शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
3
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
4
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
5
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
6
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
7
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
8
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
9
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
10
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
11
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
12
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
13
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
14
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
15
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
16
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
17
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
18
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
19
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
20
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय

भास्कर जाधवांवर वायकर यांचा पलटवार

By admin | Updated: November 19, 2015 00:43 IST

विकास आराखड्यात असमतोलपणा असल्याचा आरोप निराधार

रत्नागिरी : जिल्हा नियोजन मंडळाच्या या वर्षाकरिता केलेल्या दीडशे कोटींच्या विकास आराखड्यात असमतोलपणा असल्याचा आमदार भास्कर जाधव यांचा आरोप निराधार आहे. निधीचे वाटप नियमानुसार व तालुकावार समान होणार आहे. आधीच्या पालकमंत्र्यांनी आपल्याच भागात १४ कोटींपेक्षा अधिक निधी वापरून अन्य भागांवर अन्याय केला होता. अन्य आमदारांना विकासासाठी केवळ २ ते अडीच कोटी रुपयेच मिळाले होते, असा आरोप पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी आज (बुधवार) पत्रकारपरिषदेत केला. जिल्हा नियोजन मंडळाची बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी आराखड्यानुसार विकासकामांच्या प्रस्तावाची काय स्थिती आहे, याची माहिती वायकर यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. यावेळी सरकारच्या एक वर्षांच्या काळात जिल्ह्यात केलेल्या विकासकामांचा अहवाल सादर केला. या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत तक्रारी आल्या. त्यानुसार आपण त्यांच्याशी याआधी चर्चा केली आहे. तरीही त्यात सुधारणा न झाल्यास अ‍ॅक्शन घेणे भाग पडेल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी) राज यांचा आरोप चुकीचा महापौर बंगल्याची जागा सेनाप्रमुख ठाकरे यांना खूप प्रिय होती. त्यामुळे तेथे स्मारक उभारण्याचा निर्णय योग्यच असल्याचे शिवसेनेचे मत आहे. याबाबत राज ठाकरे यांचा आरोप चुकीचा आहे. स्मारकाला विरोध करणाऱ्या राज यांचा काकांबाबतचा आदरभाव गेला कुठे, असा सवाल वायकर यांनी केला. ...तर मी भाग्यवानच माझ्या मातोश्री क्लबसाठी ५ एकर जागा दिली जाते, तर ठाकरेंच्या स्मारकासाठी अडीच एकर जागा का ? असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते. त्याबाबत वायकर म्हणाले, या प्रकल्पाच्या ठिकाणी सेनाप्रमुखांचे स्मारक झाले तर मी भाग्यवान समजेन. परंतु ज्याठिकाणी सेनाप्रमुख वावरत होते, बैठका घ्यायचे ते त्यांचे प्रिय ठिकाण महापौर बंगल्याचेच आहे, असेही ते म्हणाले.