शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पोलिसांच्या मारहाणीमुळेच उमेश पिलणकरचा मृत्यू!

By admin | Updated: April 4, 2015 00:07 IST

नातेवाइकांचा आरोप : पोलिसांनी भेटूही दिले नाही

रत्नागिरी : बेकायदा दारू वाहतूकप्रकरणी अटक केलेल्या व पोलीस कोठडी झाली असताना जिल्हा रुग्णालयात उमेश कमलाकर पिलणकर याचा मृत्यू झाल्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. उमेश पिलणकर याचा मृत्यू हा पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच झाला असून, रुग्णालयात उपचार सुरू असतानाही नातेवाइकांना त्याची भेट घेऊ देण्यात आली नाही. मृत्यू झाल्यावर साडेचार तास जवळच्या नातेवाइकांना माहिती न देताच मृतदेह मिरजेला हलविला, असा खळबळजनक आरोप उमेशचे चुलत बंधू शेखर नारायण पिलणकर व त्यांच्या नातेवाइकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केल्याने उमेशच्या मृत्यूचे गूढ अधिकच वाढले आहे. याबाबत शेखर पिलणकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनाही निवेदन सादर केले असून, ज्या पोलिसांनी उमेशला अटक केली त्यांनीच त्याला पोलीस कोठडीत मारहाण केली काय, याची सखोल चौकशी करावी व संंबंधितांवर कडक कारवाई करावी. पोलीस कोठडी झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात उमेशला का दाखल केले, त्याची प्रकृती कशामुळे बिघडली ते नातेवाइकांना सांगण्यात आले नाही. उमेशला कसलाही आजार नसताना त्याचा मृत्यू कसा काय झाला? उमेशला भेटण्यास नातेवाईकांना का नकार देण्यात आला? त्याचेही कारण सांगितलेले नाही, असे निवेदनात म्हटले आहे. उमेश पिलणकरच्या मृत्यूबाबत सायंकाळी पाच वाजता शेखर पिलणकर यांनी पत्रकारांना माहिती दिली. यावेळी मृत उमेशचे नातेवाईक राकेश साळवी, अमोल पिलणकर, सूर्यकांत पिलणकर, श्रीकांत पिलणकर, विवेक पिलणकर, स्वप्निल पिलणकर तसेच उमेशचे पुतणे मंगेश पिलणकर व संतोष पिलणकर उपस्थित होते. (प्रतिनिधी) उमेशचा मृत्यू नैसर्गिक उमेश पिलणकर याच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरज येथे गुरुवारी रात्री २ वा. रत्नागिरीतून हलविण्यात आला. उत्तरीय तपासणीत उमेश पिलणकर याचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याचा अहवाल आला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक एस. एल. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.पोलिसांची लपवाछपवी; नातेवाइकांचा आरोपउमेश पिलणकर याला उपचारासाठी २९ मार्चला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याला नातेवाईक भेटण्यास गेले असता भेट नाकारण्यात आली. बहिणीलाही भेट नाकारली. त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले असून, पोलीस या मृत्यू प्रकरणात लपवाछपवी करीत आहेत, असा आरोपही नातेवाइकांनी केला आहे. त्यामुळे याप्रकरणी ज्यांच्या मारहाणीमुळे उमेशचा मृत्यू झाला आहे, त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका काही काळ घेतल्याने तणाव निर्माण झाला होता.