शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

नारायण राणेंचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील

By admin | Updated: March 23, 2017 23:44 IST

दीपक केसरकर : शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर बोलणे टाळले

सावंतवाडी : नारायण राणे शिवसेनेत येणार की नाहीत याबाबत मला काही माहीत नाही. मात्र, त्यांच्याबाबत कोणताही निर्णय हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील, असे मत गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. राणे यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेबाबत छेडले असता त्यांनी हे उत्तर दिले. यावेळी त्यांनी जिल्हा नियोजनचा निधी १०० कोटींवरून १६० कोटी नेल्याचे सांगत जे राणेंना जमले नाही ते मी करून दाखविले, असा टोलाही हाणला. केसरकर म्हणाले, आपण जिल्ह्यासाठी काम करतो. जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी येत आहे. त्यामुळे आपण करीत असलेल्या कामाला विरोधकांनीही सहकार्याची भूमिका दाखवावी एवढीच अपेक्षा आहे. जिल्ह्याच्या स्थापनेपासून आजपर्यंत याठिकाणी राहत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या इमारतींची दुरुस्ती कधीही झाली नाही. ती आपण पालकमंत्री झाल्यावर प्राधान्याने केली. तसेच अधिकारी दर्जाचे विद्यार्थी घडावेत, यासाठी शिक्षणाच्या बाबतीत जिल्हा आघाडीवर नेण्याचा आपला प्रयत्न असून, सावंतवाडीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. संपूर्ण जिल्ह्यात अशी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. वेंगुर्ले व देवगड याठिकाणी लवकरच रुग्णालयांचे बांधकाम सुरू करण्यात येणार असून, त्याबाबतचे टेंडर दोन ते चार दिवसांत निघेल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. पालकमंत्री झाल्यानंतर आपण अनेक विकासकामे मार्गी लावली. मात्र, त्याचा गाजावाजा केला नाही. सर्वांना एकत्रित घेऊन काम करण्याची आपली भूमिका आहे. त्यामुळे कोणीही आपल्यावर टीका केली तरी त्याला उत्तर देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)डॉक्टरांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावाडॉक्टरांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करणे बंधनकारक आहे. डॉक्टरांना होणारी मारहाण निषेधार्थ आहे. याबाबत येत्या दोन दिवसांत आढावा घेऊन अशा घटना थांबविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच सर्व गृहराज्यमंत्री आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असून, डॉक्टरांच्या मागण्यांसंदर्भात कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.मच्छिमार कर्जदारांच्या खात्यात डिझेल परताव्याची रक्कमराजकीय सहकार विकास निगमअंतर्गत यांत्रिक नौकांसाठी कर्ज घेतलेल्या कर्जदार सभासदांच्या कर्ज खात्यात डिझेल परताव्याची रक्कम परस्पर वर्ग करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय जिल्ह्यापुरता मर्यादित नसून, संपूर्ण किनारपट्टीला लागू आहे. तसेच शनिवारी मच्छिमारांच्या प्रश्नाबाबत संबंधित खात्याच्या सचिवांशी चर्चा करणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.