शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वनराई बंधारे दुपटीने वाढणार

By admin | Updated: October 9, 2015 23:38 IST

पाणीटंचाई उपाय : मालवणात १८०० बंधारे बांधणार

मालवण : मालवण तालुक्यात जून ते सप्टेंबर हा पावसाळी हंगाम संपला. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत एक हजार मिलीमीटर कमी पावसाची नोंद झाली. ३० सप्टेंबरपर्यंत २६६५ मिमी पावसाची नोंद झाली होती. यावर्षी याच तारखेपर्यंत केवळ १५८९ मिमीच पाऊस पडल्याने केवळ ६० टक्के पावसाची नोंद झाली आहे. परिणामी यावर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या वनराई बंधाऱ्यांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. तालुक्यात १८०० वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. त्याचा प्रारंभ पळसंब येथे वनराई बंधारा बांधून झाला.मालवण तालुक्यात सरासरी दरवर्षी ९०० ते १००० बंधारे उभारले जातात. एवढ्या संख्येने बंधारे उभारल्याने तालुक्यातील पाणीटंचाईची समस्या बऱ्यापैकी कमी झाली होती. काही मोजकीच गावे पाणीटंचाईत समाविष्ट करावी लागत होती. यासाठी पंचायत समितीतर्फे विशेष नियोजन करून ग्रामपंचायतीमार्फत हा उपक्रम राबविला जातो. जागोजागी वनराई बंधारे बांधल्याने भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासही मदत झाल्याचे अनेक विहिरीतील पाणी साठ्यावरून स्पष्ट झाले होते. मात्र, यावर्षी पाऊस कमी पडला आहे. २०११ च्या तुलनेत हा पाऊस केवळ ३० टक्केच पडला आहे. २०१४ च्या तुलनेत पावसाची सरासरी ६० टक्के राहिली आहे. अपेक्षित पाऊस न झाल्याने आताच ओहोळ, नाल्यातील पाणी आटू लागले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)कृषी विभागाने कंबर कसली २ आॅक्टोबर रोजी झालेल्या सत्कार समारंभावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी मालवण तालुक्याला यावर्षी १८०० वनराई बंधाऱ्यांचे उद्दिष्ट देण्यात आल्याचे सांगितले. त्यानुसार सभापती सीमा परुळेकर व गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागातर्फे बंधाऱ्यांचे नियोजन करण्यात येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत बंधाऱ्यांची संख्या दुप्पट केल्याने त्याचे नियोजन व बंधारे पूर्ण होईपर्यंत कृषी विभागाचा कस लागणार आहे. मालवण तालुक्यातील वनराई बंधारे उभारण्याचा प्रारंभ पळसंब बौद्धवाडी येथे झाला. येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून ओहोळावर वनराई बंधारा बांधला. यावेळी सरपंच दीपिका परब व ग्रामसेविका एस. यू. सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.