शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

वाशी मार्केटमध्ये ८० हजार पेट्यांची आवक

By admin | Updated: May 6, 2015 00:18 IST

हापूस आला रे...: आवक वाढल्याने दर गडगडले

रत्नागिरी : उष्मा वाढल्यामुळे आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. अवकाळीतून वाचलेला आंबा शेतकरी मार्केटमध्ये विक्रीस पाठवित आहेत. सध्या वाशी मार्केटमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातून ८० हजार पेट्यांची आवक होत आहे. मार्केटमधील एकूण आवक लक्षात घेता दररोज तीन ते चार टन आंबा परदेशी निर्यात केला जात असल्याची माहिती मुंबई कृषी उत्पन्न समितीचे माजी संचालक संजय पानसरे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.वाशी मार्केटमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पाठवण्यात येणाऱ्या आंबा पेट्यांची आवक दिवसेंदिवस वाढू लागली आहे. उकाडा वाढल्यामुळे आंबा तयार होत आहे. आवक वाढल्यामुळे दरामध्ये प्रचंड घसरण झाल्याचे दिसून येत आहे. ६०० ते अडीच हजार रुपये दराने पेट्यांची विक्री सुरु आहे. अवकाळी पावसामुळे आंब्यावर डाग पडले आहेत. चांगल्या दर्जाच्या आंब्याला मात्र दर चांगला मिळत आहे. हा दर टिकावा, अशी मागणी करण्यात येत आहे.वाशी मार्केटमधून दररोज तीन ते चार टन आंबा न्युझीलंड, युरोप, अमेरिका, मॉरिशस, आखाती देशात निर्यात होत आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक सुरु झाली. सुरुवातीला पेटीला २ ते ५ हजार इतका दर मिळत होता. परंतु आवक वाढल्याने दरामध्ये घसरण झाली. १५०० ते ४००० पर्यंत भाव खाली आला. त्यानंतर भावामध्ये आतापर्यंत सातत्याने घसरण झाल्याचे निदर्शनास येत आहे.अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे फांद्या तुटणे, झाडे कोसळणे आदी प्रकारामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शिवाय वाढत्या तापमानामुळे आंबा मोठ्या प्रमाणावर भाजत आहे. परदेशी निर्यात सुरु झाल्यामुळे आंब्याचे दर स्थिर राहाणे अपेक्षित होते. जेणेकरुन शेतकऱ्यांचे आतापर्यंतचे झालेले नुकसान काहीअंशी भरुन निघण्यास मदत झाली असती. झाडांना घालण्यात येणारी खते, मोहोर आल्यापासून वापरण्यात येणारी कीटकनाशके, कीटकनाशकांचे वाढते दर, इंधन खर्च, मजूरी, आंबा तयार झाल्यानंतर मार्केटमध्ये पाठवेपर्यंत करण्यात येणारा वाहतूक खर्च, हमाली, दलाली आदी खर्च वगळता शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न नगण्य आहे. त्या तुलनेत व्यापारी गब्बर होत आहेत.गतवर्षी या दिवसात लाख ते सवा लाख पेट्या विक्रीला येत असत. मात्र, यावर्षी उत्पादन घटल्याने ८० हजार पेट्याच विक्रीला आहेत. दरवर्षीच्या तुलनेत दररोज ५० ते ५५ हजार पेट्याची आवक घटली आहे. शेतकरी आंब्याची वर्गवारी करून निवडक आंबा भरून पेट्या वाशी, पुणे, अहमदाबाद मार्केटमध्ये पाठवत आहेत. कोल्हापूर मार्केटमध्ये पिकलेला आंबा पाठविण्यात येत आहे. पेट्या भरून उरलेला आंबा किलोवर कॅनिंगसाठी टाकण्यात येत आहे. सध्या कॅनिंगचा दर ३० ते ३१ रूपये किलो दराने आहे. वृत्तपत्रातून कॅनिंगचे दर जाहीर करण्यात येत असतानाही ग्रामीण भागात मात्र २८ ते २९ रूपये दराने आंबा विकत घेण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे किलो मागे २ ते ३ रूपये नुकसान होत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची चक्क फसवणूक सुरू आहे. बाजारपेठेत अन्य राज्यातील आंबाही दाखल झाला आहे. नीलम, केशर, राघू, कर्नाटक लालबाग जातीचे आंबे विक्रीला आले आहेत. आंब्याची विक्री किलोवर करण्यात येत आहे. रत्नागिरी हापूससाठी मात्र रूमालाखाली बोटांच्या हालचालीवरून दर ठरविला जात आहे.सध्या पेटीला ६०० ते २५०० रूपये इतका दर देण्यात येत असला तरी शेतकऱ्यांना त्यातून मिळणारा दर मात्र प्रत्यक्षात अल्प आहे. (प्रतिनिधी)वाशी मार्केटमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातून ८० हजार पेट्यांची आवक.दररोज तीन ते चार टन आंबा होतो परदेशी निर्यात.मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक सुरु.आवक वाढल्याने दर झाले कमी.भावामध्ये सातत्याने घसरण सुरुच.रत्नागिरी हापूसचा लिलाव बोटांच्या हालचालीवरून.जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ६४,८७४ शेतकऱ्यांचे आंबा पिकाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे. २०,७१८ हेक्टर क्षेत्रावरील आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. यावर्षीही अवकाळी नुकसानीबरोबरच दरातील घसरण यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.