शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘सगुणा’ पद्धतीचा वापर वाढतोय--जिल्हा कृषी अधीक्षक आरिफ शहा

By admin | Updated: June 23, 2015 00:49 IST

सगुणा, चारसूत्री लागवड पध्दतीचा शेतकऱ्यांकडून अवलंब

पेरणीचे क्षेत्र न भाजता गादीवाफे तयार करून त्यावर भात लागवड करण्यात येते. भात कापणीनंतर त्यावर वाल, कडवा यासारखी पिके घेता येतात. त्यासाठी टोकण पध्दती अवलंबली जाते. पहिल्यांदा नांगरणी करून गादीवाफे तयार केल्यानंतर पुढे तीन ते चार वर्षे नांगरणी करण्याची गरज भासत नाही. शिवाय शेतातील तण काढण्यासाठी तणनाशकांचा वापर केला जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ‘सगुणा पध्दत’ प्रचलित होवू लागली आहे. चिपळूणात गतवर्षी पहिल्यांदा ही पध्दत अवलंबली गेली यावर्षी चिपळूण, संगमेश्वर, दापोली तालुक्यातील २०० एकर क्षेत्रावर सगुणा पध्दतीने भात लागवड करण्यात आली आहे. विद्यापीठाने अद्याप या पध्दतीस शिफारस केलेली नाही, मात्र याबाबत संशोधन सुरू आहे. शेतकऱ्यांना कमी खर्चात, कमी मनुष्यबळाचा वापर करून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी सगुणा पध्दत लागवडीसाठी योग्य आहे.रत्नागिरी जिल्ह्याची ओळख हापूसमुळे होत असून अर्थार्जनाचे ते प्रमुख पिक आहे. मात्र मुख्य पिक म्हणून भात पिक घेतले जाते. जिल्ह्यात प्रामुख्याने ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भात लावण्यात येते. सध्या पेरणीची शंभर टक्के कामे पूर्ण झाली आहेत. ७ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी करण्यात आली आहे. पारंपरिक पध्दतीने लागवड पध्दतीचा अवलंब करण्यात येत असला तरी सगुणा व चारसूत्री पध्दतीचा अवलंबही शेतकरी करू लागले आहेत. पाऊस चांगला पडत असल्यामुळे भाताची रोपे चांगली उगवून आली आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणीची कामे शेतकऱ्यांनी सुरू केल्यामुळे रोपांची वाढ चांगली होत आहे. त्यामुळे येत्या आठवड्यापासून भात लागवडीस प्रारंभ होण्याची शक्यता असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक आरिफ शहा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.प्रश्न : खते, बियाणांचा पुरवठा कितपत झाला आहे?उत्तर : जिल्ह्यासाठी पेरणीकरिता ६ हजार २६५ क्विंटल भाताची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी महाबीजचे ३०५६.२१ क्विंटल तर खासगी १५३२.९६ क्विंटल मिळून एकूण ४ हजार ५८९.१७ क्विंटल भात बियाणे उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यासाठी १८ हजार ७०० मेट्रीक टन खत मंजूर असून आतापर्यत १२ हजार ५९६.६० मेट्रीक टन खताची आवक झाली आहे. तालुका खरेदीविक्री संघाकडे खत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रश्न : खतांचा तुटवडा भासतो का?उत्तर : जिल्ह्यासाठी १८ हजार ७०० मेट्रीक टन खत मंजूर असून आतापर्यत १२ हजार ५९६.६० मेट्रीक खत उपलब्ध झाले आहे. युरिया खताचा अधिक वापर करण्यात येतो. ८ हजार ७४३ मेट्रीक टन युरिया खत उपलब्ध आहे. शेतकऱ्यांकडून युरियाला मागणी असल्यामुळे बाजारात सध्या युरियाचा तुटवडा जाणवत आहे. वास्तविक पावसामुळे खताची रेक येण्यास विलंब झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु उद्या (मंगळवारी) खताची उपलब्धता होणार असून शेतकऱ्यांना दोन दिवसात उपलब्ध होणार आहे. प्रश्न : शेतकरी कोणत्या प्रकारची बियाणी प्राधान्यांने वापरतात?उत्तर : प्रामुख्याने सुधारित भात बियाणांचा वापर सर्वाधिक केला जातो. ४ हजार १२५.७१ क्विंटल सुधारीत प्रकारच्या बियाणांचा वापर करण्यात आला आहे. २७२ क्विंटल संकरीत बियाणे वापरले आहे. तर एक हजार ८६७.२९ क्विंटल भात शेतकरी जुने बियाणे वापरले आहे. सुुधारीत बियाणे ३ ते ४ वर्ष वापरता येत असल्यामुळे शेतकरी त्याचा वापर करत आहेत.प्रश्न : भातपिक लागवडीसाठी कोणती पध्दत अवलंबली जाते?उत्तर : पेरणीपूर्वी भाजावळ केली जाते. पारंपरिक पध्दतीने लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. चारसूत्री पध्दतीनेही लागवड करण्यात येत आहे. ८ ते ९ टक्के क्षेत्रावर चारसूत्री पध्दतीने लागवड करण्यात येते. मात्र विद्यापीठ शिफारस नसलेली सगुणा पध्दत लोकांमध्ये प्रचलित होत आहे. प्रश्न : भातबियाणांवरील अनुदान शेतकऱ्यांना मिळेल का?उत्तर : गेली दोन वर्षे भात बियाणांवरील अनुदान बंद करण्यात आले आहे. मात्र तत्पूर्वी दोन वर्षे अनुदान देण्यात आले होते. प्रथम वर्ष ५० टक्के तर दुसऱ्यावर्षी ७५ टक्केचे अनुदान देण्यात आले असल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला होता. मात्र ते बंद करण्यात आले आहे.प्रश्न : अवकाळीची नुकसान भरपाई कधी वितरीत करणार?उत्तर : अवकाळी पावसामुळे आंबा काजू पिकाचे नुकसान झाल्याबद्दल शासनाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७९ कोटी ५३ लाख ६५ हजार २५० रूपयांचा निधी जाहीर केला आहे. पैकी ३३ कोटी ८१ लाख रूपये निधीचा पहिला हप्ता रत्नागिरी जिल्ह्यास प्राप्त झाला आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपयांप्रमाणे नुकसान भरपाईचे वितरण करण्यात येणार आहे. कृषी विभागाकडे नुकसान भरपाईचे परिपत्रक आले असले तरी भरपाईच्या रकमेची वितरण पूर्ण प्रक्रिया मात्र महसूल खात्याकडून राबवली जाणार आहे.- मेहरुन नाकाडे