शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

vकुडाळ तालुका राष्ट्रवादीच्यावतीने वनअधिकाऱ्यांना घेराओ घालणार

By admin | Updated: November 23, 2014 23:57 IST

निवेदनातून इशारा : हत्ती हल्ल्यातील जखमीला तातडीने मदत द्या

कुडाळ : वेताळबांबर्डे-गडकरवाडी येथील हत्तींच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वैभव गायकवाड या युवकाला दोन दिवसात वनविभागाने आर्थिक मदत न दिल्यास कुडाळ तालुका राष्ट्रवादीच्यावतीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेराओ घालण्यात येईल, असा इशारा कुडाळ तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दादा बेळणेकर यांनी वनविभागाला दिला.वेताळबांबर्डे-गडकरीवाडी येथील वैभव गायकवाड या युवकावर रविवारी रानटी हत्तींनी हल्ला करून गंभीर जखमी केले होते. वैभवला वनविभागाकडून आतापर्यंत फक्त पाच हजार रुपयांचीच मदत देण्यात आली असून या घटनेला चार ते पाच दिवस झाले तरी पूर्णपणे मदत दिली गेलेली नाही. यामुळे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दादा बेळणेकर, प्रदेश सरचिटणीस अमित सामंत, उपसभापती आर. के. सावंत, भास्कर परब, जिल्हा परिषद सदस्या रेवती राणे, पूनम सावंत, संग्राम सावंत, साबा पाटकर, कृष्णा बिबवणेकर, महादेव राऊळ, उत्तम सराफदार, अशोक पालव, संदीप राणे, शिवाजी घोगळे, धीरज पांचाळ, सूर्यकांत नाईक या राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कुडाळ वनविभागाचे वनक्षेत्रपाल संजय कदम यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली.यावेळी या हत्तींच्या कायमस्वरुपी बंदोबस्तासाठी कोणत्या उपाययोजना करणार, असा प्रश्न वनक्षेत्रपाल यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी विचारला. यावर उत्तर देताना वनक्षेत्रपाल म्हणाले की, कर्नाटकातून हत्ती प्रशिक्षक मागविण्यात येणार असून हत्तींना पकडण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येईल. हत्ती प्रशिक्षित करण्यासाठी आंब्रड येथे जागा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच या मोहिमेसाठी जिल्हाधिकारी यांना प्राथमिक स्वरुपात १४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.जखमी वैभवच्या औषधोपचाराचा सर्व खर्च वनविभागाने उचलावा, अशी मागणी यावेळी सर्वांनी केली. (प्रतिनिधी)