शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

अशैक्षणिक कामाचा विद्यार्थ्यांवर बोजा?

By admin | Updated: December 9, 2014 01:23 IST

विद्यार्थी त्रस्त : विद्यार्थ्यांकडून अनेक कामांची अंमलबजावणी

एजाज पटेल -फुणगूस -शासनाकडून शिक्षणासाठी आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकास वाढीसाठी विविध योजना राबविल्या जात असताना शाळेतील अशैक्षणिक कामे विद्यार्थ्यांनाच करावी लागत आहेत. याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. एका बाजूला गुणवत्ता विकास प्रकल्प राबविला जात असताना दुसरीकडे शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेतील स्वच्छता, व्हरांडा, परिसराच्या स्वच्छतेसाठी राबविले जाते. हा विरोधाभास शासनाच्या ध्यानी येत नाही का? असा प्रश्न पालकवर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.शिक्षकांनासुद्धा शैक्षणिक कार्याबरोबरच अशैक्षणिक कामे मोठ्या प्रमाणात करावी लागत असल्याने शिक्षकांमध्येही नाराजी आहे. प्राथमिक शिक्षकांना कराव्या लागणाऱ्या अशैक्षणिक कामांबाबत यापूर्वी अनेकवेळा अनेक चर्चा झाल्या, आंदोलने झाली. शिक्षक संघटना ही कामे कमी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पण, शाळेतील मुलांना शाळेच्या आवारात कराव्या लागणाऱ्या अशैक्षणिक कामांबाबत चर्चा झालेली दिसून येत नाही.प्राथमिक शाळांमध्ये शिपाईपद भरण्यात न आल्याने शिपायाची सर्व कामे या लहान मुलांकडून करुन घेतली जातात. शाळांच्या खोल्या व्हरांडा व परिसराची झाडलोट करणे, ही मुलांच्या दृष्टीने नित्याचीच कामे झालेली आहेत. ग्रामीण भागामध्ये तर शाळेच्या खोल्या, व्हरांडा या विद्यार्थ्यांकडून सारवून घेतला जातो. मग, त्यासाठी शेण जमविण्यापासूनचे काम विद्यार्थ्यांना करावे लागते. काही शाळेमध्ये नळपाणी योजना नाही. ज्या शाळांमध्ये नळपाणी योजना असून, त्या डबघाईला आल्या आहेत, अशा ठिकाणी तर मुलांना पाणी भरण्याचे कामही करावे लागते. हे सर्व करण्यासाठी मुलांचा अर्धा ते एक तास वाया जातो.प्राथमिक शाळांसाठी शिपाईपद नाही. त्यामुळे ही कामे मुलांकडून करुन घेण्यात काहीही गैर नाही, असे शिक्षकांना वाटते. राज्य शासनानेही यासंदर्भात कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. एकीकडे गुणवत्ता विकास वाढीसाठी प्रकल्प व दुसरीकडे मुलांना अशैक्षणिक कामे करावी लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त जात आहे. याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लक्ष केंद्रीत करण्याची मागणी पालकवर्गातून जोर धरु लागली आहे.