शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

‘त्या’ वादावर अखेर तोडगा

By admin | Updated: September 28, 2016 23:59 IST

महादेवाचे केरवडेमध्ये बैठक : गावकरी-मानकऱ्यात सामंजस्याचा निर्णय

माणगाव : महादेवाचे केरवडे येथील मानकरी, गावकरी व ग्रामस्थ यांच्यातील वादावर अखेर समन्वय बैठकीतून तोडगा काढण्यात आला.  यापुढे ज्या गावकरी मंडळींना ग्रामदेवतेच्या देवळात नारळ फोडणे, भटजी येण्याबाबत आडकाठी न आणणे व वैयक्तिक वादापोटी एखाद्याला वाळीत टाकणे हे प्रकार थांबविण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी सामंजस्यपूर्वक मते मांडल्याने बैठक उत्साहात पार पडून गावाच्या समृद्ध वाटचालीस नवी सुरूवात झाल्याची मते व्यक्त करण्यात आली. महादेवाचे केरवडे मालाचीराई येथील कविटकर-सावंत आदी ग्रामस्थांनी पोलिसांकडे आपले नारळ ग्रामदेवतेच्या देवळात ठेवू न देणे, आपल्याकडे लग्नसमारंभासाठी आडकाठी आणणे व वैयक्तिक वादापोटी एखाद्याकडे इतरांनाही जाण्यास मज्जाव करणे आदी बाबतीत निवेदन दिले होते. या नियोजनाची दखल घेऊन गावातील समझोता व गाव एक संघ राहण्याच्या दृष्टीने अ‍ॅड. किशोर शिरोडकर, सरपंच पंढरीनाथ परब, माजी सरपंच बाळ केसरकर, अ‍ॅड. चंद्रशेखर परब आदींनी बुधवारी समन्वयाची बैठक घेतली. ही बैठक महादेवाचे केरवडे ग्रामदैवत श्री रवळनाथ पावणाई मंदिरात पार पडली. या बैठकीस सावंतवाडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रविण चिंचाळकर, कुडाळ पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा, माणगावचे साहायक पोलिस उपनिरीक्षक चव्हाण यांसह पंढरीनाथ परब, अ‍ॅड. किशोर शिरोडकर, बाळ केसरकर, मधुकर परब, मंगेश परब, राजन सावंत, विजय म्हाडगूत, राजू कविटकर आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रत्येकाने आपला हक्क व कर्तव्य पार पाडताना इतरांना त्रास होईल असे वर्तन न करण्याबाबत एकमत झाले. ज्या लोकांच्या तक्रारी होत्या, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे नारळ ठेवणे, लग्न समारंभ आदीबाबतीत मानकरी लागतील, तशी पूर्वकल्पना मानकऱ्यांना द्यावी. नारळ ठेवायचा असल्यास तशीही कल्पना द्यावी. असे यावेळी ठरविण्यात आले.सण समारंभात देवळात सर्व ग्रामस्थांचे नारळ ठेवणे, गाऱ्हाणी करण्याबाबत समन्वय तोडगा काढण्यात आला. यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. (प्रतिनिधी)हेवाळेकर प्रकरणाची पुनरावृत्ती नकोमहादेवाचे केरवडे येथील ग्रामदेवतेच्या देवळात काही ग्रामस्थांचे नारळ ठेवले जात नसल्याबाबत तक्रार हेवाळेकर प्रकरणाशी सर्व केरवडेवासीयांचा काही संबंध नसून, या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात गावाची बदनामी झाली. याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून घेण्यात आलेल्या समन्वयक बैठकीत अशा प्रकरणाची पुनरावृत्ती होणार नसल्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. गावाच्या समृद्ध वाटचालीची सुरूवातमहादेवाचे केरवडेतील गावकरी-मानकऱ्यांतील वाद गेली कित्येक वर्षे सुरू होता. यावादामुळे गावात कोणत्याही चांगल्या कामाची निर्मिती झाली नाही. उलट गावाची बदनामीच होत होती. पण या समन्वय बैठकीतील सर्व मान्य तोडग्याने गावाच्या समृद्ध वाटचालीचे नवे पर्व सुरू झाल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या.