शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

कणकवलीसाठी सव्वा दोन कोटींचा निधी

By admin | Updated: March 24, 2017 00:28 IST

माधुरी गायकवाड यांची माहिती : मुख्यमंत्र्यांचे जनतेच्यावतीने मानले आभार ; क्रीडांगणासाठीही सकारात्मक निर्णय होईल

कणकवली : कणकवली शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. त्यासाठी आमचे विविध प्रकारे प्रयत्न सुरु आहेत. असे सांगतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणकवली शहराला नागरी सुविधा पुरविण्यासाठी २ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती नगराध्यक्षा माधुरी गायकवाड व उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी येथील नगरपंचायत कार्यालयात गुरुवारी संयुक्तरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.यावेळी नगरसेवक रूपेश नार्वेकर, सुशांत नाईक, नगरसेविका राजश्री धुमाळे, भाजप कणकवली शहर प्रभारी मधुसूदन परब उपस्थित होते.यावेळी कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा माधुरी गायकवाड म्हणाल्या, कणकवली शहरातील नागरिकांना आणखी नागरी सुविधा पुरविता याव्यात यासाठी माजी आमदार प्रमोद जठार तसेच कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी नगरविकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधीच्या मागणीची दखल घेऊन नागरी सुविधा योजनेतून २ कोटी २५ लाखांचा निधी कणकवली शहरासाठी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहीतीही यावेळी गायकवाड यांनी दिली.गायकवाड पुढे म्हणाल्या, या भरघोस निधीमुळे कणकवली शहर विकासाच्या कामांना वेग येणार आहे. सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. वीज, रस्ते, पाणी पुरवठा अशा विविध सुविधा या निधीतून नागरिकांना पुरविण्यात येतील. त्याचबरोबर शहरासाठी आणखी विकास निधी द्यावा अशी मागणी पत्राद्वारे शासनाकडे करण्यात आली आहे. शहरासाठी निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे जनतेच्यावतीने आम्ही आभार मानतो. असेही त्या यावेळी म्हणाल्या.कन्हैया पारकर म्हणाले, नगरोत्थान योजनेमधून शहरातील क्रीडांगण, उद्यान यासाठीही निधी मिळावा अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. याबाबतही सकारात्मक निर्णय होईल असा आम्हाला विश्वास आहे. कणकवली शहरातील विविध आरक्षणे विकसित करण्याचा आमचा प्रयत्न रहाणार आहे. त्यासाठी आरक्षणांबाबत संबधित जमीन मालकांची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. यामध्ये मुडेश्वर मैदानाच्या जमीन मालकांचाही समावेश असणार आहे. बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल.दलित वस्ती सुधार योजनेतून जिल्ह्याला सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात फक्त ८० लाखांचा निधी मिळाला होता. त्यातून आम्हाला साडे चौदा लाख रुपयांचा निधी शहरातील समाज मंदिरासाठी मिळाला होता. अजून ३२ लाख रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे यासह इतर कामासाठी दलितवस्ती सुधार योजनेतून ६३ लाख रुपयांच्या निधीची मागणी समाजकल्याण विभागाकडे आम्ही केली आहे. यामुळे दलित वस्तीकडे दुर्लक्ष केला जात आहे. अशी बिनबुडाची वक्तव्ये कोणी करु नयेत. आम्ही सर्व समावेशक असून शहराचा विकास करताना सर्व समाजघटकाना बरोबर घऊन जाणार आहोत. कणकवली शहरातील नागरिकानीही सहकार्य करावे. असेही ते यावेळी म्हणाले.(प्रतिनिधी)