शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘सगुणा’ पद्धतीचा वापर वाढतोय--जिल्हा कृषी अधीक्षक आरिफ शहा

By admin | Updated: June 23, 2015 00:49 IST

सगुणा, चारसूत्री लागवड पध्दतीचा शेतकऱ्यांकडून अवलंब

पेरणीचे क्षेत्र न भाजता गादीवाफे तयार करून त्यावर भात लागवड करण्यात येते. भात कापणीनंतर त्यावर वाल, कडवा यासारखी पिके घेता येतात. त्यासाठी टोकण पध्दती अवलंबली जाते. पहिल्यांदा नांगरणी करून गादीवाफे तयार केल्यानंतर पुढे तीन ते चार वर्षे नांगरणी करण्याची गरज भासत नाही. शिवाय शेतातील तण काढण्यासाठी तणनाशकांचा वापर केला जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ‘सगुणा पध्दत’ प्रचलित होवू लागली आहे. चिपळूणात गतवर्षी पहिल्यांदा ही पध्दत अवलंबली गेली यावर्षी चिपळूण, संगमेश्वर, दापोली तालुक्यातील २०० एकर क्षेत्रावर सगुणा पध्दतीने भात लागवड करण्यात आली आहे. विद्यापीठाने अद्याप या पध्दतीस शिफारस केलेली नाही, मात्र याबाबत संशोधन सुरू आहे. शेतकऱ्यांना कमी खर्चात, कमी मनुष्यबळाचा वापर करून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी सगुणा पध्दत लागवडीसाठी योग्य आहे.रत्नागिरी जिल्ह्याची ओळख हापूसमुळे होत असून अर्थार्जनाचे ते प्रमुख पिक आहे. मात्र मुख्य पिक म्हणून भात पिक घेतले जाते. जिल्ह्यात प्रामुख्याने ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भात लावण्यात येते. सध्या पेरणीची शंभर टक्के कामे पूर्ण झाली आहेत. ७ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी करण्यात आली आहे. पारंपरिक पध्दतीने लागवड पध्दतीचा अवलंब करण्यात येत असला तरी सगुणा व चारसूत्री पध्दतीचा अवलंबही शेतकरी करू लागले आहेत. पाऊस चांगला पडत असल्यामुळे भाताची रोपे चांगली उगवून आली आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणीची कामे शेतकऱ्यांनी सुरू केल्यामुळे रोपांची वाढ चांगली होत आहे. त्यामुळे येत्या आठवड्यापासून भात लागवडीस प्रारंभ होण्याची शक्यता असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक आरिफ शहा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.प्रश्न : खते, बियाणांचा पुरवठा कितपत झाला आहे?उत्तर : जिल्ह्यासाठी पेरणीकरिता ६ हजार २६५ क्विंटल भाताची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी महाबीजचे ३०५६.२१ क्विंटल तर खासगी १५३२.९६ क्विंटल मिळून एकूण ४ हजार ५८९.१७ क्विंटल भात बियाणे उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यासाठी १८ हजार ७०० मेट्रीक टन खत मंजूर असून आतापर्यत १२ हजार ५९६.६० मेट्रीक टन खताची आवक झाली आहे. तालुका खरेदीविक्री संघाकडे खत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रश्न : खतांचा तुटवडा भासतो का?उत्तर : जिल्ह्यासाठी १८ हजार ७०० मेट्रीक टन खत मंजूर असून आतापर्यत १२ हजार ५९६.६० मेट्रीक खत उपलब्ध झाले आहे. युरिया खताचा अधिक वापर करण्यात येतो. ८ हजार ७४३ मेट्रीक टन युरिया खत उपलब्ध आहे. शेतकऱ्यांकडून युरियाला मागणी असल्यामुळे बाजारात सध्या युरियाचा तुटवडा जाणवत आहे. वास्तविक पावसामुळे खताची रेक येण्यास विलंब झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु उद्या (मंगळवारी) खताची उपलब्धता होणार असून शेतकऱ्यांना दोन दिवसात उपलब्ध होणार आहे. प्रश्न : शेतकरी कोणत्या प्रकारची बियाणी प्राधान्यांने वापरतात?उत्तर : प्रामुख्याने सुधारित भात बियाणांचा वापर सर्वाधिक केला जातो. ४ हजार १२५.७१ क्विंटल सुधारीत प्रकारच्या बियाणांचा वापर करण्यात आला आहे. २७२ क्विंटल संकरीत बियाणे वापरले आहे. तर एक हजार ८६७.२९ क्विंटल भात शेतकरी जुने बियाणे वापरले आहे. सुुधारीत बियाणे ३ ते ४ वर्ष वापरता येत असल्यामुळे शेतकरी त्याचा वापर करत आहेत.प्रश्न : भातपिक लागवडीसाठी कोणती पध्दत अवलंबली जाते?उत्तर : पेरणीपूर्वी भाजावळ केली जाते. पारंपरिक पध्दतीने लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. चारसूत्री पध्दतीनेही लागवड करण्यात येत आहे. ८ ते ९ टक्के क्षेत्रावर चारसूत्री पध्दतीने लागवड करण्यात येते. मात्र विद्यापीठ शिफारस नसलेली सगुणा पध्दत लोकांमध्ये प्रचलित होत आहे. प्रश्न : भातबियाणांवरील अनुदान शेतकऱ्यांना मिळेल का?उत्तर : गेली दोन वर्षे भात बियाणांवरील अनुदान बंद करण्यात आले आहे. मात्र तत्पूर्वी दोन वर्षे अनुदान देण्यात आले होते. प्रथम वर्ष ५० टक्के तर दुसऱ्यावर्षी ७५ टक्केचे अनुदान देण्यात आले असल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला होता. मात्र ते बंद करण्यात आले आहे.प्रश्न : अवकाळीची नुकसान भरपाई कधी वितरीत करणार?उत्तर : अवकाळी पावसामुळे आंबा काजू पिकाचे नुकसान झाल्याबद्दल शासनाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७९ कोटी ५३ लाख ६५ हजार २५० रूपयांचा निधी जाहीर केला आहे. पैकी ३३ कोटी ८१ लाख रूपये निधीचा पहिला हप्ता रत्नागिरी जिल्ह्यास प्राप्त झाला आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपयांप्रमाणे नुकसान भरपाईचे वितरण करण्यात येणार आहे. कृषी विभागाकडे नुकसान भरपाईचे परिपत्रक आले असले तरी भरपाईच्या रकमेची वितरण पूर्ण प्रक्रिया मात्र महसूल खात्याकडून राबवली जाणार आहे.- मेहरुन नाकाडे