शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

‘त्यां’चा चतुष्कोनी प्रवास प्रेरणादायी

By admin | Updated: November 28, 2014 23:56 IST

१०,४८२ किलोमीटर प्रवास: निर्भय जीवन जगण्याचा चौधरी यांचा संदेश

रत्नागिरी : कोणत्याही धाडसाला वयाचीङ्कमर्यादा नसते म्हणतात ते खरच आहे. जळगाव येथील डॉ. सुनीलदत्त चौधरी यांच्याकडे पाहिले की, त्याची प्रचिती येते. एखाद्या तरुणाला लाजवेल, अशी ऊर्जा वयाच्या ५३व्या वर्षीही असलेले डॉ. चौधरी यांनी देशाच्या चतुष्कोेनाला स्पर्श करण्याचे अभियान हाती घेतले आहे. ३० आॅक्टोबर रोजी कन्याकुमारीपासून या अभियानाला सुरुवात झाली असून, आतापर्यंत त्यांनी १० हजार ४८२ किलोमीटर्सचा प्रवास पूर्ण केला आहे.ङ्कजळगाव जिल्ह्यातील या भारतीय नागरिकाने यापूर्वीच कन्याकुमारी ते लेह हा प्रवास पूर्ण करून पाच वर्षांपूर्वीच ‘लिम्का बुक आॅफङ्खवर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद केली आहे. त्यांनी तीन हजार ८४७ किलोमीटर्सचा प्रवास अवघ्या सहा दिवस पाच तास आणि २५ मिनिटांमध्ये पूर्ण केला. २२ मे २००९ रोजी कन्याकुमारी येथून सुरू केलेला हा प्रवास २८ मे २००९ रोजी लेह येथे संपला. देशाच्या चारही कोपऱ्यांना स्पर्श करण्याच्या अभियानांतर्गत डॉ. चौधरी हे रत्नागिरीत आले आहेत. या अभियानासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या आणि मान्यतापत्र घेऊनच हा प्रवास करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कोणतेही धाडसी पाऊल टाकण्यासाठी मनात भीती बाळगू नका, आपले जीवन मनसोक्त जगा, असा संदेश याङ्कमाध्यमातून जगाला देत असल्याचे चौधरी यांनी सांगितले.वेगवेगळ्या अभियानाच्या ङ्कमाध्यमातून आतापर्यंत चार लाख किलोमीटर्सचा प्रवास केला आहे. आपला मुलगा रामकृष्ण याचे स्वप्न साकार करत आहे. देशाच्या चारही कोपऱ्यांना स्पर्श करून पुन्हा एकदा ‘लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाव नोंदविण्याचा मनोदय डॉ. चौधरी यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)