवासी झाले आणि त्यामुळेच शिवराम दळवी आमदार होऊ शकले नाहीत. राष्ट्रवादीच्या दीपक केसरकर यांना ६३,४३०, शिवसेनेच्या शिवराम दळवी यांना ४५,०१२, तर अपक्ष उमेदवार प्रवीण भोसले यांना १९,३६४ एवढी मते सावंतवाडी मतदारसंघातून पडली होती. त्यावेळी एकंदर वेंगुर्ले तालुक्यात नारायण राणेंचा प्रभाव जास्त होता. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा केसरकर हे उमेदवार म्हणून असून, फक्त यापूर्वी आघाडीतर्फे लढले होते. यावेळी ते शिवसेनेतर्फे लढत असल्याचे संकेत आहेत. राणेंचे कट्टर समर्थक राजन तेली यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आघाडीतर्फे राजन तेली उमेदवार असल्याची चर्चा आहे. राडा प्रकरणानंतर वेंगुर्ले शहरातील जनतेने नगर परिषदेवर राष्ट्रवादीला एकहाती सत्ता दिली होती. परंतु राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादामुळे नगराध्यक्ष निवडणुकीच्या वेळी दोन गट पडले. त्याचा शेवट म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या त्या १२ नगरसेवकांना अपात्र ठरवले. राष्ट्रवादीकडे एकहाती सत्ता देऊनही त्यांनी विश्वासघात केल्यामुळे विधानसभा निवडणुकीला येथील जनता पुन्हा राष्ट्रवादीला मतदान करील काय, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेला खाते खोलता आले नव्हते. मात्र, नुकत्याच झालेल्या वेंगुर्ले तालुका पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीत शिवसेनेचा सभापती बसला असून, उपसभापती काँग्रेस-राष्ट्रवादीचा आहे. त्यामुळे पंचायत समिती मतदारसंघात दोघांचीही ताकद राहिल्याने मतदान विभागण्याची शक्यता आहे. पूर्वीचे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी दीपक केसरकर यांच्यासमवेत शिवसेनेच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना युतीबरोबच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आपला उमेदवार उभा करणार आहे. एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर विचार प्रणालीच्या हिंदू महासभेनेही आपल्या पक्षाचे पुनर्गठन केले असून, त्यांनीसुध्दा आपला उमेदवार जाहीर केला आहे. एकंदर सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, अजूनही येथील जनता कोणत्या पक्षाला आपले मत देईल, हे समजणे कठीणच आहे. वेंगुर्ले तालुक्याच्या समस्याही बरीच वर्षे सुटण्याचे नाव घेत नाहीत. मायनिंगमुळे खराब होणारे रस्ते, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, पर्यटनासाठी पयाभूत सुविधांचा अभाव, एस. टी.ची विस्कळीत सेवा, शहरातील भुयारी गटार योजना, पाणी या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने पक्षाच्या उमेदवारांनी वरील समस्यांचा नुसताच विचार करु नये, तर त्यावर काही ठोस उपाययोजना करावी, अशीच मतदारांची अपेक्षा आहे.