शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वेंगुर्लेत तालुकास्तरीय साहित्य संमेलन

By admin | Updated: January 23, 2015 23:38 IST

१४, १५ फेब्रुवारी : संमेलन यशस्वी करण्यासाठी नियोजन बैठकीत निर्णय

वेंगुर्ले : सातेरी प्रासादिक संघ संचलित आनंदयात्री वाङ्मय मंडळाने वेंगुर्ले तालुकास्तरीय साहित्य संमेलनाचे १४ व १५ फेब्रुवारी रोजी आयोजन येथील साई मंगल कार्यालयात केले आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी नियोजन बैठकीत एकमुखाने निर्णय घेण्यात आला. हे साहित्य संमेलन कोकण मराठी साहित्य परिषद, वेंगुर्ले शाखा, शिक्षक वाङ्मय चर्चा मंडळ, किरात, माध्यमिक मराठी शिक्षक संघ, वेंगुर्ले या सहयोगी संस्थांच्या सहकार्याने होणार आहे.वेंगुर्ले सातेरी मंदिर येथील जनसेवा हॉलमध्ये कार्यक्रमाच्या संयोजिका तथा लेखिका वृंदा कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा. आनंद बांदेकर, प्रा. सचिन परूळकर, दाभोली हायस्कूलचे दादा सोकटे, वेंगुर्ले हायस्कूलचे पी. एन. सामंत, अमर तांडेल, नगरसेविका सुषमा प्रभूखानोलकर, मठ हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील जाधव, खर्डेकर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी प्रतिनिधी हर्षदा तोरसकर, गुरुदास तिरोडकर, महेश राऊळ, रफिक शेख, प्रशिक्षक सागर परब, रवींद्र वारंग, चैतन्य दळवी, महेंद्र घाडी, सुरेश कौलगेकर, सचिन वराडकर, आदी उपस्थित होते. या संमेलनाची सुरुवात ग्र्रंथदिंडीने करून, या ग्रंथदिंंडीत वेगवेगळ्या साहित्याच्या कल्पना मांडण्यात येणार आहेत. या दिंडीला शोभा यात्रेचे स्वरूप दिले जाणार आहे. संमेलनामध्ये साहित्यिकांच्या रांगोळी तसेच विविध स्पर्धा घेण्याबाबत नियोजन करण्यात आले. यावेळी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. (प्र्रतिनिधी) लोगो पाठविण्याचे आवाहन--वेंगुर्लेत प्रथमच तालुकास्तरीय साहित्य संमेलन होत असल्याने या संमेलनाचा लोगो वेंगुर्लेतील निसर्ग, उत्पादने, संस्कृती व इतिहास तसेच साहित्याचे दर्शन घडविणारा, असा सर्वसमावेशक बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. लोगो बनवून २६ जानेवारीपर्यंत लोगो पाठवायचा आहे. या स्पर्धेतील विजेत्यास सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देण्यात येईल. इच्छुकांनी सुरेश कौलगेकर, बी. के . रोड, वेंगुर्ले या पत्त्यावर लोगो पाठवावा.साहित्यिक ओळख जपण्याचा प्रयत्न--वेंगुर्लेत तालुकास्तरीय साहित्य संमेलनात उदयोन्मुख लेखक व कवी यांना व्यासपीठ मिळणार आहे. वेंगुर्ले तालुक्याला संस्कृती, ऐतिहासिक तसेच साहित्याचा मोठा वारसा आहे.वि. स. खांडेकर, जयवंत दळवी, मंगेश पाडगावकर यासारखे अनेक लेखक व साहित्यिक तसेच कवी या तालुक्यातीलच असल्याने त्यांची ओळख या साहित्य संमेलनातून वाचक व रसिकांना होण्याचा या संमेलनातून प्रयत्न केला जाणार आहे. या सर्व साहित्यिकांची एकत्रित माहिती संंकलित करून त्याचे प्रदर्शन या संमेलनात मांडले जाणार आहे.