शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

जिल्ह्यात वनसंरक्षण समित्या निद्रिस्तच

By admin | Updated: June 22, 2015 00:25 IST

वृक्षतोडीला मोकळं रान : पुरेसे कर्मचारीही नाहीत

रत्नागिरी : जिल्ह्यातील वनसरंक्षण समित्या केवळ नावापुरत्याच असून एकही समिती कार्यरत नाहीत. केवळ या समित्या कागदावरच असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. वनविभागाच्या रत्नागिरी विभाग या स्वतंत्र विभागाची स्थापना १९७६ नंतर झाली. यापूर्वी दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, मंडणगड हे रायगडला तर रत्नागिरी, लांजा, राजापूर हे तालुके सिंधुदुर्ग वनविभागाला जोडलेले होते. रत्नागिरी वनविभाग सुरु झाल्यानंतरही जिल्ह्याला वनविभागाकडून पुरेसे कर्मचारी दिलेले नाहीत. त्यामुळे या विभागाचा कार्यभार मोजक्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यरत आहे.जिल्ह्यात ६७०६ हेक्टर जमिनीवर जंगल आहे. काही ठिकाणी १००० ते १२०० हेक्टरवर तर काही ठिकाणी ३ ते १० हेक्टरवर जंगलाचा भाग येतो. शासनाने प्रत्येक वनविभागाला समित्या स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ८६ वनसंरक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. मात्र, या समित्यांवरील पदाधिकारी कार्यरत नाहीत. कारण जंगलाबद्दल कोणालाही विशेष आस्था नसल्याने त्यांचे संरक्षण करण्याचा दृष्टीने या समित्या कमी पडत आहेत. येथे जंगलतोडही मोठ्या प्रमाणात होत असून त्याला लगाम घालण्यासाठी वनविभागाकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. विशेष म्हणजे वनविभागालाही तेवढी आस्था नसल्याने वन संरक्षण समित्या निद्रीस्तच असल्याचे चित्र आहे.समित्यांवर ज्या ज्या लोकांना स्थान देण्यात आले आहेत, त्यांनाही समितीबद्दल फारशी आपुलकी असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे स्थापन करण्यात आलेल्या समित्याही निद्रिस्त आहेत. या समित्या नव्याने स्थापन करुन जंगल तोडीबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने पावले उचलणे आवश्यकता असल्याचे मत जिल्ह्यातील वनप्रेमींकडून व्यक्त होत आहे. (शहर वार्ताहर)वनविभागाच्या रत्नागिरी विभागाची स्थापना १९७६ नंतर.रत्नागिरी वनविभाग सुरु झाल्यानंतरही जिल्ह्याला वनविभागाकडून पुरेसे कर्मचारी नाहीत.जिल्ह्यात ६७०६ हेक्टर जमिनीवर जंगल.