शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामे रडारवर!

By admin | Updated: February 4, 2015 23:52 IST

रत्नागिरी नगरपालिका : दहा अनधिकृत बांधकामांवर आणणार टाच

प्रकाश वराडकर - रत्नागिरी नगरपरिषद क्षेत्रातील एक अनधिकृत बांधकाम मंगळवारी पालिकेने हटवल्यानंतर, आता आणखी १० अनधिकृत बांधकामे पालिकेच्या रडारवर आहेत. पुढील आठवड्यात त्यातील ५ अनधिकृत बांधकामांवर टाच आणली जाईल, अशी माहिती नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी दिली. मात्र, ही हिटलिस्टवर असलेली बांधकामे नेमकी कोणती, याबाबत तपशील देण्यास त्यांनी नकार दिला. जयस्तंभ येथील एक अनधिकृत बांधकाम मंगळवारी हटवण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली असून, ज्यांची अनधिकृत बांधकामे आहेत त्यांचे धाबे दणाणले आहेत. नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांना नगरपरिषदेत शिवसेनेचा पाठींबा नाही. सर्वच विषय समिती सभापती हे शिवसेनेचे आहेत. तरीही, राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर ते नगराध्यक्ष म्हणून आपल्याच हाती सत्तेच्या चाव्या कशा राहतील, याबाबत सतर्क आहेत. रत्नागिरी शहरात अनेकांनी घरांचा विस्तार केला आहे. त्यामुळे, अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे झाली आहेत. हे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत असल्याचा आपला अंदाज आहे, असे नगराध्यक्ष मयेकर म्हणाले. राजकीय वादातून आपण ही मोहीम राबवत आहात, असा आरोप सुरू झाला आहे, याबाबत विचारता मयेकर म्हणाले, आपण अमुक पक्षाच्या नेत्याचे, कार्यकर्त्याचे बांधकाम आहे, असा दृष्टीकोन कधीही ठेवलेला नाही, यापुढेही ठेवणार नाही. पक्षीय वादातून आपण असे काही करत असल्याचा कोणाचा आरोप असेल, तर त्यांना तसा आरोप करू देत. मात्र, आपला असा कोणताही उद्देश नाही. कारवाई होणार असलेल्या बांधकामात कोणा राजकीय नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या अनधिकृत बांधकामांचा समावेश आहे काय असे विचारता, सर्वांना आपण समान मानतो; त्यामुळे राजकीय व अराजकीय असा भेदभाव नाही व आपल्यावर कोणाचाही दबाव नाही. दबाव आला तरी, आपण थांबणार नाही, असे मयेकर म्हणाले.सेना-भाजपामध्ये शीतयुध्द ?रत्नागिरी नगरपरिषदेत अनेक वर्ष नगरसेकवक म्हणून काम केलेल्या व नाट्यमयरित्या नगराध्यक्षपद मिळविलेल्या महेंद्र मयेकर यांची कोंडी करण्याचा प्रयत्न शिवसेनेने सातत्याने चालवला आहे. ठरलेल्या करारानुसार मयेकर यांनी नगराध्यक्षपद सेनेला न दिल्याने शिवसेना नगरसेवकांमध्ये खदखद आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेत सध्या सेना-भाजपामध्ये शीतयुध्द सुरू आहे. स्थगितीचा कानमंत्र?गेल्या तीन दशकांच्या काळात रत्नागिरी नगरपरिषद क्षेत्रात अनेक अनधिकृत बांधकामे झाली आहेत. मात्र, राजकीय दबावामुळेच या बांधकामांवर कारवाई झाली नाही. त्यामुळे, अनेकांचा धीर चेपला व अनधिकृत बांधकामे हा जणू हक्कच बनत गेला आहे. अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांना वेळोवेळी नोटीस दिल्या गेल्या. त्यानंतर, संबंधितांनी न्यायालयात धाव घेतली व अनधिकृत बांधकाम हटवण्यास स्थगिती मिळवली. नगरपरिषदेतूनच काही कर्मचाऱ्यांनी हा कानमंत्र संबंधितांना दिल्याची चर्चा असून, सध्या अशी स्थगिती मिळालेली ५९ अनधिकृत बांधकामे शहरात आहेत.