शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

अनधिकृत बांधकामे रडारवर!

By admin | Updated: February 4, 2015 23:52 IST

रत्नागिरी नगरपालिका : दहा अनधिकृत बांधकामांवर आणणार टाच

प्रकाश वराडकर - रत्नागिरी नगरपरिषद क्षेत्रातील एक अनधिकृत बांधकाम मंगळवारी पालिकेने हटवल्यानंतर, आता आणखी १० अनधिकृत बांधकामे पालिकेच्या रडारवर आहेत. पुढील आठवड्यात त्यातील ५ अनधिकृत बांधकामांवर टाच आणली जाईल, अशी माहिती नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी दिली. मात्र, ही हिटलिस्टवर असलेली बांधकामे नेमकी कोणती, याबाबत तपशील देण्यास त्यांनी नकार दिला. जयस्तंभ येथील एक अनधिकृत बांधकाम मंगळवारी हटवण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली असून, ज्यांची अनधिकृत बांधकामे आहेत त्यांचे धाबे दणाणले आहेत. नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांना नगरपरिषदेत शिवसेनेचा पाठींबा नाही. सर्वच विषय समिती सभापती हे शिवसेनेचे आहेत. तरीही, राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर ते नगराध्यक्ष म्हणून आपल्याच हाती सत्तेच्या चाव्या कशा राहतील, याबाबत सतर्क आहेत. रत्नागिरी शहरात अनेकांनी घरांचा विस्तार केला आहे. त्यामुळे, अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे झाली आहेत. हे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत असल्याचा आपला अंदाज आहे, असे नगराध्यक्ष मयेकर म्हणाले. राजकीय वादातून आपण ही मोहीम राबवत आहात, असा आरोप सुरू झाला आहे, याबाबत विचारता मयेकर म्हणाले, आपण अमुक पक्षाच्या नेत्याचे, कार्यकर्त्याचे बांधकाम आहे, असा दृष्टीकोन कधीही ठेवलेला नाही, यापुढेही ठेवणार नाही. पक्षीय वादातून आपण असे काही करत असल्याचा कोणाचा आरोप असेल, तर त्यांना तसा आरोप करू देत. मात्र, आपला असा कोणताही उद्देश नाही. कारवाई होणार असलेल्या बांधकामात कोणा राजकीय नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या अनधिकृत बांधकामांचा समावेश आहे काय असे विचारता, सर्वांना आपण समान मानतो; त्यामुळे राजकीय व अराजकीय असा भेदभाव नाही व आपल्यावर कोणाचाही दबाव नाही. दबाव आला तरी, आपण थांबणार नाही, असे मयेकर म्हणाले.सेना-भाजपामध्ये शीतयुध्द ?रत्नागिरी नगरपरिषदेत अनेक वर्ष नगरसेकवक म्हणून काम केलेल्या व नाट्यमयरित्या नगराध्यक्षपद मिळविलेल्या महेंद्र मयेकर यांची कोंडी करण्याचा प्रयत्न शिवसेनेने सातत्याने चालवला आहे. ठरलेल्या करारानुसार मयेकर यांनी नगराध्यक्षपद सेनेला न दिल्याने शिवसेना नगरसेवकांमध्ये खदखद आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेत सध्या सेना-भाजपामध्ये शीतयुध्द सुरू आहे. स्थगितीचा कानमंत्र?गेल्या तीन दशकांच्या काळात रत्नागिरी नगरपरिषद क्षेत्रात अनेक अनधिकृत बांधकामे झाली आहेत. मात्र, राजकीय दबावामुळेच या बांधकामांवर कारवाई झाली नाही. त्यामुळे, अनेकांचा धीर चेपला व अनधिकृत बांधकामे हा जणू हक्कच बनत गेला आहे. अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांना वेळोवेळी नोटीस दिल्या गेल्या. त्यानंतर, संबंधितांनी न्यायालयात धाव घेतली व अनधिकृत बांधकाम हटवण्यास स्थगिती मिळवली. नगरपरिषदेतूनच काही कर्मचाऱ्यांनी हा कानमंत्र संबंधितांना दिल्याची चर्चा असून, सध्या अशी स्थगिती मिळालेली ५९ अनधिकृत बांधकामे शहरात आहेत.