शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
2
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलदाबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
3
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
4
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
5
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
6
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
7
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
8
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
9
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
10
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
11
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
12
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
13
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
14
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
15
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च
16
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
17
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
18
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
19
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
20
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का

दोन तालुक्यांचे दाखले एकाच अधिकाऱ्याकडे

By admin | Updated: June 13, 2015 00:25 IST

निपटाऱ्यासाठी कसरत : जबाबदारी एकाकडेच

रत्नागिरी : विविध दाखल्यांवर सह्या करण्याची जबाबदारी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दिली असल्याने आता येथील अधिकाऱ्यांवर संगमेश्वर आणि रत्नागिरी या दोन तालुक्यांमधील दाखल्यांवर सह्या करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे या कार्यालयाच्या इतर कामांबरोबरच दाखल्यांचाही निपटारा करताना कसरत करावी लागत आहे.पूर्वी दाखल्यांवर सह्या करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध प्रांतांबरोबरच इतर उपजिल्हाधिकारी यांच्याकडेही दिली होती. प्रत्येक अधिकाऱ्याला वार ठरवून देण्यात आले होते. मात्र, तो अधिकारी रजेवर वा दौऱ्यावर असेल तर त्याच्या वाराला त्या दाखल्यांवर दुसरा अधिकारी सह्या करीत नसे. जबाबदारी झटकण्याचे काम सुरू होते. अन्य अधिकाऱ्याच्या कामाच्या दिवशीच्या दाखल्यावर मी का सही करू, अशी वृत्ती बळावली होती. यामुळे जनतेची कामे खोळंबून राहात होती. अशावेळी नागरिकांचे अनेक दाखले प्रलंबित राहू लागले होते. काही अधिकाऱ्यांकडूनच सह्यांचे काम वेळेवर होत नसल्याने हजारो दाखले रखडले होते. त्यामुळे नागरिकांमधून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात होती.मात्र, आता हे काम उपविभागीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहे. या रत्नागिरी उपविभागीय कार्यालयांतर्गत रत्नागिरी आणि संगमेश्वर हे दोन तालुके येतात. सध्या बारावी आणि दहावीचे निकाल लागल्याने या मुलांना शैक्षणिक कामकाजासाठी दाखल्यांची गरज भासत आहे. या अधिकाऱ्यांकडे अधिवास, राष्ट्रीयत्व, जातीचे दाखले यांची जबाबदारी दिलेली आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर थोड्याच दिवसात दहावीचाही निकाल लागला आहे. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी आवश्यक असणारे दाखले मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्याची जबाबदारी आहे. त्यामुळे आता नियमित प्रशासकीय जबाबदारी सांभाळतानाच या दाखल्यांवर सह्या करण्याची जबाबदारी आली आहे. दौरे, विविध बैठका, दैनंदिन कामकाज आणि सध्या दाखल्यांचा भार सांभाळावा लागत असल्याने मोठीच कसरत करावी लागत आहे. दाखले देताना आवश्यक ते कागदपत्र तपासून त्यावर सह्या करावी लागत असल्याने दाखल्यांचे काम रेंगाळत आहे. त्यातच दाखल्यांसाठी आवश्यक असणारी कागदपत्र तपासून देताना काही कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना नाहक त्रास दिला जात आहे. त्यामुळेही दाखले सह्यांसाठी जाताना अधिक कालावधी लागत आहे. त्यामुळे एकाच उपविभागीय अधिकाऱ्यावर सह्यांचा भार टाकण्याऐवजी इतर अधिकाऱ्यांकडे जबाबदारी दिल्यास दाखल्याचा निपटारा होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)