शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

वाशी मार्केटमध्ये ८० हजार पेट्यांची आवक

By admin | Updated: May 6, 2015 00:18 IST

हापूस आला रे...: आवक वाढल्याने दर गडगडले

रत्नागिरी : उष्मा वाढल्यामुळे आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. अवकाळीतून वाचलेला आंबा शेतकरी मार्केटमध्ये विक्रीस पाठवित आहेत. सध्या वाशी मार्केटमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातून ८० हजार पेट्यांची आवक होत आहे. मार्केटमधील एकूण आवक लक्षात घेता दररोज तीन ते चार टन आंबा परदेशी निर्यात केला जात असल्याची माहिती मुंबई कृषी उत्पन्न समितीचे माजी संचालक संजय पानसरे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.वाशी मार्केटमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पाठवण्यात येणाऱ्या आंबा पेट्यांची आवक दिवसेंदिवस वाढू लागली आहे. उकाडा वाढल्यामुळे आंबा तयार होत आहे. आवक वाढल्यामुळे दरामध्ये प्रचंड घसरण झाल्याचे दिसून येत आहे. ६०० ते अडीच हजार रुपये दराने पेट्यांची विक्री सुरु आहे. अवकाळी पावसामुळे आंब्यावर डाग पडले आहेत. चांगल्या दर्जाच्या आंब्याला मात्र दर चांगला मिळत आहे. हा दर टिकावा, अशी मागणी करण्यात येत आहे.वाशी मार्केटमधून दररोज तीन ते चार टन आंबा न्युझीलंड, युरोप, अमेरिका, मॉरिशस, आखाती देशात निर्यात होत आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक सुरु झाली. सुरुवातीला पेटीला २ ते ५ हजार इतका दर मिळत होता. परंतु आवक वाढल्याने दरामध्ये घसरण झाली. १५०० ते ४००० पर्यंत भाव खाली आला. त्यानंतर भावामध्ये आतापर्यंत सातत्याने घसरण झाल्याचे निदर्शनास येत आहे.अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे फांद्या तुटणे, झाडे कोसळणे आदी प्रकारामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शिवाय वाढत्या तापमानामुळे आंबा मोठ्या प्रमाणावर भाजत आहे. परदेशी निर्यात सुरु झाल्यामुळे आंब्याचे दर स्थिर राहाणे अपेक्षित होते. जेणेकरुन शेतकऱ्यांचे आतापर्यंतचे झालेले नुकसान काहीअंशी भरुन निघण्यास मदत झाली असती. झाडांना घालण्यात येणारी खते, मोहोर आल्यापासून वापरण्यात येणारी कीटकनाशके, कीटकनाशकांचे वाढते दर, इंधन खर्च, मजूरी, आंबा तयार झाल्यानंतर मार्केटमध्ये पाठवेपर्यंत करण्यात येणारा वाहतूक खर्च, हमाली, दलाली आदी खर्च वगळता शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न नगण्य आहे. त्या तुलनेत व्यापारी गब्बर होत आहेत.गतवर्षी या दिवसात लाख ते सवा लाख पेट्या विक्रीला येत असत. मात्र, यावर्षी उत्पादन घटल्याने ८० हजार पेट्याच विक्रीला आहेत. दरवर्षीच्या तुलनेत दररोज ५० ते ५५ हजार पेट्याची आवक घटली आहे. शेतकरी आंब्याची वर्गवारी करून निवडक आंबा भरून पेट्या वाशी, पुणे, अहमदाबाद मार्केटमध्ये पाठवत आहेत. कोल्हापूर मार्केटमध्ये पिकलेला आंबा पाठविण्यात येत आहे. पेट्या भरून उरलेला आंबा किलोवर कॅनिंगसाठी टाकण्यात येत आहे. सध्या कॅनिंगचा दर ३० ते ३१ रूपये किलो दराने आहे. वृत्तपत्रातून कॅनिंगचे दर जाहीर करण्यात येत असतानाही ग्रामीण भागात मात्र २८ ते २९ रूपये दराने आंबा विकत घेण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे किलो मागे २ ते ३ रूपये नुकसान होत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची चक्क फसवणूक सुरू आहे. बाजारपेठेत अन्य राज्यातील आंबाही दाखल झाला आहे. नीलम, केशर, राघू, कर्नाटक लालबाग जातीचे आंबे विक्रीला आले आहेत. आंब्याची विक्री किलोवर करण्यात येत आहे. रत्नागिरी हापूससाठी मात्र रूमालाखाली बोटांच्या हालचालीवरून दर ठरविला जात आहे.सध्या पेटीला ६०० ते २५०० रूपये इतका दर देण्यात येत असला तरी शेतकऱ्यांना त्यातून मिळणारा दर मात्र प्रत्यक्षात अल्प आहे. (प्रतिनिधी)वाशी मार्केटमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातून ८० हजार पेट्यांची आवक.दररोज तीन ते चार टन आंबा होतो परदेशी निर्यात.मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक सुरु.आवक वाढल्याने दर झाले कमी.भावामध्ये सातत्याने घसरण सुरुच.रत्नागिरी हापूसचा लिलाव बोटांच्या हालचालीवरून.जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ६४,८७४ शेतकऱ्यांचे आंबा पिकाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे. २०,७१८ हेक्टर क्षेत्रावरील आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. यावर्षीही अवकाळी नुकसानीबरोबरच दरातील घसरण यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.