शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

उमेश शेट्ये सेनेला जय महाराष्ट्र?

By admin | Updated: October 6, 2015 00:41 IST

रत्नागिरी : तटकरेंच्या आशीर्वादाने बुधवारी प्रवेश शक्य, राष्ट्रवादीच्या नेत्यांचाही दुजोरा

रत्नागिरी : वन टू का फोर करीत तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत दाखल झालेले व नंतर नेतृत्व चेपले गेलेले रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष व नगरसेवक उमेश शेट्ये येत्या दोन दिवसांत स्वगृही अर्थात राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये परतणार आहेत. या प्रवेशाबाबत राष्ट्रवादीच्याच एका नेत्याने दुजोरा दिला असून, बुधवारी हा प्रवेश शक्य असल्याचे सांगण्यात आले. या प्रवेशामागे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचे डावपेच असून, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले आमदार उदय सामंत यांना जोरदार शह देण्यासाठी हा ‘चक्रव्यूह’ रचण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.उमेश शेट्ये हे २००० सालापासून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात कार्यरत होते. त्या काळात त्यांनी रत्नागिरीचे नगराध्यक्षपद भूषविले होते. नगराध्यक्षपदी असताना तटकरे हे राष्ट्रवादी - कॉँग्रेस यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत होते. याच काळात तटकरे यांच्याशी चांगले संबंध ठेवून शेट्ये यांनी शहरातील विकासकामांना चांगली गती दिली होती. रत्नागिरी शहरातील सावरकर नाट्यगृह, शहराच्या मुख्य रस्त्यावरील दुभाजक तसेच अनेक विकासकामे शेट्ये यांच्या काळात झाली. तीन वर्षांपूर्वीच ते सेनेत गेले होते.नोव्हेंबर २०१४मध्ये झालेल्या रत्नागिरीच्या उपनगराध्यक्ष निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीतील चार नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला व सेनेचे उमेदवार संजय साळवी यांना मतदान करून उपनगराध्यक्षपदी निवडून आणले. मात्र, पक्षांतर कायद्यात त्यांचे वेगळा गट स्थापन करणे नियमबाह्य ठरले व चारही जणांना अपात्र ठरविण्यात आले. त्यानंतर या चार जागांसाठी येत्या १ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होत आहे. ही पोटनिवडणूक राष्ट्रवादीने सर्वाधिक प्रतिष्ठेची केली आहे, तर स्थानिक लोकप्रतिनिधींना सेनेसाठी या जागा जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सेनेचे आमदार उदय सामंत यांच्यासमोर तटकरे यांनी ‘राजकीय चक्रव्यूह’ निर्माण केल्याची चर्चा आहे. पोटनिवडणुकीत तटकरेंनी सेनेची कोंडी करण्याचे डावपेच आखले आहेत. शिवसेनेतही सर्वकाही आलबेल नाही. सेनेअंतर्गत नव्या जुन्यांच्या वादामुळेही सेनेला पोटनिवडणुकीत फटका बसण्याची भीती आहेच. उमेश शेट्ये राष्ट्रवादीत आल्यानंतर पोटनिवडणूक जिंकण्यासाठी सेनेला ताकद पणाला लावावी लागेल. त्यातच सेनेच्या दोन गटात शीतयुध्द सुरू असून, त्याचा फटकाही सेनेच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. या चारही जागा जिंकण्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात आहे. (प्रतिनिधी) तटकरेंचा चक्रव्यूह सेना भेदणार का?पिछाडीवर गेलेल्या राष्ट्रवादीला रत्नागिरीत पुन्हा जोर देण्यासाठी तटकरे सरसावले असून, शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यात शेट्येंचा पक्षप्रवेश निश्चित झाला.