शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

वाशी मार्केटमध्ये ८० हजार पेट्यांची आवक

By admin | Updated: May 6, 2015 00:18 IST

हापूस आला रे...: आवक वाढल्याने दर गडगडले

रत्नागिरी : उष्मा वाढल्यामुळे आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. अवकाळीतून वाचलेला आंबा शेतकरी मार्केटमध्ये विक्रीस पाठवित आहेत. सध्या वाशी मार्केटमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातून ८० हजार पेट्यांची आवक होत आहे. मार्केटमधील एकूण आवक लक्षात घेता दररोज तीन ते चार टन आंबा परदेशी निर्यात केला जात असल्याची माहिती मुंबई कृषी उत्पन्न समितीचे माजी संचालक संजय पानसरे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.वाशी मार्केटमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पाठवण्यात येणाऱ्या आंबा पेट्यांची आवक दिवसेंदिवस वाढू लागली आहे. उकाडा वाढल्यामुळे आंबा तयार होत आहे. आवक वाढल्यामुळे दरामध्ये प्रचंड घसरण झाल्याचे दिसून येत आहे. ६०० ते अडीच हजार रुपये दराने पेट्यांची विक्री सुरु आहे. अवकाळी पावसामुळे आंब्यावर डाग पडले आहेत. चांगल्या दर्जाच्या आंब्याला मात्र दर चांगला मिळत आहे. हा दर टिकावा, अशी मागणी करण्यात येत आहे.वाशी मार्केटमधून दररोज तीन ते चार टन आंबा न्युझीलंड, युरोप, अमेरिका, मॉरिशस, आखाती देशात निर्यात होत आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक सुरु झाली. सुरुवातीला पेटीला २ ते ५ हजार इतका दर मिळत होता. परंतु आवक वाढल्याने दरामध्ये घसरण झाली. १५०० ते ४००० पर्यंत भाव खाली आला. त्यानंतर भावामध्ये आतापर्यंत सातत्याने घसरण झाल्याचे निदर्शनास येत आहे.अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे फांद्या तुटणे, झाडे कोसळणे आदी प्रकारामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शिवाय वाढत्या तापमानामुळे आंबा मोठ्या प्रमाणावर भाजत आहे. परदेशी निर्यात सुरु झाल्यामुळे आंब्याचे दर स्थिर राहाणे अपेक्षित होते. जेणेकरुन शेतकऱ्यांचे आतापर्यंतचे झालेले नुकसान काहीअंशी भरुन निघण्यास मदत झाली असती. झाडांना घालण्यात येणारी खते, मोहोर आल्यापासून वापरण्यात येणारी कीटकनाशके, कीटकनाशकांचे वाढते दर, इंधन खर्च, मजूरी, आंबा तयार झाल्यानंतर मार्केटमध्ये पाठवेपर्यंत करण्यात येणारा वाहतूक खर्च, हमाली, दलाली आदी खर्च वगळता शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न नगण्य आहे. त्या तुलनेत व्यापारी गब्बर होत आहेत.गतवर्षी या दिवसात लाख ते सवा लाख पेट्या विक्रीला येत असत. मात्र, यावर्षी उत्पादन घटल्याने ८० हजार पेट्याच विक्रीला आहेत. दरवर्षीच्या तुलनेत दररोज ५० ते ५५ हजार पेट्याची आवक घटली आहे. शेतकरी आंब्याची वर्गवारी करून निवडक आंबा भरून पेट्या वाशी, पुणे, अहमदाबाद मार्केटमध्ये पाठवत आहेत. कोल्हापूर मार्केटमध्ये पिकलेला आंबा पाठविण्यात येत आहे. पेट्या भरून उरलेला आंबा किलोवर कॅनिंगसाठी टाकण्यात येत आहे. सध्या कॅनिंगचा दर ३० ते ३१ रूपये किलो दराने आहे. वृत्तपत्रातून कॅनिंगचे दर जाहीर करण्यात येत असतानाही ग्रामीण भागात मात्र २८ ते २९ रूपये दराने आंबा विकत घेण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे किलो मागे २ ते ३ रूपये नुकसान होत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची चक्क फसवणूक सुरू आहे. बाजारपेठेत अन्य राज्यातील आंबाही दाखल झाला आहे. नीलम, केशर, राघू, कर्नाटक लालबाग जातीचे आंबे विक्रीला आले आहेत. आंब्याची विक्री किलोवर करण्यात येत आहे. रत्नागिरी हापूससाठी मात्र रूमालाखाली बोटांच्या हालचालीवरून दर ठरविला जात आहे.सध्या पेटीला ६०० ते २५०० रूपये इतका दर देण्यात येत असला तरी शेतकऱ्यांना त्यातून मिळणारा दर मात्र प्रत्यक्षात अल्प आहे. (प्रतिनिधी)वाशी मार्केटमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातून ८० हजार पेट्यांची आवक.दररोज तीन ते चार टन आंबा होतो परदेशी निर्यात.मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक सुरु.आवक वाढल्याने दर झाले कमी.भावामध्ये सातत्याने घसरण सुरुच.रत्नागिरी हापूसचा लिलाव बोटांच्या हालचालीवरून.जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ६४,८७४ शेतकऱ्यांचे आंबा पिकाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे. २०,७१८ हेक्टर क्षेत्रावरील आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. यावर्षीही अवकाळी नुकसानीबरोबरच दरातील घसरण यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.