शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाचशेहून अधिक गावात पाण्याचे दुर्भीक्ष्य

By admin | Updated: April 30, 2015 00:29 IST

महेश परुळेकर : जनता अन् राज्यकर्त्यांसाठी लाजिरवाणी बाब

कुडाळ : महाराष्ट्र राज्य स्थापनेला १ मे रोजी ५५ वर्षे पूर्ण होत आहेत. अर्धे शतक उलटून गेल्यानंतरही वर्षाला सुमारे २०० ते २५० इंचापेक्षा जास्त पाऊस पडणाऱ्या सिंधुुदुर्ग जिल्ह्यात आजच्या घडीला सुमारे ५०० हून अधिक गावांच्या पिण्याच्या पाण्याचे दुर्भीक्ष्य झाले आहे. ही गोष्ट सर्व जनता आणि राजकर्त्यांसाठी लाजिरवाणी असल्याचे मत सिंधुदुर्ग जिल्हा विनाशकारी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीचे जिल्हा संयोजक महेश परूळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त केले आहे.पत्रकात परूळेकर यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यातील पाण्याच्या दुर्भीक्ष्याबाबत माहिती मिळवली असता समोर आलेली वस्तुस्थिती जिल्हावासीयांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. जानेवारी ते मार्च या वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांच्या सरकारी आकड्यानुसार पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवणाऱ्या गावांची संख्या ५०० च्या वर जाऊन पोहोचली आहे. जिल्ह्यातील तिलारी धरणाचे पाणी गोव्यात पोहोचले असताना तिलारी धरण असलेल्या दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावांच्या वाड्यावस्त्यांमध्ये पाण्याचे दुर्भीक्ष्य असल्याची नोंद महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या प्रसिद्धीपत्रकातून मिळाली आहे. सावंतवाडीचे बापूसाहेब महाराज यांनी केसरी फणसवडे येथून सावंतवाडी संस्थानासाठी नैसर्गिक पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली. परंतु नंतरच्या काळातील राज्यकर्त्यांनी सावंतवाडीच्या आंबोली, कुणकेरी, तळगाव, चौकुळ, धोकोरे, रोणापाल, दांडेली, कारिवडे, डेगवे, ओटवणे या खेड्यापाड्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. कुडाळमध्ये ३५ वर्षांपूर्वी टाळंबा धरणाचे काम सुरू केले. परंतु धरणामुळे ना पाणी आणि ना पुनर्वसन अशी हलाखीची परिस्थिती माणगाव खोऱ्यातील अनेक गावांची झाली आहे, असे परुळेकर यांनी म्हटले आहे. विनाशकारी प्रकल्प संघर्ष समिती ही गोष्ट सहन करणार नाही. टँकरचा थातूरमातूर पाणी पुरवठा नको. १ मे महाराष्ट्र दिनापासून सुरुवातीला पाण्याचे दुर्भीक्ष्य असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील गावे व त्यानंतर माणगाव खोरे, देवगड तालुक्यातील विजयदुर्ग विभाग यांचा सलग दौरा करून या तिन्ही तालुक्यात पाणी प्रत्येक घरी मिळण्यासंदर्भात जनजागृती आणि जनतेच्या पाठींब्यानुसार आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी गावोगावी फिरणार असल्याचे परूळेकर यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)तिलारी धरणाचे पाणी गोव्यात पोहोचले असताना दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावांच्या वाड्यावस्त्यांमध्ये पाण्याचे दुर्भीक्ष्य असल्याची नोंद.सावंतवाडीचे बापूसाहेब महाराज यांनी केसरी फणसवडे येथून सावंतवाडी संस्थानासाठी नैसर्गिक पाणी पुरवठ्याची केली व्यवस्था.माणगा खोऱ्यातील गावांची स्थिती हलाखीची : परुळेकर