शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पाचशेहून अधिक गावात पाण्याचे दुर्भीक्ष्य

By admin | Updated: April 30, 2015 00:29 IST

महेश परुळेकर : जनता अन् राज्यकर्त्यांसाठी लाजिरवाणी बाब

कुडाळ : महाराष्ट्र राज्य स्थापनेला १ मे रोजी ५५ वर्षे पूर्ण होत आहेत. अर्धे शतक उलटून गेल्यानंतरही वर्षाला सुमारे २०० ते २५० इंचापेक्षा जास्त पाऊस पडणाऱ्या सिंधुुदुर्ग जिल्ह्यात आजच्या घडीला सुमारे ५०० हून अधिक गावांच्या पिण्याच्या पाण्याचे दुर्भीक्ष्य झाले आहे. ही गोष्ट सर्व जनता आणि राजकर्त्यांसाठी लाजिरवाणी असल्याचे मत सिंधुदुर्ग जिल्हा विनाशकारी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीचे जिल्हा संयोजक महेश परूळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त केले आहे.पत्रकात परूळेकर यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यातील पाण्याच्या दुर्भीक्ष्याबाबत माहिती मिळवली असता समोर आलेली वस्तुस्थिती जिल्हावासीयांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. जानेवारी ते मार्च या वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांच्या सरकारी आकड्यानुसार पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवणाऱ्या गावांची संख्या ५०० च्या वर जाऊन पोहोचली आहे. जिल्ह्यातील तिलारी धरणाचे पाणी गोव्यात पोहोचले असताना तिलारी धरण असलेल्या दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावांच्या वाड्यावस्त्यांमध्ये पाण्याचे दुर्भीक्ष्य असल्याची नोंद महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या प्रसिद्धीपत्रकातून मिळाली आहे. सावंतवाडीचे बापूसाहेब महाराज यांनी केसरी फणसवडे येथून सावंतवाडी संस्थानासाठी नैसर्गिक पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली. परंतु नंतरच्या काळातील राज्यकर्त्यांनी सावंतवाडीच्या आंबोली, कुणकेरी, तळगाव, चौकुळ, धोकोरे, रोणापाल, दांडेली, कारिवडे, डेगवे, ओटवणे या खेड्यापाड्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. कुडाळमध्ये ३५ वर्षांपूर्वी टाळंबा धरणाचे काम सुरू केले. परंतु धरणामुळे ना पाणी आणि ना पुनर्वसन अशी हलाखीची परिस्थिती माणगाव खोऱ्यातील अनेक गावांची झाली आहे, असे परुळेकर यांनी म्हटले आहे. विनाशकारी प्रकल्प संघर्ष समिती ही गोष्ट सहन करणार नाही. टँकरचा थातूरमातूर पाणी पुरवठा नको. १ मे महाराष्ट्र दिनापासून सुरुवातीला पाण्याचे दुर्भीक्ष्य असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील गावे व त्यानंतर माणगाव खोरे, देवगड तालुक्यातील विजयदुर्ग विभाग यांचा सलग दौरा करून या तिन्ही तालुक्यात पाणी प्रत्येक घरी मिळण्यासंदर्भात जनजागृती आणि जनतेच्या पाठींब्यानुसार आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी गावोगावी फिरणार असल्याचे परूळेकर यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)तिलारी धरणाचे पाणी गोव्यात पोहोचले असताना दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावांच्या वाड्यावस्त्यांमध्ये पाण्याचे दुर्भीक्ष्य असल्याची नोंद.सावंतवाडीचे बापूसाहेब महाराज यांनी केसरी फणसवडे येथून सावंतवाडी संस्थानासाठी नैसर्गिक पाणी पुरवठ्याची केली व्यवस्था.माणगा खोऱ्यातील गावांची स्थिती हलाखीची : परुळेकर