शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
2
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
3
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
4
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
5
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
6
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
7
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
8
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
9
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
10
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
11
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
12
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
13
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
14
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
15
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
16
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
17
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
18
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
19
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
20
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

वीस हजार क्विंटल बियाणे पेरणीविना

By admin | Updated: July 21, 2014 23:20 IST

५० टक्क्यांचीच विक्री : उशिरा पेरणीने उत्पादन घटणार

नितीन काळेल - सातारापावसाने दडी मारणे व त्याच्या उशिरा दाखल होण्याचा परिणाम पेरणीवर झाला आहे. त्याचबरोबर बियाण्यांवरही झालेला आहे. खरीप हंगामासाठी उपलब्ध केलेल्यांपैकी ५० टक्के बियाणे विक्री न झाल्याने पडून आहेत. त्यामुळे सुमारे वीस हजार क्विंटल बियाण्यांना यंदा अंकुर फुटणार का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यातच उशिरा पेरणी झाली तर उत्पादन घटणार आहे. जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी सर्व प्रकारचे मिळून ५१ हजार ७३० क्विंटल बियाणे लागणार होते. त्यामध्ये भात, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, भुईमूग आदी बियाण्यांचा समावेश आहे. त्याप्रकारे कृषी विभागाने नियोजनही केले होते. नियोजनाच्या तुलनेत जिल्ह्यात सुमारे ४० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झालेले आहे. त्यापैकी १९ हजार ४३७ क्विंटल बियाण्यांचीच विक्री झालेली आहे. म्हणजे, उपलब्ध झालेल्या बियाण्यांपैकी ५० टक्क्यांहून अधिक बियाणे हे कृषी सेवा केंद्रात पडून आहेत. आता तर दुष्काळी भागात पाऊस नसल्याने खरिपाच्या पेरण्या होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे राहिलेले बियाणे विक्रीला जाणारच नाहीत. फक्त पश्चिम भागातच बियाण्यांना मागणी राहणार आहे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील कृषी केंद्र चालकांना शिल्लक राहणाऱ्या बियाण्यांचे करायचे काय? असा प्रश्न पडला आहे.एकंदरीत पावसाने दडी मारल्याने पूर्वेकडील भागात दुष्काळाचे सावट तीव्र होताना दिसत आहे. पश्चिम भागात उशिरा पेरणी सुरू झाली असली तरी येथील लोकांना धान्य पदरी पडण्याची आशा आहे. पावसाळ्याचे दोन महिने संपत आले. त्यातच या महिन्याअखेरपर्यंत चांगला पाऊस पडला तरच दुष्काळी भागात पेरण्या होणार आहेत. पाऊस नाही झाला तर खरीप हंगाम वाया जाणार आहे. पाऊस होऊन उशिरा पेरण्या झाल्या तर उत्पादनात घट होणार आहे. (उत्तरार्ध)