शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

रत्नागिरीत जिल्हा परिषदेचे दोन गट होणार

By admin | Updated: August 29, 2016 00:37 IST

खेड, चिपळूण स्थिर : संगमेश्वरचा एक गट कमी होणार

श्रीकांत चाळके खेड गेल्या दहा वर्षांत प्रभागनिहाय कमी होत असलेली लोकसंख्या आणि नव्याने निर्माण होत असलेल्या नगरपंचायतीमुळे विभागलेल्या प्रभागाचा फटका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रभाग रचनेवर झाला आहे़ परिणामी दापोली व मंडणगडसह गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर मतदारसंघावर देखील परिणाम झाला असून, खेड आणि चिपळूण मतदारसंघ स्थिर राहिले आहेत़ मंडणगड तालुक्यात याअगोदर जिल्हा परिषदेचे तीन गट होते. ते आता दोन होणार आहेत. तीच स्थिती दापोली तालुक्याची आहे. तेथे यापूर्वी सात गट होते. ते आता सहा राहणार आहेत, तर खेड आणि चिपळूण तालुक्यांतील प्रत्येकी सात आणि नऊ होते, ते तसेच राहणार आहेत. याउलट गुहागर तालुक्यात पूर्वीचे पाच होते, त्याठिकाणी आता चार गट राहणार असून, सगमेश्वर तालुक्यातील पूर्वीच्या आठ गटांचे आता सात गट होणार आहेत़ रत्नागिरी तालुक्याचे मात्र आठ गट कमी न होता दोनने वाढले आहेत. आता रत्नागिरी तालुक्यात दहा गट होणार आहेत. याउलट लांजा आणि राजापूर तालुक्यांत पूर्वीइतकेच म्हणजे अनुक्रमे चार व सहा इतकेच गट राहणार आहेत. पंचायत समितीमध्ये खेड आणि चिपळूणचे पंचायत समितीचे गण पूर्वीप्रमाणेच म्हणजे अनुक्रमे १४ आणि १८ राहणार आहेत. संगमेश्वर तालुक्यात मात्र पंचायत समिती गणात बदल झाला असून, पूर्वीच्या १६ गणांचे आता १४ मतदारसंघ करण्यात आले आहेत. रत्नागिरीत मात्र १६ गणांचे आता २० गण झाले आहेत. त्यामुळे संगमेश्वर तालुक्याला पूर्वीच्या तुलनेत यापुढे दोन पंचायत समिती सदस्य कमी होणार असून, रत्नागिरी तालुक्याला पूर्वीच्या तुलनेत आणखी चार सदस्य जादा मिळणार आहेत. याप्रमाणेच लांजा व राजापूर तालुक्यांच्या पंचायत समितीच्या पूर्वीच्या सदस्यसंख्येत काही बदल झाला नाही. पूर्वीची असलेली ८ व १२ ही सदस्यसंख्या स्थिर राहणार आहे. मंडणगड तालुक्याला सहा ऐवजी आता चार मतदारसंघ मिळणार आहेत. गुहागर पंचायत समितीची दहा सदस्य संख्या आता आठ, तर दापोली पंचायत समितीची सदस्य संख्या १२वर आली आहे.