शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

जिल्ह्यात वनसंरक्षण समित्या निद्रिस्तच

By admin | Updated: June 22, 2015 00:25 IST

वृक्षतोडीला मोकळं रान : पुरेसे कर्मचारीही नाहीत

रत्नागिरी : जिल्ह्यातील वनसरंक्षण समित्या केवळ नावापुरत्याच असून एकही समिती कार्यरत नाहीत. केवळ या समित्या कागदावरच असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. वनविभागाच्या रत्नागिरी विभाग या स्वतंत्र विभागाची स्थापना १९७६ नंतर झाली. यापूर्वी दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, मंडणगड हे रायगडला तर रत्नागिरी, लांजा, राजापूर हे तालुके सिंधुदुर्ग वनविभागाला जोडलेले होते. रत्नागिरी वनविभाग सुरु झाल्यानंतरही जिल्ह्याला वनविभागाकडून पुरेसे कर्मचारी दिलेले नाहीत. त्यामुळे या विभागाचा कार्यभार मोजक्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यरत आहे.जिल्ह्यात ६७०६ हेक्टर जमिनीवर जंगल आहे. काही ठिकाणी १००० ते १२०० हेक्टरवर तर काही ठिकाणी ३ ते १० हेक्टरवर जंगलाचा भाग येतो. शासनाने प्रत्येक वनविभागाला समित्या स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ८६ वनसंरक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. मात्र, या समित्यांवरील पदाधिकारी कार्यरत नाहीत. कारण जंगलाबद्दल कोणालाही विशेष आस्था नसल्याने त्यांचे संरक्षण करण्याचा दृष्टीने या समित्या कमी पडत आहेत. येथे जंगलतोडही मोठ्या प्रमाणात होत असून त्याला लगाम घालण्यासाठी वनविभागाकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. विशेष म्हणजे वनविभागालाही तेवढी आस्था नसल्याने वन संरक्षण समित्या निद्रीस्तच असल्याचे चित्र आहे.समित्यांवर ज्या ज्या लोकांना स्थान देण्यात आले आहेत, त्यांनाही समितीबद्दल फारशी आपुलकी असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे स्थापन करण्यात आलेल्या समित्याही निद्रिस्त आहेत. या समित्या नव्याने स्थापन करुन जंगल तोडीबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने पावले उचलणे आवश्यकता असल्याचे मत जिल्ह्यातील वनप्रेमींकडून व्यक्त होत आहे. (शहर वार्ताहर)वनविभागाच्या रत्नागिरी विभागाची स्थापना १९७६ नंतर.रत्नागिरी वनविभाग सुरु झाल्यानंतरही जिल्ह्याला वनविभागाकडून पुरेसे कर्मचारी नाहीत.जिल्ह्यात ६७०६ हेक्टर जमिनीवर जंगल.