शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
4
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
5
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
6
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
7
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
8
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
9
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
10
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
11
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
12
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
13
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
14
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
15
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
16
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
17
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
18
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
19
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
20
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका

ऊर्जा चांगल्या कामासाठी वापरा

By admin | Updated: June 30, 2015 21:52 IST

अमोल मडामे : गोपुरीत व्यसनमुक्ती निर्धार प्रबोधन शिबिर

कणकवली : देशात तरुणांची संख्या ६५ टक्के आहे. या युवा वर्गाची ऊर्जा परिवर्तनाच्या कामासाठी वापरल्यास देश बलशाली होण्यास वेळ लागणार नाही. यासाठी जाणकारांनी युवा वर्गासमोर सातत्याने सकारात्मक विचार ठेवले पाहिजेत. युवा वर्गाकडून होणाऱ्या चुकांसाठी त्यांना दोष देत बसण्यापेक्षा त्यांच्यातील ऊर्जा चांगल्या कामासाठी वापरूया, असे प्रतिपादन नशाबंदी मंडळ, मुंबईचे संघटक अमोल मडामे यांनी गोपुरी आश्रमात केले. राष्ट्रसेवा दल कणकवली शाखेच्या युवा वर्गासाठी एकदिवसीय व्यसनमुक्ती निर्धार प्रबोधन कार्यशाळेत ते बोलत होते. अमोल मडामे म्हणाले की, जगात १६ टक्के लोक अतिमद्यपान करतात. त्यात भारतातील मद्यपींचे प्रमाण ११ टक्के आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी १५ कोटी लोक जास्त दारू पितात. याचा परिणाम ७५ कोटी लोकांवर होतो. व्यसन हा जगातील आणि आपल्या देशातील मोठा अतिरेकी आहे. व्यसन माणसे आणि कुटुंबे उद्ध्वस्त करते. आईवडील जर व्यसनी असतील, तर त्यांच्यामुळे त्यांची मुले व्यसनी होण्याची शक्यता ४०० टक्के असते. वरचे उत्पन्न असणाऱ्या व्यक्ती व्यसनांकडे जास्त वळतात. त्याप्रमाणे ग्रामीण आणि झोपडपट्टीतील नागरिक संगतीने व्यसनांकडे कधी वळतात त्यांना कळत नाही. यातून मालाड-मालवणीसारख्या घटना घडतात. व्यसन सोडवायचे असल्यास मनाचा निर्धार असणे गरजेचे असते. हा निर्धार व्यसनमुक्ती कार्यशाळा, समुपदेशन आदी मार्गातून निर्माण करता येतो. व्यसने सातत्याने प्रबोधन करूनच सोडवता येणे शक्य आहे. शासन व्यसने सोडविण्यासाठी निर्णायक क्षमतेपर्यंत येऊ शकत नाही. व्यसन म्हणजे आजारच आहे. कार्यशाळेसाठी जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर, संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुराद अली शेख, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे सुदीप कांबळे, दर्पण सांस्कृतिक मंचचे संस्थापक उत्तम पवार, राष्ट्रसेवा दल कणकवली शाखाध्यक्ष सृष्टी तावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)घेतली व्यसनमुक्तीची शपथनशाबंदी मंडळ महाराष्ट्रच्या सरचिटणीस वर्षा विलास म्हणाल्या की, युवा वर्गाने पुढील पिढी जबाबदार आणि व्यसनमुक्त बनविण्यासाठी आधी स्वत:साठी आणि आपल्या समाजाला व्यसनांपासून दूर नेण्यासाठी सतर्क रहायला हवे. यावेळी शाहीर रामकृष्ण डिगसकर यांनी गीत व भारुडांच्या माध्यमातून व्यसनांचे दुष्परिणाम युवकांसमोर मांडले. या कार्यशाळेनंतर सायंकाळी शिवाजी चौक ते बुद्धविहार अशी प्रबोधन प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीच्या समारोपप्रसंगी बुद्धविहारात युवा वर्गाला नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांनी आयुष्यभर व्यसनमुक्त राहण्याची शपथ दिली.