शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
3
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
4
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
5
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
6
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
7
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
8
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
9
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
10
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
11
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
12
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
13
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
14
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
15
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
16
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
17
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
18
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
19
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
20
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

वेंगुर्लेत चुरस रंगणार

By admin | Updated: October 30, 2016 23:48 IST

नगरपरिषदेची निवडणूक : उमेदवारांची संख्या वाढली; १७ जागांसाठी ७५ उमेदवार

 प्रथमेश गुरव ल्ल वेंगुर्ले वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांची भाऊगर्दी झाली. १७ जागांसाठी ७५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून येत्या २ नोव्हेंबरला होणाऱ्या उमेदवारांच्या छाननीत किती उमेदवारांचे अर्ज अवैध ठरतात हे लवकरच समजणार आहे. यावेळी सर्वच पक्षांनी उमेदवारीमध्ये बदल करून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. पक्षांनी दिलेल्या या संधीचा मतदार किती उपयोग करुन घेतात हे मात्र निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गेले काही दिवस सुयोग्य उमेदवार देण्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले होते. शिवसेना-भाजप युती होईल, असे सर्वांनाच वाटले होते. मात्र, ऐनवेळी युती न झाल्याने उमेदवारीसाठी तारांबळ उडाली. परिणामी शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचे ठरवित नवीन चेहऱ्यांना संधी देत सतराही जागांवर आपले उमेदवार उभे केले. काँग्रेसनेही बऱ्यापैकी नव्यांनाच संधी देत १५ जागांवर उमेदवार दिले. तर मागच्या निवडणुकीवेळी निवडून आलेले काँग्रेसचे एकमेव उमेदवार दाजी परब यांना यावेळी प्रशासनामार्फत देण्यात येणारे अधिकृत फॉर्म नसल्याने माघार घ्यावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसने दोन नवीन चेहऱ्यांना संधी देत ७ उमेदवार उभे केले. यात पूर्वी काँग्रेसमधून लढलेल्या उमेदवारांचाही समावेश आहे. अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांमध्ये जुन्या अनभुवी उमेदवारांची संख्या जास्त आहे. निवडणुकीची तारीख जाहीर होताच इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त दिसत होती. संबंधित पक्षांकडून आपल्यालाच उमेदवारी मिळणार, या अनुषंगाने मतदारांच्या गाठीभेटी घेणे, चर्चा आदी कार्यक्रम सुरु केले होते. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांनी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा घेतलेला निर्णय काहींच्या पथ्यावर पडला. पक्षाच्या या निर्णयामुळे नाराज इच्छुक उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. तर आधीच पक्षाकडून उमेदवारी आपल्याला मिळणार नसल्याची कुणकुण लागलेल्या उमेदवारांनी पक्षबदल करीत संबंधित पक्षाची उमेदवारी स्वीकारली. पक्षनिष्ठा कायम ठेवून पक्षाकडून उमेदवारी अर्ज न मिळालेल्या उमेदवारांवर ‘हेचि फळ काय मम तपासी’ असे म्हणण्याची वेळ आली. एकंदरीत पक्ष बदलून, अपक्ष राहून नाराज उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली. पण हे उमेदवार आपल्या मताशी ठाम राहतात की प्रलोभनांना बळी पडून उमेदवारी अर्ज मागे घेतात, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे. निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार हे बहुतांशी नवीन असल्याने मतदारांनाही उमेदवार निवडणे कष्टाचे पडणार आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकींमध्ये आपलेच शेजारी, मित्रमंडळी, नातेवाईक, समाजबांधव उभे रहात असल्याने पक्षांनाही याचा फायदा होणार आहे. मात्र, हा फायदा कोणता पक्ष करून घेतो, याबाबतचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. उमेदवारी अर्ज भरल्यामुळे प्रचारयंत्रणाही जोरदार सुरु होणार आहे. अधिकृत पक्षांचे उमेदवार प्रचारासाठी आपल्या पक्षाच्या चिन्हांचा वापर करणार आहेत. तर अपक्ष उमेदवार चिन्ह मिळेपर्यंत तूर्तास आपले नावच लक्षात ठेवण्यास सांगणार आहेत.