शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

पोलिसांच्या मारहाणीमुळेच उमेश पिलणकरचा मृत्यू!

By admin | Updated: April 4, 2015 00:07 IST

नातेवाइकांचा आरोप : पोलिसांनी भेटूही दिले नाही

रत्नागिरी : बेकायदा दारू वाहतूकप्रकरणी अटक केलेल्या व पोलीस कोठडी झाली असताना जिल्हा रुग्णालयात उमेश कमलाकर पिलणकर याचा मृत्यू झाल्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. उमेश पिलणकर याचा मृत्यू हा पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच झाला असून, रुग्णालयात उपचार सुरू असतानाही नातेवाइकांना त्याची भेट घेऊ देण्यात आली नाही. मृत्यू झाल्यावर साडेचार तास जवळच्या नातेवाइकांना माहिती न देताच मृतदेह मिरजेला हलविला, असा खळबळजनक आरोप उमेशचे चुलत बंधू शेखर नारायण पिलणकर व त्यांच्या नातेवाइकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केल्याने उमेशच्या मृत्यूचे गूढ अधिकच वाढले आहे. याबाबत शेखर पिलणकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनाही निवेदन सादर केले असून, ज्या पोलिसांनी उमेशला अटक केली त्यांनीच त्याला पोलीस कोठडीत मारहाण केली काय, याची सखोल चौकशी करावी व संंबंधितांवर कडक कारवाई करावी. पोलीस कोठडी झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात उमेशला का दाखल केले, त्याची प्रकृती कशामुळे बिघडली ते नातेवाइकांना सांगण्यात आले नाही. उमेशला कसलाही आजार नसताना त्याचा मृत्यू कसा काय झाला? उमेशला भेटण्यास नातेवाईकांना का नकार देण्यात आला? त्याचेही कारण सांगितलेले नाही, असे निवेदनात म्हटले आहे. उमेश पिलणकरच्या मृत्यूबाबत सायंकाळी पाच वाजता शेखर पिलणकर यांनी पत्रकारांना माहिती दिली. यावेळी मृत उमेशचे नातेवाईक राकेश साळवी, अमोल पिलणकर, सूर्यकांत पिलणकर, श्रीकांत पिलणकर, विवेक पिलणकर, स्वप्निल पिलणकर तसेच उमेशचे पुतणे मंगेश पिलणकर व संतोष पिलणकर उपस्थित होते. (प्रतिनिधी) उमेशचा मृत्यू नैसर्गिक उमेश पिलणकर याच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरज येथे गुरुवारी रात्री २ वा. रत्नागिरीतून हलविण्यात आला. उत्तरीय तपासणीत उमेश पिलणकर याचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याचा अहवाल आला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक एस. एल. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.पोलिसांची लपवाछपवी; नातेवाइकांचा आरोपउमेश पिलणकर याला उपचारासाठी २९ मार्चला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याला नातेवाईक भेटण्यास गेले असता भेट नाकारण्यात आली. बहिणीलाही भेट नाकारली. त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले असून, पोलीस या मृत्यू प्रकरणात लपवाछपवी करीत आहेत, असा आरोपही नातेवाइकांनी केला आहे. त्यामुळे याप्रकरणी ज्यांच्या मारहाणीमुळे उमेशचा मृत्यू झाला आहे, त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका काही काळ घेतल्याने तणाव निर्माण झाला होता.