शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

अध्यापनाव्यतिरिक्त कामे काढून घ्या

By admin | Updated: November 10, 2015 00:01 IST

मुख्यमंत्र्यांना निवेदन : पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेची मागणी

कणकवली : प्राथमिक शिक्षकांकडे शाळेतील अध्यापनाव्यतिरिक्त कामे असल्याने त्याचा शैक्षणिक विकासावर परिणाम होत आहे. त्यामुळे अध्यापनाव्यतिरिक्त कामे शिक्षकांकडून काढून घेण्याबरोबरच राज्याच्या शैक्षणिक विकासासाठी विविध उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेच्यावतीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनंत राणे व सचिव सुहास आरोलकर यांनी दिली आहे.याबाबत पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांना ग्रामीण भागात अध्यापन करीत असताना विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी लागत आहे. ग्रामीण भागातील शाळेवर मुख्याध्यापक व शिक्षक यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असल्याने, शिक्षकेतर कर्मचारी उपलब्ध नसल्याने सर्व जबाबदारी मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यावर येत आहे. शालेय पोषण आहार, शाळाखोली, किचन शेड, स्वच्छतागृह बांधकाम, गणवेश वाटप, विविध औषधांचे वाटप, पाठ्यपुस्तकाची ने-आण, पंचायत समिती-केंद्रस्तरावर वारंवार होणाऱ्या सभा, वारंवार मागितले जाणारे अहवाल, यांसारखी असंख्य शाळेतील अध्यापनाव्यतिरिक्त कामे मुख्याध्यापक व शिक्षक यांना वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार करावी लागतात . प्राथमिक शाळेवर मुख्याध्यापक हे पद स्वतंत्र नसल्याने अशी सर्व विविध कामे करून विध्यार्थ्यांना अध्यापन करावे लागते. या सर्व कामाच्या व्यस्थतेमुळे अध्यापनाकडे दुर्लक्ष होत असून, गुणवत्ता कमी झाल्याचे खापर शिक्षकांच्या माथी मारण्यात येते. शालेय पोषण आहार योजना राबविताना घडणाऱ्या विषबाधा, पुरवठादाराकडून येणारा निकृष्ट माल, इंधन-भाजीपालाची अग्रिम रक्कम न मिळणे या सर्व घटनेस संपूर्णपणे शिक्षकांस जबाबदार धरण्यात येऊन निलंबित, अटक करण्यात येत असल्याने शिक्षकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य व सरपंच यांचा मुख्याध्यापकांना विविध योजनांच्या आर्थिक खर्चापायी होणारा मानसिक आर्थिक त्रास वाढत असल्याने, स्वत:च्या कुटुंबाकडे वेळ देऊ न शकल्याने, मानसिक संतुलन गेल्याने मुख्याध्यापक व शिक्षक शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करीत आहेत. (वार्ताहर)