शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

माकडतापाचे आणखी दोन बळी

By admin | Updated: March 29, 2017 23:36 IST

मृतांची संख्या आठ : साथीने थैमान घातल्याने परिसरात भीतीचे वातावरण

बांदा : बांदा परिसरात गेले काही दिवस माकडतापाने थैमान घातले असून, या तापाने बुधवारी आणखी दोघाजणांचा बळी घेतला आहे. बुधवारी सकाळी दीपाली दिलीप नाईक (वय ४५, रा. निगुडे-तेलीवाडी) व सूदन शंकर परब (४४, रा. बांदा-सटमटवाडी) यांचा माकडतापाने गोवा-बांबोळी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघांवर गोवा-बांबोळी येथे गेले काही दिवस उपचार सुरू होते. आतापर्यंत बांदा परिसरात माकडतापाने आठजणांना आपला जीव गमवावा लागला आहे.आतापर्यंत बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रातून १८८ तापसरीच्या रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यापैकी ६९ रुग्णांना माकडतापाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तापसरीच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांसह अतिरिक्त ४ डॉक्टर, ५ आरोग्य कर्मचारी, ३ सुपरवायझर, ४ आरोग्यसेवक कार्यरत आहेत. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून तापसरीच्या रुग्णांमध्ये घट झाली होती. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून पुन्हा तापसरीच्या साथीने डोके वर काढले आहे. निगुडे-तेलीवाडी येथील दीपाली नाईक या गाळेल येथे माकडतापबाधित क्षेत्रात काजू गोळा करण्यासाठी जात असत. १२ मार्च रोजी त्यांना ताप आला होता. १३ मार्च रोजी त्यांना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना आजुला (म्हापसा-गोवा) येथे उपचारासाठी दाखल केले होते. त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने अखेर त्यांना बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथेही त्यांची प्रकृती उपचाराला साथ देत नव्हती. अखेर सतरा दिवसांच्या झुंजीनंतर बुधवारी सकाळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू माकडतापानेच झाला असल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. नाईक यांची आर्थिक स्थिती खूपच हलाखीची आहे. नाईक यांचे पतीही मोलमजुरीची कामे करतात. (प्रतिनिधी)