शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

अध्यापनाव्यतिरिक्त कामे काढून घ्या

By admin | Updated: November 10, 2015 00:01 IST

मुख्यमंत्र्यांना निवेदन : पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेची मागणी

कणकवली : प्राथमिक शिक्षकांकडे शाळेतील अध्यापनाव्यतिरिक्त कामे असल्याने त्याचा शैक्षणिक विकासावर परिणाम होत आहे. त्यामुळे अध्यापनाव्यतिरिक्त कामे शिक्षकांकडून काढून घेण्याबरोबरच राज्याच्या शैक्षणिक विकासासाठी विविध उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेच्यावतीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनंत राणे व सचिव सुहास आरोलकर यांनी दिली आहे.याबाबत पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांना ग्रामीण भागात अध्यापन करीत असताना विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी लागत आहे. ग्रामीण भागातील शाळेवर मुख्याध्यापक व शिक्षक यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असल्याने, शिक्षकेतर कर्मचारी उपलब्ध नसल्याने सर्व जबाबदारी मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यावर येत आहे. शालेय पोषण आहार, शाळाखोली, किचन शेड, स्वच्छतागृह बांधकाम, गणवेश वाटप, विविध औषधांचे वाटप, पाठ्यपुस्तकाची ने-आण, पंचायत समिती-केंद्रस्तरावर वारंवार होणाऱ्या सभा, वारंवार मागितले जाणारे अहवाल, यांसारखी असंख्य शाळेतील अध्यापनाव्यतिरिक्त कामे मुख्याध्यापक व शिक्षक यांना वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार करावी लागतात . प्राथमिक शाळेवर मुख्याध्यापक हे पद स्वतंत्र नसल्याने अशी सर्व विविध कामे करून विध्यार्थ्यांना अध्यापन करावे लागते. या सर्व कामाच्या व्यस्थतेमुळे अध्यापनाकडे दुर्लक्ष होत असून, गुणवत्ता कमी झाल्याचे खापर शिक्षकांच्या माथी मारण्यात येते. शालेय पोषण आहार योजना राबविताना घडणाऱ्या विषबाधा, पुरवठादाराकडून येणारा निकृष्ट माल, इंधन-भाजीपालाची अग्रिम रक्कम न मिळणे या सर्व घटनेस संपूर्णपणे शिक्षकांस जबाबदार धरण्यात येऊन निलंबित, अटक करण्यात येत असल्याने शिक्षकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य व सरपंच यांचा मुख्याध्यापकांना विविध योजनांच्या आर्थिक खर्चापायी होणारा मानसिक आर्थिक त्रास वाढत असल्याने, स्वत:च्या कुटुंबाकडे वेळ देऊ न शकल्याने, मानसिक संतुलन गेल्याने मुख्याध्यापक व शिक्षक शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करीत आहेत. (वार्ताहर)