शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

वेंगुर्लेत चुरस रंगणार

By admin | Updated: October 30, 2016 23:48 IST

नगरपरिषदेची निवडणूक : उमेदवारांची संख्या वाढली; १७ जागांसाठी ७५ उमेदवार

 प्रथमेश गुरव ल्ल वेंगुर्ले वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांची भाऊगर्दी झाली. १७ जागांसाठी ७५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून येत्या २ नोव्हेंबरला होणाऱ्या उमेदवारांच्या छाननीत किती उमेदवारांचे अर्ज अवैध ठरतात हे लवकरच समजणार आहे. यावेळी सर्वच पक्षांनी उमेदवारीमध्ये बदल करून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. पक्षांनी दिलेल्या या संधीचा मतदार किती उपयोग करुन घेतात हे मात्र निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गेले काही दिवस सुयोग्य उमेदवार देण्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले होते. शिवसेना-भाजप युती होईल, असे सर्वांनाच वाटले होते. मात्र, ऐनवेळी युती न झाल्याने उमेदवारीसाठी तारांबळ उडाली. परिणामी शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचे ठरवित नवीन चेहऱ्यांना संधी देत सतराही जागांवर आपले उमेदवार उभे केले. काँग्रेसनेही बऱ्यापैकी नव्यांनाच संधी देत १५ जागांवर उमेदवार दिले. तर मागच्या निवडणुकीवेळी निवडून आलेले काँग्रेसचे एकमेव उमेदवार दाजी परब यांना यावेळी प्रशासनामार्फत देण्यात येणारे अधिकृत फॉर्म नसल्याने माघार घ्यावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसने दोन नवीन चेहऱ्यांना संधी देत ७ उमेदवार उभे केले. यात पूर्वी काँग्रेसमधून लढलेल्या उमेदवारांचाही समावेश आहे. अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांमध्ये जुन्या अनभुवी उमेदवारांची संख्या जास्त आहे. निवडणुकीची तारीख जाहीर होताच इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त दिसत होती. संबंधित पक्षांकडून आपल्यालाच उमेदवारी मिळणार, या अनुषंगाने मतदारांच्या गाठीभेटी घेणे, चर्चा आदी कार्यक्रम सुरु केले होते. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांनी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा घेतलेला निर्णय काहींच्या पथ्यावर पडला. पक्षाच्या या निर्णयामुळे नाराज इच्छुक उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. तर आधीच पक्षाकडून उमेदवारी आपल्याला मिळणार नसल्याची कुणकुण लागलेल्या उमेदवारांनी पक्षबदल करीत संबंधित पक्षाची उमेदवारी स्वीकारली. पक्षनिष्ठा कायम ठेवून पक्षाकडून उमेदवारी अर्ज न मिळालेल्या उमेदवारांवर ‘हेचि फळ काय मम तपासी’ असे म्हणण्याची वेळ आली. एकंदरीत पक्ष बदलून, अपक्ष राहून नाराज उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली. पण हे उमेदवार आपल्या मताशी ठाम राहतात की प्रलोभनांना बळी पडून उमेदवारी अर्ज मागे घेतात, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे. निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार हे बहुतांशी नवीन असल्याने मतदारांनाही उमेदवार निवडणे कष्टाचे पडणार आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकींमध्ये आपलेच शेजारी, मित्रमंडळी, नातेवाईक, समाजबांधव उभे रहात असल्याने पक्षांनाही याचा फायदा होणार आहे. मात्र, हा फायदा कोणता पक्ष करून घेतो, याबाबतचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. उमेदवारी अर्ज भरल्यामुळे प्रचारयंत्रणाही जोरदार सुरु होणार आहे. अधिकृत पक्षांचे उमेदवार प्रचारासाठी आपल्या पक्षाच्या चिन्हांचा वापर करणार आहेत. तर अपक्ष उमेदवार चिन्ह मिळेपर्यंत तूर्तास आपले नावच लक्षात ठेवण्यास सांगणार आहेत.