शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

पाचशेहून अधिक गावात पाण्याचे दुर्भीक्ष्य

By admin | Updated: April 30, 2015 00:29 IST

महेश परुळेकर : जनता अन् राज्यकर्त्यांसाठी लाजिरवाणी बाब

कुडाळ : महाराष्ट्र राज्य स्थापनेला १ मे रोजी ५५ वर्षे पूर्ण होत आहेत. अर्धे शतक उलटून गेल्यानंतरही वर्षाला सुमारे २०० ते २५० इंचापेक्षा जास्त पाऊस पडणाऱ्या सिंधुुदुर्ग जिल्ह्यात आजच्या घडीला सुमारे ५०० हून अधिक गावांच्या पिण्याच्या पाण्याचे दुर्भीक्ष्य झाले आहे. ही गोष्ट सर्व जनता आणि राजकर्त्यांसाठी लाजिरवाणी असल्याचे मत सिंधुदुर्ग जिल्हा विनाशकारी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीचे जिल्हा संयोजक महेश परूळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त केले आहे.पत्रकात परूळेकर यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यातील पाण्याच्या दुर्भीक्ष्याबाबत माहिती मिळवली असता समोर आलेली वस्तुस्थिती जिल्हावासीयांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. जानेवारी ते मार्च या वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांच्या सरकारी आकड्यानुसार पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवणाऱ्या गावांची संख्या ५०० च्या वर जाऊन पोहोचली आहे. जिल्ह्यातील तिलारी धरणाचे पाणी गोव्यात पोहोचले असताना तिलारी धरण असलेल्या दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावांच्या वाड्यावस्त्यांमध्ये पाण्याचे दुर्भीक्ष्य असल्याची नोंद महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या प्रसिद्धीपत्रकातून मिळाली आहे. सावंतवाडीचे बापूसाहेब महाराज यांनी केसरी फणसवडे येथून सावंतवाडी संस्थानासाठी नैसर्गिक पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली. परंतु नंतरच्या काळातील राज्यकर्त्यांनी सावंतवाडीच्या आंबोली, कुणकेरी, तळगाव, चौकुळ, धोकोरे, रोणापाल, दांडेली, कारिवडे, डेगवे, ओटवणे या खेड्यापाड्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. कुडाळमध्ये ३५ वर्षांपूर्वी टाळंबा धरणाचे काम सुरू केले. परंतु धरणामुळे ना पाणी आणि ना पुनर्वसन अशी हलाखीची परिस्थिती माणगाव खोऱ्यातील अनेक गावांची झाली आहे, असे परुळेकर यांनी म्हटले आहे. विनाशकारी प्रकल्प संघर्ष समिती ही गोष्ट सहन करणार नाही. टँकरचा थातूरमातूर पाणी पुरवठा नको. १ मे महाराष्ट्र दिनापासून सुरुवातीला पाण्याचे दुर्भीक्ष्य असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील गावे व त्यानंतर माणगाव खोरे, देवगड तालुक्यातील विजयदुर्ग विभाग यांचा सलग दौरा करून या तिन्ही तालुक्यात पाणी प्रत्येक घरी मिळण्यासंदर्भात जनजागृती आणि जनतेच्या पाठींब्यानुसार आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी गावोगावी फिरणार असल्याचे परूळेकर यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)तिलारी धरणाचे पाणी गोव्यात पोहोचले असताना दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावांच्या वाड्यावस्त्यांमध्ये पाण्याचे दुर्भीक्ष्य असल्याची नोंद.सावंतवाडीचे बापूसाहेब महाराज यांनी केसरी फणसवडे येथून सावंतवाडी संस्थानासाठी नैसर्गिक पाणी पुरवठ्याची केली व्यवस्था.माणगा खोऱ्यातील गावांची स्थिती हलाखीची : परुळेकर