शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

स्वच्छता मोहिमेत वेंगुर्ले शाळा प्रथम

By admin | Updated: October 29, 2014 00:13 IST

केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ मोहिमेंतर्गत

वायंगणी : केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ मोहिमेंतर्गत येथील जागृती मंडळाने आयोजित केलेल्या ‘स्वच्छ विद्यालय’ स्पर्धेत केंद्रशाळा वेंगुर्ले नं. १ या प्रशालेला ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ हा पुरस्कार प्राप्त झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संजय मालवणकर यांनी दिली. जागृती मंडळाने यापूर्वीही शासनाच्या विविध योजनांचा व मोहिमेचा प्रचार व प्रसार केला आहे. केंद्राचा ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ या मोहिमेतही जागृती मंडळाने सहभाग घेतला होता. २ ते १७ आॅक्टोबर २०१४ या कालावधीत ज्या प्राथमिक शाळा सहभागी होऊन उत्कृष्ट कार्य करतील, त्यापैकी एका शाळेची मंडळाच्या ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ स्पर्धेसाठी निवड करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार हा पुरस्कार वेंगुर्ले येथील केंद्र शाळा नं. १ ने पटकाविला. रोख १००१ रुपये आणि सन्मानपत्र देऊन या शाळेला एका कार्यक्रमात लवकरच गौरविण्यात येणार आहे. ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ अभियानांतर्गत केंद्र शाळा वेंगुर्ले नं. १ ने अभियानाच्या जागृतीसाठी शिक्षक व विद्यार्थ्यांची शहरात फेरी काढली. स्वच्छता या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी शाळेच्या आवारात साफसफाई केली. वाडीवस्तीवर नेमलेल्या शाळेच्या स्वच्छतादूतांनी गृहभेटी घेतल्या व स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन केले. शिक्षकांनी स्वच्छतेचे संदेश फलकावर लिहून विद्यार्थ्यांना त्याची माहिती करून दिली. शाळेतील मीना राजू मंचच्या विद्यार्थ्यांनी पोस्ट कार्डद्वारे संदेश लेखन केले व स्वच्छतादूतांकरवी त्याचा प्रसार करण्यात आला. शाळेमध्ये स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याच्या सुविधांची उपलब्धता या उपक्रमांमध्ये स्वच्छतेचे संदेश, पाणी निर्जंतुकीकरण, स्वच्छतागृहाची स्वच्छता याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. माता, पालक मेळाव्यात संगीतातून स्वच्छतेविषयी जागरूकता करण्यात आली. क्रीडांगणाची स्वच्छता व खेळाच्या साहित्याची देखभाल करण्यात आली. आरोग्यासाठी हातधुवा दिन साजरा करण्यात आला. या संपूर्ण अभियानाचे शाळेमध्ये नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका प्राची आंगणे यांनी केले. या सर्व उपक्रमांना शाळेच्या शिक्षिका कोमल पाटील, माधुरी परब, शमा कडुलकर, सानिका कदम, तमन्ना अत्तार यांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)