शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

राजिवडा येथून दोन बहिणींचे अपहरण

By admin | Updated: July 16, 2017 23:57 IST

राजिवडा येथून दोन बहिणींचे अपहरण

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : शहरातील राजिवडा परिसरात दोन सख्ख्या बहिणींचे अपहरण झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहरण झालेल्या तरुणींपैकी एक वीस वर्षीय, तर दुसरी १७ वर्षीय असल्याचे पोलिसांनी सांगितले.मिळालेल्या माहितीनुसार, हसीब अब्दुल हमीद फणसोपकर (४७, राजीवडा रत्नागिरी) यांची पत्नी व दोन मुली १४ जुलै रोजी रात्री जेवण करून टीव्ही पाहत बसल्या होत्या. वडील हसीब फणसोपकर हे लवकर झोपी गेले, तर आई मध्यरात्री दोन वाजेपर्यंत या मुलींसोबत टीव्ही पाहत होती. त्यानंतर या दोन्ही मुली वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर त्यांची आईही खालच्या खोलीत झोपी गेली.रविवारी पहाटे आईला जाग आली. सर्वप्रथम ती आपल्या मुलींना उठविण्यासाठी गेली. त्यावेळी तिच्या दोन्ही मुली तेथे नसल्याचे दिसून आले. त्यामुळे तिने पती हसीब फणसोपकर यांना उठवून सगळी हकिगत सांगितली. वडिलांनी परिसरात या मुलींचा शोध घेतला, परंतु त्या सापडल्या नाहीत. घरातील वापरण्यात येणारी मोबाईलची सीम कार्डेही गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ शहर पोलीस ठाणे गाठून आपल्या मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३६३ नुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.