शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

‘त्या’ वादावर अखेर तोडगा

By admin | Updated: September 28, 2016 23:59 IST

महादेवाचे केरवडेमध्ये बैठक : गावकरी-मानकऱ्यात सामंजस्याचा निर्णय

माणगाव : महादेवाचे केरवडे येथील मानकरी, गावकरी व ग्रामस्थ यांच्यातील वादावर अखेर समन्वय बैठकीतून तोडगा काढण्यात आला.  यापुढे ज्या गावकरी मंडळींना ग्रामदेवतेच्या देवळात नारळ फोडणे, भटजी येण्याबाबत आडकाठी न आणणे व वैयक्तिक वादापोटी एखाद्याला वाळीत टाकणे हे प्रकार थांबविण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी सामंजस्यपूर्वक मते मांडल्याने बैठक उत्साहात पार पडून गावाच्या समृद्ध वाटचालीस नवी सुरूवात झाल्याची मते व्यक्त करण्यात आली. महादेवाचे केरवडे मालाचीराई येथील कविटकर-सावंत आदी ग्रामस्थांनी पोलिसांकडे आपले नारळ ग्रामदेवतेच्या देवळात ठेवू न देणे, आपल्याकडे लग्नसमारंभासाठी आडकाठी आणणे व वैयक्तिक वादापोटी एखाद्याकडे इतरांनाही जाण्यास मज्जाव करणे आदी बाबतीत निवेदन दिले होते. या नियोजनाची दखल घेऊन गावातील समझोता व गाव एक संघ राहण्याच्या दृष्टीने अ‍ॅड. किशोर शिरोडकर, सरपंच पंढरीनाथ परब, माजी सरपंच बाळ केसरकर, अ‍ॅड. चंद्रशेखर परब आदींनी बुधवारी समन्वयाची बैठक घेतली. ही बैठक महादेवाचे केरवडे ग्रामदैवत श्री रवळनाथ पावणाई मंदिरात पार पडली. या बैठकीस सावंतवाडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रविण चिंचाळकर, कुडाळ पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा, माणगावचे साहायक पोलिस उपनिरीक्षक चव्हाण यांसह पंढरीनाथ परब, अ‍ॅड. किशोर शिरोडकर, बाळ केसरकर, मधुकर परब, मंगेश परब, राजन सावंत, विजय म्हाडगूत, राजू कविटकर आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रत्येकाने आपला हक्क व कर्तव्य पार पाडताना इतरांना त्रास होईल असे वर्तन न करण्याबाबत एकमत झाले. ज्या लोकांच्या तक्रारी होत्या, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे नारळ ठेवणे, लग्न समारंभ आदीबाबतीत मानकरी लागतील, तशी पूर्वकल्पना मानकऱ्यांना द्यावी. नारळ ठेवायचा असल्यास तशीही कल्पना द्यावी. असे यावेळी ठरविण्यात आले.सण समारंभात देवळात सर्व ग्रामस्थांचे नारळ ठेवणे, गाऱ्हाणी करण्याबाबत समन्वय तोडगा काढण्यात आला. यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. (प्रतिनिधी)हेवाळेकर प्रकरणाची पुनरावृत्ती नकोमहादेवाचे केरवडे येथील ग्रामदेवतेच्या देवळात काही ग्रामस्थांचे नारळ ठेवले जात नसल्याबाबत तक्रार हेवाळेकर प्रकरणाशी सर्व केरवडेवासीयांचा काही संबंध नसून, या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात गावाची बदनामी झाली. याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून घेण्यात आलेल्या समन्वयक बैठकीत अशा प्रकरणाची पुनरावृत्ती होणार नसल्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. गावाच्या समृद्ध वाटचालीची सुरूवातमहादेवाचे केरवडेतील गावकरी-मानकऱ्यांतील वाद गेली कित्येक वर्षे सुरू होता. यावादामुळे गावात कोणत्याही चांगल्या कामाची निर्मिती झाली नाही. उलट गावाची बदनामीच होत होती. पण या समन्वय बैठकीतील सर्व मान्य तोडग्याने गावाच्या समृद्ध वाटचालीचे नवे पर्व सुरू झाल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या.