शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

वाशी मार्केटमध्ये ८० हजार पेट्यांची आवक

By admin | Updated: May 6, 2015 00:18 IST

हापूस आला रे...: आवक वाढल्याने दर गडगडले

रत्नागिरी : उष्मा वाढल्यामुळे आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. अवकाळीतून वाचलेला आंबा शेतकरी मार्केटमध्ये विक्रीस पाठवित आहेत. सध्या वाशी मार्केटमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातून ८० हजार पेट्यांची आवक होत आहे. मार्केटमधील एकूण आवक लक्षात घेता दररोज तीन ते चार टन आंबा परदेशी निर्यात केला जात असल्याची माहिती मुंबई कृषी उत्पन्न समितीचे माजी संचालक संजय पानसरे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.वाशी मार्केटमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पाठवण्यात येणाऱ्या आंबा पेट्यांची आवक दिवसेंदिवस वाढू लागली आहे. उकाडा वाढल्यामुळे आंबा तयार होत आहे. आवक वाढल्यामुळे दरामध्ये प्रचंड घसरण झाल्याचे दिसून येत आहे. ६०० ते अडीच हजार रुपये दराने पेट्यांची विक्री सुरु आहे. अवकाळी पावसामुळे आंब्यावर डाग पडले आहेत. चांगल्या दर्जाच्या आंब्याला मात्र दर चांगला मिळत आहे. हा दर टिकावा, अशी मागणी करण्यात येत आहे.वाशी मार्केटमधून दररोज तीन ते चार टन आंबा न्युझीलंड, युरोप, अमेरिका, मॉरिशस, आखाती देशात निर्यात होत आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक सुरु झाली. सुरुवातीला पेटीला २ ते ५ हजार इतका दर मिळत होता. परंतु आवक वाढल्याने दरामध्ये घसरण झाली. १५०० ते ४००० पर्यंत भाव खाली आला. त्यानंतर भावामध्ये आतापर्यंत सातत्याने घसरण झाल्याचे निदर्शनास येत आहे.अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे फांद्या तुटणे, झाडे कोसळणे आदी प्रकारामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शिवाय वाढत्या तापमानामुळे आंबा मोठ्या प्रमाणावर भाजत आहे. परदेशी निर्यात सुरु झाल्यामुळे आंब्याचे दर स्थिर राहाणे अपेक्षित होते. जेणेकरुन शेतकऱ्यांचे आतापर्यंतचे झालेले नुकसान काहीअंशी भरुन निघण्यास मदत झाली असती. झाडांना घालण्यात येणारी खते, मोहोर आल्यापासून वापरण्यात येणारी कीटकनाशके, कीटकनाशकांचे वाढते दर, इंधन खर्च, मजूरी, आंबा तयार झाल्यानंतर मार्केटमध्ये पाठवेपर्यंत करण्यात येणारा वाहतूक खर्च, हमाली, दलाली आदी खर्च वगळता शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न नगण्य आहे. त्या तुलनेत व्यापारी गब्बर होत आहेत.गतवर्षी या दिवसात लाख ते सवा लाख पेट्या विक्रीला येत असत. मात्र, यावर्षी उत्पादन घटल्याने ८० हजार पेट्याच विक्रीला आहेत. दरवर्षीच्या तुलनेत दररोज ५० ते ५५ हजार पेट्याची आवक घटली आहे. शेतकरी आंब्याची वर्गवारी करून निवडक आंबा भरून पेट्या वाशी, पुणे, अहमदाबाद मार्केटमध्ये पाठवत आहेत. कोल्हापूर मार्केटमध्ये पिकलेला आंबा पाठविण्यात येत आहे. पेट्या भरून उरलेला आंबा किलोवर कॅनिंगसाठी टाकण्यात येत आहे. सध्या कॅनिंगचा दर ३० ते ३१ रूपये किलो दराने आहे. वृत्तपत्रातून कॅनिंगचे दर जाहीर करण्यात येत असतानाही ग्रामीण भागात मात्र २८ ते २९ रूपये दराने आंबा विकत घेण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे किलो मागे २ ते ३ रूपये नुकसान होत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची चक्क फसवणूक सुरू आहे. बाजारपेठेत अन्य राज्यातील आंबाही दाखल झाला आहे. नीलम, केशर, राघू, कर्नाटक लालबाग जातीचे आंबे विक्रीला आले आहेत. आंब्याची विक्री किलोवर करण्यात येत आहे. रत्नागिरी हापूससाठी मात्र रूमालाखाली बोटांच्या हालचालीवरून दर ठरविला जात आहे.सध्या पेटीला ६०० ते २५०० रूपये इतका दर देण्यात येत असला तरी शेतकऱ्यांना त्यातून मिळणारा दर मात्र प्रत्यक्षात अल्प आहे. (प्रतिनिधी)वाशी मार्केटमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातून ८० हजार पेट्यांची आवक.दररोज तीन ते चार टन आंबा होतो परदेशी निर्यात.मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक सुरु.आवक वाढल्याने दर झाले कमी.भावामध्ये सातत्याने घसरण सुरुच.रत्नागिरी हापूसचा लिलाव बोटांच्या हालचालीवरून.जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ६४,८७४ शेतकऱ्यांचे आंबा पिकाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे. २०,७१८ हेक्टर क्षेत्रावरील आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. यावर्षीही अवकाळी नुकसानीबरोबरच दरातील घसरण यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.